शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 11:24 IST

नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे.

सदाशिव मोरेआजरा :  जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजऱ्यातून सुधीर राजारामबापू देसाई ५७ मते घेऊन निवडून आले आहेत. तर विद्यमान संचालक अशोक चराटी यांना ४८ मते मिळाली. मतदान वेळी रांगेतील मते व मिळालेली मते यामध्ये तफावत असल्याने फुटलेली मते व बाद मताचा शिलेदार कोण ? याची चर्चा आजरा तालुक्यात रंगली आहे. देसाई विजयी झाल्याचे वृत्त समजताच आजऱ्यात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.जिल्हा बँकेवर पंचवीस वर्षे राजारामबापू देसाई यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवून सत्ता मिळविली होती. त्यावेळी ते बॅंकेचे उपाध्यक्षही झाले होते. दहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राजारामबापू देसाई यांचा पराभव करीत काशिनाथअण्णा चराटी यांनी विजय मिळवला होता.चालू वेळच्या निवडणुकीत या दोन नेत्यांच्या वारसदारांमध्ये लढत होती. त्यामध्ये सुधीर देसाई यांनी बाजी मारून आजऱ्यातून जिल्हा बँकेवर सत्ता मिळविली आहे. नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे...फुटलेल्या व बाद मतांचा शिलेदार कोण?मतदानादिवशी सुधीर देसाई यांच्या रांगेत ५५ तर अशोक चराटी यांच्या रांगेत ५१ मते होती. निकालात मात्र देसाई यांना ५७  व चराटी यांना ४८ मते व एक मत बाद झाले आहे. आर्थिक घडामोडी बरोबर नोकऱ्या व रांगेत उभा राहूनही ती फुटलेली तीन मते कोणाची व बाद मताचा शिलेदार कोण ?? याची चर्चा आजरा तालुक्यात  रंगली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकbankबँकResult Dayपरिणाम दिवस