शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

करवीरची पीक परिस्थिती एकदम ‘झकास’

By admin | Updated: August 22, 2014 22:05 IST

भात पोटरीच्या अवस्थेत : सोयाबीन फुलाय लागलाय, भुईमुगाला सुटू लागल्या आऱ्या

कसबा बावडा : करवीर तालुक्यातील खरिपाची पिके जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. धुळवाफेवर पेरलेले भात आता पोटरीला आले आहे. सोयाबीन फुलाय लागलाय. भुईमूग आऱ्या सुटणेच्या अवस्थेत आहे. उसाची उंची चांगलीच वाढली असून, पेरे हाताच्या मनगटासारखी झाली आहेत. एकंदरीत करवीरमधील पीक परिस्थिती इतर तालुक्यांच्या तुलनेत एकम ‘झकास’अशीच आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप सर्वत्र दिल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. खरिपाची पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर पाने खानाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होऊ लागला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अशी परिस्थिती असताना करवीरची पीक परिस्थिती मात्र उत्तम राहिली आहे.करवीर तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पिके चांगलीच वाढली आहेत. तसेच जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकाला पाऊस उघडला तरी पाण्याची गरज भासली नाही. तसेच कडकडीत पडलेल्या उन्हाचा पिकांच्या वाढण्यावर परिणाम झाला. याउलट इतर तालुक्यांतील स्थिती झाली. मुळातच पाऊस कमी पडल्याने व जमिनीतील ओलावा कमी झाल्याने व उन्हाचा तडाका वाढल्याने पिके कोमेजू लागली. मात्र, करवीर याला अपवाद ठरला. (प्रतिनिधी)ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी करासध्या अनेक तालुक्यांतील पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी हलकी कोळपणी करावी व माती पिकाच्या मुळाशी लावावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.पावसाच्या उघडिपीने जमिनीतील ओलावा कमी होतो व उष्णता वाढते. त्यामुळे पिकांवर आळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकांवर अशा प्रकारच्या आळ्या दिसल्यास ताबडतोब योग्य ती औषध फवारणी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करावी आणि पिके वाचवावीत.- डी. बी. पाटील,करवीर तालुका कृषी अधिकारी.