शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

खरीपने गुंडाळला गाशा, आता ‘रब्बी’कडून अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 00:33 IST

पेरणीला प्रारंभ : कृषी विभागाचे नियोजन, परतीच्या मान्सूनमुळे पोषक वातावरण

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर   -निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम निराशाजनक गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळिराजा मोठ्या अपेक्षेने आणि आशेने रब्बीच्या तयारीला लागला आहे. पीक काढणी झालेल्या क्षेत्रावर मशागत पेरणीलाही प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद कृषी विभागाने आवश्यक बियाणे, खते यांची उपलब्धता केली आहे.यंदा खरीप हंगामाची वेळेत पेरणी झाली. मात्र, पावसाची वक्रदृष्टी राहिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. पिके पोसवण्याच्या टप्प्यातच पावसाने पाठ फिरविली. खडकाळ जमिनीवरील पिके करपून गेली. सर्वत्र सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परिणामी त्याचा परिणाम उत्पादनावर जाणवत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून खरीप पीक काढणी सुरू झाली आहे. सध्या सोयाबीन, ज्वारी काढणीला वेग आला आहे. पीक काढणी झालेल्या क्षेत्रात पाठोपाठ मशागत करून रब्बीच्या पेरणीला प्रारंभ झाले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या मान्सूनने झोडपले. त्यामुळे रब्बीच्या पेरणीला पोषक परिस्थिती परिस्थिती आहे. खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन अपेक्षित मिळाले नाही. त्यामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरबरा, मका आदी पिकांचे चांगले उत्पादन घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. ज्वारी, गहू, हरबरा यांचे बियाणे कृषी सेवा केंद्रांत उपलब्ध आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ३० हजार २४७ हेक्टरवर रब्बीसाठी विविध पिकांची पेरणी झाली होती. यंदा ३३ हजार १०० हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दोन लाख २५ हजार ५०० मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी केली आहे. ज्वारीचे १५५०, गहू १८९०, हरबरा १३२३, सूर्यफूल ३०, मका ८८० इतके क्विंटल बियाणांची मागणी आहे. रब्बीबरोबरच कृषी विभागाने उन्हाळी भात, भुईमूग, मका, सूर्यफूल या पिकांचे १३९० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट होते. गेल्यावर्षी १२३७ हेक्टरवर पेरणी झाली होती. उन्हाळी हंगामातील आवश्यक बियाण्यांचीही मागणी करण्यात आली आहे. खरीप पीक काढण्याचे काम गतीने सुरू आहे. पाठोपाठ मशागत करून जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणीही सुरू आहे. आवश्यक बियाणांची मागणी केली आहे. काही प्रमाणांत बियाणे कृषी सेवा केंद्रात उपलब्ध झाली आहेत. रब्बी हंगामात बियाणे व रासायनिक खतांची टंचाई भासू नये, याची खबरदारी कृषी विभाग आतापासूनच घेत आहे.- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद पेरक्षेत्रचे नियोजनपीकनिहाय जिल्ह्यातील पेरक्षेत्रचे नियोजन व कंसात गेल्यावर्षीचे हेक्टरनिहाय असे : ज्वारी - १५५०० (१५४६५), गहू - ५४००(४०२६), हरभरा - ६३०० (५४१७), सूर्यफूल - ३००(२८२), मका - ५५०० (५०५७), करडई - १०० (०).रासायनिक खतांची मागणी अशीतालुकानिहाय रासायनिक खतांची मागणी मेट्रीक टनात अशी : आजरा - ९०२०, भुदरगड - ६७६९, चंदगड - १५७९०, गडहिंग्लज - ११२८१, गगनबावडा - २२६०, हातकणंगले - २९३२०, कागल - २९३२०, करवीर - ५४०९१, पन्हाळा - १८०४०, राधानगरी - १३५३१, शाहूवाडी - ४५०९, शिरोळ - ३१५६९.