शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून म्हारूळच्या तरुणाना मारहाण, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:01 IST

उसन्या घेतलेल्या तीन लाख रुपयांसाठी लिहून घेतलेले करारपत्र आणि धनादेश परत मिळविण्यासाठी म्हारूळ (ता. करवीर) येथील तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना अटक केली. संशयित अभिजित जालंदर देशमुख (वय ३०), सुनील रघुनाथ चवरे (३७ दोघेही रा. चाळशिरंबे, ता. कऱ्हाड , जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. अन्य सहा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयितांनी रमेश संतू कांबळे (३९, रा. म्हारूळ) यांना डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी देत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.

ठळक मुद्देअपहरण करून म्हारूळच्या तरुणाना मारहाण, दोघांना अटककऱ्हाड तालुक्यातील चाळशिरंबेतील दोघांना अटक

कोल्हापूर : उसन्या घेतलेल्या तीन लाख रुपयांसाठी लिहून घेतलेले करारपत्र आणि धनादेश परत मिळविण्यासाठी म्हारूळ (ता. करवीर) येथील तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना अटक केली. संशयित अभिजित जालंदर देशमुख (वय ३०), सुनील रघुनाथ चवरे (३७ दोघेही रा. चाळशिरंबे, ता. कऱ्हाड , जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. अन्य सहा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयितांनी रमेश संतू कांबळे (३९, रा. म्हारूळ) यांना डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी देत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.करवीर पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी रमेश कांबळे यांनी एप्रिल २०१५ मध्ये संशयित अभिजित देशमुख यांचे वडील जालंदर देशमुख यांना तीन लाख रुपये उसने दिले होते. त्या वेळी कांबळे यांनी देशमुख यांच्याकडून बँकेचा धनादेश आणि करारपत्र लिहून घेतले होते. मात्र जालंदर यांनी घेतलेली रक्कम दिलेल्या मुदतीत परत केली नाही. त्यावेळी कांबळे यांनी त्यांना फोन करून तुमच्याकडून घेतलेला धनादेश बँकेत भरत आहे.

करारपत्राचा भंग केल्याने वकिलांकडून नोटीस पाठवीत असल्याचे सांगितले. संशयित अभिजित आणि सुनील यांना त्याचा राग आला. त्यांनी कांबळे यांच्याकडे धनादेश आणि करारपत्र परत मागितले. मात्र त्यांनी देण्यास नकार दिल्याने त्यांचे अपहरण करण्याचा कट रचला. जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना कुडित्रे (ता. करवीर), आष्टा, इस्लामपूर, नेर्ले येथे नेऊन एका घरात डांबून ठेवले.

त्या ठिकाणी त्यांना काठीने मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे काढून जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून जबरदस्तीने ट्रॅक्टर घेऊन धनादेश, टीटी फॉर्म, करारपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्या. हा प्रकार ३० जुलै ते १ आॅगस्टच्या दरम्यान घडला. अखेर त्यांच्या तावडीतून सुटून त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर