शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

टोमॅटोचा राजा

By admin | Updated: August 31, 2015 23:04 IST

कृषिक्रांतीचे शिलेदार

एक काळ असा होता की, जगातील अनेक देशांत टोमॅटोला विषारी फळ समजले जात असे. आज मात्र टोमॅटो आणि टोमॅटोयुक्त पदार्थांशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. टोमॅटो सॉस असल्याशिवाय पिझ्झा, बर्गर, चायनीज पदार्थांप्रमाणेच आजकाल भजीसुद्धा खाल्ली जात नाहीत. टोमॅटोचा आहारात वापर सुरू झाला; पण टोमॅटो लवकर खराब होणारे फळ भाजी वर्गात मोडणारे असल्याने त्याचा उपयोग ऋतुमानाप्रमाणे होत असे. टोमॅटो निर्जंतुकपणे साठविण्याची पद्धती विकसित करणारे आणि भारतासह अनेक देशांत प्रत्यक्ष जाऊन अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी संशोधन करण्यात आयुष्य खर्ची घालणारे संशोधक म्हणजे डॉ. फिलिप नेल्सन.फिलिप यांचा जन्म १९३४ मध्ये इंडियाना या अमेरिकन प्रांतात मॉरिसटाऊन येथे झाला. वडिलांची ५०० एकर शेती होती. फिलिप त्या शेतातच वाढले. लहानपणापासून शेतातील विविध उत्पादनाचे पॅकिंगसाठी फिलिप मदत करीत असत. पीक आल्यावर त्याची काढणी आणि मळणी करायलाही त्यांना आवडायचे. त्यांच्या वडिलांची अन्नपदार्थ, विविध पिकांच्या फळांचे डबाबंद (कॅनिंग) पॅकिंगसाठी ब्ल्यू रिव्हर पॅकिंग कंपनी होती. इथे ते काम करायचे. विषेशत: टोमॅटोच्या पॅकिंगसाठी सुमारे तीनशे कामगार काम करायचे. त्यांचे शालेय शिक्षण मॉरिसटाऊन येथे झाले. पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी पर्ड्यू विद्यापीठात विस्तार कार्याच्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेतले.इंडियाना राज्यात कृषी प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनात फिलिप यांनी पिकविलेले टोमॅटोचे २४ प्रकार ठेवले. त्यांच्या या टोमॅटोंना ४ एच पारितोषिक मिळाले आणि फिलिप यांना ‘टोमॅटोचा राजा’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. पुढे १९५६ मध्ये फिलिप यांनी कृषिशास्त्रात बी.एस. ही पदवी पर्ड्यू विद्यापीठातून मिळविली. त्यानंतर ब्ल्यू रिव्हर पॅकिंग कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम सुरू केले; पण टोमॅटोचे उत्पादन खूपच घटल्यामुळे प्रामुख्याने टोमॅटो पॅकिंग करणारी ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यांनतर फिलिप यांना पर्ड्यू विद्यापीठात अर्धवेळ नोकरी मिळाली. ते फलोद्यान विभागाचे काम पाहत. त्यांनी १९६७ मध्ये याच विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविली. अन्नघटकांचा कालानुरूप स्वाद जाणे व टोमॅटोचे हवाबंद पद्धतीने स्वादासह टिकविणे हा त्यांचा विषय होता. या अभिनव संशोधनाने त्यांना कायम नोकरी मिळाली. याच विद्यापीठात त्यांनी ५० वर्षे नोकरी केली. मे, २०१०मध्ये लौकिकार्थाने सेवानिवृत्त झाले; मात्र आजही ते मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.सन १९७० मध्ये नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सच्या माध्यमातून अन्नधान्याची नासाडी रोखण्यासंदर्भात संशोधनासाठी फिलिप भारतात आले. त्या काळात भारतात उत्पादित होणाऱ्या अन्नधान्यांपैकी ५० टक्के अन्न नासाडीमुळे वाया जात असे. फिलिप यांनी तंत्राद्वारे अन्नाची नासाडी थांबविण्याचे ज्ञान विकसित राष्ट्रांना दिले. त्यामुळे अन्नाची साठवणूक तंत्र आणि वितरण शक्य झाले. त्यांनी विविध धातूंच्या डबाबंद पॅकिंगसाठी ४० लाख लिटरच्या टाक्या तयार केल्या. अन्नाच्या निर्जंतुकीकरणाचे तंत्रही विकसित केले. यासाठी त्यांनी सछिद्र कंटेनर निर्माण केले. शीतकरण व सुयोग्य तापमान निश्चिती केली. अन्न, फळे आणि भाज्या सुखरूप पाठविण्यासाठी जहाज रचना केल्या. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे १९९५मध्ये ‘निकोलाज अ‍ॅपर्ट’ पारितोषिक देऊन कौतुक झाले. अन्न प्रक्रियेबाबतचे सर्वांत महत्त्वाचे वर्ल्ड फुड प्राईज २००७ मध्ये मिळाले. आजही ते पर्ड्यू विद्यापीठात आपल्या संशोधन कार्यात मग्न आहेत.- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.