शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

पोषक पावसामुळे खरीप जोमात, माळरानावरील पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 10:57 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्देपोषक पावसामुळे खरीप जोमात, माळरानावरील पिके तरारली मुसळधार पावसाचा अंदाज

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील अतिवृष्टीनंतर पावसाने काहीशी दडी मारली होती. आठवडाभर दांडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला होता. अगोदरच नदी व ओढ्याकाठची पिके महापुराने उद्ध्वस्त झाली आहेत. पुराच्या पाणी व अतिवृष्टीच्या तडाख्यातून राहिलेल्या पिकांची जोपासना करण्यात सध्या शेतकरी मग्न आहे.

मध्यंतरी पावसाने दडी मारली व वीज कनेक्शन बंद असल्याने पाणी पाजायचे कसे? असा पेच होता. तोपर्यंत पावसाने सुरुवात केली. पावसाच्या हलक्या सरी का असेना पण दिवसातून दोन-तीनवेळा कोसळत राहिल्याने तेवढा पिकांना आधार झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा नूर काहीसा बदलला आहे.करवीरचा पश्चिम भाग, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. सध्या भातपीक गळ्यात (परिपक्वतेकडे) आले आहेत तर कमी कालावधीचे भात बाहेर पडले आहे. नागली, भुईमूग, सोयाबीन पिकांचीही तीच अवस्था असून त्यांना पाण्याची गरज आहे. या पिकांना हवी तेवढीच ओल मुळांना मिळत असल्याने पिके चांगलीच फोफावली आहेत.दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस वाढण्याची शक्यता आहे.आणखी १५-२० दिवस गरजखरीप पिकांना अजून १५ ते २० दिवस पावसाची गरज आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात होईल.-धरणातील विसर्ग वाढलाधरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील विसर्ग वाढविण्यात आला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ८०० वरून १४००, वारणातून २६४७ वरून ५४६०, दूधगंगेतून ८०० वरून ९०० घनफूट पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.नऊ बंधारे पाण्याखालीधरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. पंचगंगेची पातळी सोमवारी सकाळी आठपर्यंत १८ फुटांवर होती. त्यामुळे विविध नद्यांवरील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पिकांना हवा तसाच पाऊस सुरू असल्याने सर्वच पिकांची वाढ चांगली आहे. मध्यंतरी अतिवृष्टीने वाढ खुंटलेल्या ऊस पिकालाही पाऊस पोषक आहे.- सुरेश खाडे शेतकरी, चव्हाणवाडी  

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर