शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

खरीपने गुंडाळला गाशा, आता ‘रब्बी’कडून अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 00:33 IST

पेरणीला प्रारंभ : कृषी विभागाचे नियोजन, परतीच्या मान्सूनमुळे पोषक वातावरण

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर   -निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम निराशाजनक गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळिराजा मोठ्या अपेक्षेने आणि आशेने रब्बीच्या तयारीला लागला आहे. पीक काढणी झालेल्या क्षेत्रावर मशागत पेरणीलाही प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद कृषी विभागाने आवश्यक बियाणे, खते यांची उपलब्धता केली आहे.यंदा खरीप हंगामाची वेळेत पेरणी झाली. मात्र, पावसाची वक्रदृष्टी राहिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. पिके पोसवण्याच्या टप्प्यातच पावसाने पाठ फिरविली. खडकाळ जमिनीवरील पिके करपून गेली. सर्वत्र सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परिणामी त्याचा परिणाम उत्पादनावर जाणवत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून खरीप पीक काढणी सुरू झाली आहे. सध्या सोयाबीन, ज्वारी काढणीला वेग आला आहे. पीक काढणी झालेल्या क्षेत्रात पाठोपाठ मशागत करून रब्बीच्या पेरणीला प्रारंभ झाले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या मान्सूनने झोडपले. त्यामुळे रब्बीच्या पेरणीला पोषक परिस्थिती परिस्थिती आहे. खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन अपेक्षित मिळाले नाही. त्यामुळे रब्बी ज्वारी, गहू, हरबरा, मका आदी पिकांचे चांगले उत्पादन घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. ज्वारी, गहू, हरबरा यांचे बियाणे कृषी सेवा केंद्रांत उपलब्ध आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ३० हजार २४७ हेक्टरवर रब्बीसाठी विविध पिकांची पेरणी झाली होती. यंदा ३३ हजार १०० हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दोन लाख २५ हजार ५०० मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी केली आहे. ज्वारीचे १५५०, गहू १८९०, हरबरा १३२३, सूर्यफूल ३०, मका ८८० इतके क्विंटल बियाणांची मागणी आहे. रब्बीबरोबरच कृषी विभागाने उन्हाळी भात, भुईमूग, मका, सूर्यफूल या पिकांचे १३९० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट होते. गेल्यावर्षी १२३७ हेक्टरवर पेरणी झाली होती. उन्हाळी हंगामातील आवश्यक बियाण्यांचीही मागणी करण्यात आली आहे. खरीप पीक काढण्याचे काम गतीने सुरू आहे. पाठोपाठ मशागत करून जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणीही सुरू आहे. आवश्यक बियाणांची मागणी केली आहे. काही प्रमाणांत बियाणे कृषी सेवा केंद्रात उपलब्ध झाली आहेत. रब्बी हंगामात बियाणे व रासायनिक खतांची टंचाई भासू नये, याची खबरदारी कृषी विभाग आतापासूनच घेत आहे.- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद पेरक्षेत्रचे नियोजनपीकनिहाय जिल्ह्यातील पेरक्षेत्रचे नियोजन व कंसात गेल्यावर्षीचे हेक्टरनिहाय असे : ज्वारी - १५५०० (१५४६५), गहू - ५४००(४०२६), हरभरा - ६३०० (५४१७), सूर्यफूल - ३००(२८२), मका - ५५०० (५०५७), करडई - १०० (०).रासायनिक खतांची मागणी अशीतालुकानिहाय रासायनिक खतांची मागणी मेट्रीक टनात अशी : आजरा - ९०२०, भुदरगड - ६७६९, चंदगड - १५७९०, गडहिंग्लज - ११२८१, गगनबावडा - २२६०, हातकणंगले - २९३२०, कागल - २९३२०, करवीर - ५४०९१, पन्हाळा - १८०४०, राधानगरी - १३५३१, शाहूवाडी - ४५०९, शिरोळ - ३१५६९.