शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

देशासमोरील धोके ओळखून प्रबोधन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:51 IST

शिरोळ : देशासमोरील संभाव्य धोके ओळखून शिक्षण व सहकार क्षेत्रातील मंडळींनी देश पातळीवरील चर्चासत्रातून प्रबोधन केले पाहिजे, असे आवाहन माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व.डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रविवारी माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते यंदाचा स्व. डॉ. ...

शिरोळ : देशासमोरील संभाव्य धोके ओळखून शिक्षण व सहकार क्षेत्रातील मंडळींनी देश पातळीवरील चर्चासत्रातून प्रबोधन केले पाहिजे, असे आवाहन माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व.डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रविवारी माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते यंदाचा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १ लाख १ हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, आमदार सतेज पाटील, राजू कागे, माजी खासदार निवेदिता माने, कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी आमदार काका पाटील, कल्लाप्पाण्णा मग्याण्णावर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अशोकराव कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.माजी राष्टÑपती पाटील म्हणाल्या, शिक्षणामुळे सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांची वजाबाकी अशी शिक्षणपद्धती अवलंबणे गरजेचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व प्रगती यांचा प्रचार व प्रसार जनकल्याणासाठी झाला पाहिजे. स्व. सा. रे. पाटील यांनी नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दत्त उद्योग समूहाचा परिसर फुलविला आहे. त्यांचा वसा व वारसा त्यांचे पुत्र गणपतराव पाटील पुढे चालवीत आहेत. डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य शिक्षण, आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून चिरंतन राहणार आहेत.दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी स्वागत केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, स्व. सा. रे. पाटील यांनी समाजविकासाचे केलेले काम लक्षणीय आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य अतुलनीय आहे. तरुणाला उच्च शिक्षणातून रोजगार व देशाला संपत्ती मिळाली तरच देश महासत्ताकडे वाटचाल करेल.‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार म्हणाले, समाजात मतासाठी धर्म, पंथ यांचा आधार घेतला जात आहे. हा देश बहुजनांचा आहे. शिक्षणात दुकानदारी आणि सहकार मोडून पडत आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांना मिळालेला पुरस्कार आमच्यासाठी आत डोकावून पाहण्याचा आणि स्वत:ची परीक्षा घेण्यासाठी आहे.विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. इचलकरंजीचे बाळ महाराज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. राजश्री पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी मासिक इंद्रधनुष्यच्या कॅन्सर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक अनिल यादव, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव बी. बी. शिंदे, शेतकरी उपस्थित होते. जि. प.चे सदस्य बंडा माने यांनी आभार मानले.पुरस्काराची रक्कम सेवाभावी कार्यालाडॉ. पाटील म्हणाले, राजकारणात फार वेळ न राहता राज्यपाल होण्याचे माझे स्वप्न तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील व सोनिया गांधी यांच्यामुळे पूर्ण झाले. त्यांनी पुरस्काराची एक लाखांची रक्कम परत देत अंध, मूकबधिर सेवाभावी संस्थांच्या कार्याला खर्च करावी, असे सांगितले.