शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पावसाने उघडीप दिल्याने खरीप काढणीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 15:00 IST

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने खरीप काढणीची लगबग वाढली आहे. माळरानावरील भात, भुईमूग काढणीस गती आली असून आणखी चार दिवस पावसाने उसंत घेतली तर सुगी जोरात सुरू होणार आहे.

ठळक मुद्देपावसाने उघडीप दिल्याने खरीप काढणीची लगबग चार दिवस उसंत घेतल्यास सुगी जोरात सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यात  पावसाने उघडीप दिल्याने खरीप काढणीची लगबग वाढली आहे. माळरानावरील भात, भुईमूग काढणीस गती आली असून आणखी चार दिवस पावसाने उसंत घेतली तर सुगी जोरात सुरू होणार आहे.यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सून सक्रिय झाल्याने खरिपाची उगवण वेळेत झाली. त्यात पिकांना पोषक असाच पाऊस राहिल्याने वाढ ही जोमात झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात एकसारखा पाऊस सुरू असून कमी कालावधीचे भातपीक सध्या कापणीस आले आहे.

संकरीत बियाणे असल्याने सव्वा तीन महिन्यात भातकाढणीस आले मात्र एकसारखा पाऊस असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. शिवारात पाणी उभा राहिल्याने कापणी करायची? कशी आणि त्याची मळणी कुठे करायची? असा पेच त्यांच्यासमोर आहे. त्यात पाऊस थांबण्याचा नावच घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.

हातातोंडाला आलेली पिके पाण्यात जाण्याची भीती त्याला होती. मात्र सोमवारी सकाळपासून वातावरणात एकदमच बदल झाला. आकाश स्वच्छ होते, आणि आठपासूनच कडकडीत ऊन राहिले. दिवसभर ऊन राहिल्याने शेतकऱ्यांची भातकापणीसाठी लगबग सुरू झाली. विशेषत माळरान, डोंगरमाथ्यावर भात, भुईमूग व सोयाबीन काढणीस वेग आला आहे. आणखी चार-पाच दिवस पावसाने उघडीप दिली तर सुगीला वेग येणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रkolhapurकोल्हापूर