शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

पोषक पावसामुळे खरीप जोमात, माळरानावरील पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 10:57 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्देपोषक पावसामुळे खरीप जोमात, माळरानावरील पिके तरारली मुसळधार पावसाचा अंदाज

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील अतिवृष्टीनंतर पावसाने काहीशी दडी मारली होती. आठवडाभर दांडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला होता. अगोदरच नदी व ओढ्याकाठची पिके महापुराने उद्ध्वस्त झाली आहेत. पुराच्या पाणी व अतिवृष्टीच्या तडाख्यातून राहिलेल्या पिकांची जोपासना करण्यात सध्या शेतकरी मग्न आहे.

मध्यंतरी पावसाने दडी मारली व वीज कनेक्शन बंद असल्याने पाणी पाजायचे कसे? असा पेच होता. तोपर्यंत पावसाने सुरुवात केली. पावसाच्या हलक्या सरी का असेना पण दिवसातून दोन-तीनवेळा कोसळत राहिल्याने तेवढा पिकांना आधार झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा नूर काहीसा बदलला आहे.करवीरचा पश्चिम भाग, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. सध्या भातपीक गळ्यात (परिपक्वतेकडे) आले आहेत तर कमी कालावधीचे भात बाहेर पडले आहे. नागली, भुईमूग, सोयाबीन पिकांचीही तीच अवस्था असून त्यांना पाण्याची गरज आहे. या पिकांना हवी तेवढीच ओल मुळांना मिळत असल्याने पिके चांगलीच फोफावली आहेत.दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस वाढण्याची शक्यता आहे.आणखी १५-२० दिवस गरजखरीप पिकांना अजून १५ ते २० दिवस पावसाची गरज आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात होईल.-धरणातील विसर्ग वाढलाधरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील विसर्ग वाढविण्यात आला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ८०० वरून १४००, वारणातून २६४७ वरून ५४६०, दूधगंगेतून ८०० वरून ९०० घनफूट पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.नऊ बंधारे पाण्याखालीधरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. पंचगंगेची पातळी सोमवारी सकाळी आठपर्यंत १८ फुटांवर होती. त्यामुळे विविध नद्यांवरील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पिकांना हवा तसाच पाऊस सुरू असल्याने सर्वच पिकांची वाढ चांगली आहे. मध्यंतरी अतिवृष्टीने वाढ खुंटलेल्या ऊस पिकालाही पाऊस पोषक आहे.- सुरेश खाडे शेतकरी, चव्हाणवाडी  

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर