शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

ग्रामस्वच्छता अभियानात खानापूर ग्रामपंचायत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:25 IST

गोलिवडे द्वितीय, तर हिरलगे ग्रामपंचायत तृतीय

आजरा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत खानापूर (ता. आजरा) ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्पर्धेत गोलिवडे (ता. पन्हाळा) व हिरलगे (ता. गडहिंग्लज) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीने जिल्ह्यातील १२ तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांची या स्पर्धेसाठी तपासणी केली होती. २०० गुणांच्या या परीक्षेत खानापूर १९०, गोलिवडे १८३, हिरलगे ग्रामपंचायतीला १६२ गुण मिळविले. स्व. वसंतराव नाईक यांच्या नावाने दिला जाणारा सांडपाणी व्यवस्थापनाचा ५० हजार रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनाचा ५० हजार रुपयांचा पुरस्कारही खानापूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे. स्व. आबासाहेब खेडकर यांच्या नावाने दिला जाणारा शौचालय व्यवस्थापनाचा गोलिवडे ग्रामपंचायतीला ५० हजारांचा पुरस्कार मिळाला आहे.जिल्हास्तरीय समितीमार्फत ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, शालेय शौचालय, गावातील परिसर यांची पाहणी करण्यात आली होती. खानापूर ग्रामपंचायतीने यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून, सहा लाखांचे बक्षीस मिळविले आहे. विशेष दोन पुरस्कारांचे प्रत्येकी ५० हजार असे एक लाखाचे बक्षीस मिळाले आहे.याकामी सरपंच संकल्पना डोंगरे, उपसरपंच आनंदा राणे, ग्रामसेवक विशाल दुंडगेकर, सदस्य विश्वास जाधव, युवराज जाधव, माधुरी गुरव, अलका चव्हाण, सुशिला जाधव, सीताबाई दोरुगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. गटविकास अधिकारी संजय ढमाळ, पंचायत विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, आबासाहेब मासाळ यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत