शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

कोल्हापूरचे कास पठार; किटवडेत बहरला रानफुलांचा सुगंध, विविध प्रजातींच्या फुलांनी पर्यटक आकर्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:12 IST

प्रतिचेरापुंजी म्हणून ओळख असलेले पावसाचे गाव

सदाशिव मोरेआजरा : औषधी वनस्पती, मुबलक जैवविविधता व निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला आजरा तालुका आहे. पावसाळ्यात दररोज अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने प्रती चेरापुंजी म्हणून ओळख असलेला किटवडेचा सडा सध्या रंगीबेरंगी रानफुलांनी बहरला आहे. कोल्हापूरचे प्रती कासपठार म्हणून याठिकाणाची ओळख होत आहे. विविध प्रजातीची ही रानफुले आपल्या मनमोहक सुगंधाने पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.आजरा तालुक्याला निसर्गाची अव्दितीय जैवविविधता लाभली आहे. स्थानिक नागरिकांनी मिळालेली निसर्गसंपदा सुस्थितीत आजपर्यंत राखून ठेवली आहे. त्यामुळे येथील परिसरात दुर्मिळ ते अतिदुर्मिळ जलचर, उभयचर प्राणी, वनस्पती, पक्षी, कीटक, रानफुली रानभाज्या व रानफळे सहज आढळून येतात. त्यामुळे किटवडे ( ता . आजरा ) परिसर पर्यटकांबरोबरच, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यांना आकर्षित करीत आहे.

आजरा आंबोली रस्त्यावर घाटकरवाडीपासून तीन कि.मी.अंतरावर हा किटवड्याचा सडा आहे. या ठिकाणी आता पांढरी, निळसर, पिवळी, गुलाबी अशा विविध प्रकारची रानफुले बहरली आहेत. म्हणूनच जैवविविधतेने समृद्ध असलेले गाव म्हणून किटवडेचा उल्लेख राज्यभर केला जातो.

पठारावर फुललेली प्रजातीनुसार रानफुलेसीतेची आसवे असणारी निळसर फुले, सोनसळीची पिवळी फुले, गुलाबी तेरडा, पेवची पांढरी फुले, भुई चापा, अत्तर काढण्यासाठी वापरली जाणारी सुरंगीची फुले, सुंदर वास असणारी अंजनीची निळसर फुले. तर सात वर्षांनी फुललेली बकरा वनस्पतीची फुले यांचा मनमोहक असा सडा जवळपास ५० ते ६० एकरमध्ये बहरला आहे.

शेकडो प्रकारच्या उपलब्ध रानभाज्याभारंगी, पात्री, कर्टुली, वाघाटी, आळंबी, नाली, अकुरवेल, आधाळी, फिरशी, चिवारी, कचर, लोकेरी, काकडी सारखी गोमटी भाजी या रानभाज्या या परिसरात उपलब्ध आहेत. पावसाळ्यात चार महिने पावसाने गावाचा संपर्क तुटल्यानंतर नागरिकांना या भाज्यांवरच अवलंबून राहावे लागते.

परिसरात वावर असणारे जंगली प्राणीहत्ती, गवे, साळींदर, डुक्कर, भेकर, कोल्हे, लांडगे, वाघ, बिबट्या, ब्लॅक पॅंथर,  काळवीट अशा प्रकारचे प्राणी या भागात दररोज शेतकऱ्यांना दिसतात.

किटवडे परिसरातील औषधी वनस्पतीअमृता, नरक्या, हिरडा, बेहडा, कुंभ, कोकम, दातपडी, रताळे, हाडसांदी, मालेबंद, दूधगर्भणी, शिकेकाई,तमालपत्री, मिरी यासह ३० ते ३५ औषधी वनस्पती सापडतात.

प्रतिचेरापुंजी म्हणून ओळख असलेले पावसाचे गावसमुद्रावरून येणारा पाऊस किटवड्याच्या सड्यावर आदळून पडतो. दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस होतो. चेरापुंजी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने किटवडेची ओळख प्रतीचेरापुंजी अशी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर