शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

करवीरचा शाही दसरा

By admin | Updated: October 18, 2015 23:57 IST

शमी पूजन

‘करवीरच्या नवरात्रौत्सव पर्वाचा कलशाध्याय म्हणजे दसरा! भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे दसरा. नवरात्राच्या निमित्ताने अनुष्ठानाला बसलेले देव आणि त्यांच्या निमित्ताने व्रतस्थ असे त्यांचे भक्त नवमीला पारणं करतात. चातुर्मासाच्या निमित्ताने झाकून ठेवलेली शस्त्रास्त्रे महानवमीला घासून-पुसून लख्ख केली जातात आणि अखेरीला दिवस उजाडतो तो विजयादशमीचा. १९९० च्या दशकापर्यंत कोल्हापूरचा हा सीमोल्लंघनाचा सोहळा टेंबलाईच्या टेकडीच्या पायथ्याला रंगायचा. त्यानंतर मात्र हा सोहळा तत्कालीन ब्रिटिश प्रेसिडेन्सी आणि कोल्हापूर शहर यांच्या मध्यावर असलेल्या चाफाळ्याच्या माळावर होऊ लागला.या माळावर अधिक्याने असलेल्या चाफ्याच्या झाडामुळे या भागाला हे नाव होतं. आज आपण यालाच दसरा चौक म्हणून ओळखतो. दसऱ्याच्या आधी संस्थानच्या जरासखान्याकडून मंडप घातला जाई. लकड कोट म्हणजे लाकडाचा तात्पुरता चौक बांधून त्यात आपट्याची रास रचली जाते.पटांगणात भव्य भगवा ध्वज उभारला जातो. दसऱ्या दिवशी चारच्या दरम्यान लवाजमा निघतो. आजही लवाजमा निघतो; पण पूर्वी या लवाजम्याचा क्रम खालीलप्रमाणे असायचा.१) सर्वांत आरंभी बैलगाडीत चौघडा, त्या पाठोपाठ २) हत्तीवर भगवी ढाल (ध्वज). ती धरण्याचा मान बिनी सरनाईक यांचा. मग ३) तोफखाना. ४) जरीपटक्याचा हत्ती : जरीपटका हा सैन्याचा ध्वज. तो धारण करण्याचा मान सेनापतींचा. त्यांच्या रक्षणार्थ घोडेस्वारांचे पथक. ५) रिसाला म्हणजे लढाऊ घोडदल. ६) दुसऱ्या हौद्याचा हत्ती कै. नानासाहेब यादव यांनी दिलेल्या संदर्भानुसार. या हौद्यात श्री तुळजाभवानीच्या सुवर्णपादुका असत. ७) कोतवाली घोडे. ८) शिकारखान बैलगाडीवर १०-२० चित्ते, शिकारी कुत्रे, वाघ, सिंह, बाजनहिरी म्हणजे डोळ्यावर झापड लावलेले बहिरीससाणे मनगटावर बसवून त्यांना पाळणारे. ९) संत्री, पायदळ. १०) बाजेवाले. ११) भावी भालदार (भाल्याचे युद्ध करणारे). १२) बाणदार (धनुष्यबाणांनी लढणारे). १३) विटेकरी. १४) पोलीसदल. १५) तुरुंगाकडील शिपाई. १६) जंगलखात्याकडील शिपाई. १७) नगरपालिकेकडील लोक. १८) आधुनिक पद्धतीचा बँड. १९) पट्टेवाले. २०) करवीर पेट्याकडील अधिकारी. २१) बंदूक बारदार. २२) कोटकरी. २३) लष्कर फड. २४) देवांच्या पालख्या. २५) हुजरे. २६) जासूद. २७) म्हालदार, चोपदार. २८) हुजूर स्वारी अंबारीमध्ये किंवा सहा घोड्यांच्या सोन्याच्या रथात, त्यापाठोपाठ पंत अमात्य, पंत प्रतिनिधी इ. २९) वाड्यातील स्वाऱ्या महालच्या (सरकार स्वारींच्या कुटुंबातील महिला). ३०) शिलेदार आणि अखेरीस ३१) साहेब नौबत म्हणजे उंटावरचा नगारा. आज हे वैभव नसले तरी कोल्हापूरवासीयांना संस्थानचा अभिमान तितकाच आहे आणि त्याच उत्साहात हा दसरा आजही तितक्याच थाटात संपन्न होतो. - प्रसन्न मालेकर, कोल्हापूर शमी पूजनद्युत क्रीडेत ठरलेल्या पणाप्रमाणे पांडवांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास मिळाला होता. या अज्ञातवासात पांडवांची ओळख जर उघडकीस आली, तर त्यांना पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा लागणार होता. याकरिता विराट राजाच्या नगरीत त्यांनी प्रवेश केला. दुर्गेची प्रार्थना करून त्यांनी स्वत:ची सर्व शस्त्रे उतरवली; कारण गदा, गांडीवधनुष्य, खड्ग ही पांडवांची लक्षणच होती. त्यांनी ही शस्त्रास्त्रे सतेज रहावी म्हणून ती शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली. कारण शमी वृक्षात अग्नी असतो अशी मान्यता आहे. अज्ञातवास संपण्याच्या दिवसांत कौरवांनी विराटाच्या गायी पळवण्याचा घाट घातला. त्यावेळी याच दसऱ्याच्या दिवशी पांडवांनी आपली शस्त्रे पुन्हा धारण केली. म्हणून या शमी वृक्षाची प्रार्थना करून त्याच्या मुळाशी अपराजिता देवीची पूजा करतात. या शमीच्या प्रार्थनेचा मंत्र असा -‘‘शमी शमयते पापम् शमी शत्रू विनासिनीधारीणी अर्जुनस्य बाणानाम् रामस्य प्रियवादीनी’’