शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

करवीरची पीक परिस्थिती एकदम ‘झकास’

By admin | Updated: August 22, 2014 22:05 IST

भात पोटरीच्या अवस्थेत : सोयाबीन फुलाय लागलाय, भुईमुगाला सुटू लागल्या आऱ्या

कसबा बावडा : करवीर तालुक्यातील खरिपाची पिके जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. धुळवाफेवर पेरलेले भात आता पोटरीला आले आहे. सोयाबीन फुलाय लागलाय. भुईमूग आऱ्या सुटणेच्या अवस्थेत आहे. उसाची उंची चांगलीच वाढली असून, पेरे हाताच्या मनगटासारखी झाली आहेत. एकंदरीत करवीरमधील पीक परिस्थिती इतर तालुक्यांच्या तुलनेत एकम ‘झकास’अशीच आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप सर्वत्र दिल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. खरिपाची पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर पाने खानाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होऊ लागला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अशी परिस्थिती असताना करवीरची पीक परिस्थिती मात्र उत्तम राहिली आहे.करवीर तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पिके चांगलीच वाढली आहेत. तसेच जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकाला पाऊस उघडला तरी पाण्याची गरज भासली नाही. तसेच कडकडीत पडलेल्या उन्हाचा पिकांच्या वाढण्यावर परिणाम झाला. याउलट इतर तालुक्यांतील स्थिती झाली. मुळातच पाऊस कमी पडल्याने व जमिनीतील ओलावा कमी झाल्याने व उन्हाचा तडाका वाढल्याने पिके कोमेजू लागली. मात्र, करवीर याला अपवाद ठरला. (प्रतिनिधी)ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी करासध्या अनेक तालुक्यांतील पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी हलकी कोळपणी करावी व माती पिकाच्या मुळाशी लावावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.पावसाच्या उघडिपीने जमिनीतील ओलावा कमी होतो व उष्णता वाढते. त्यामुळे पिकांवर आळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकांवर अशा प्रकारच्या आळ्या दिसल्यास ताबडतोब योग्य ती औषध फवारणी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करावी आणि पिके वाचवावीत.- डी. बी. पाटील,करवीर तालुका कृषी अधिकारी.