शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

विद्यानृसिंह भारतींनी माफी मागावी, अन्यथा..; कोल्हापुरातील राजर्षी शाहूप्रेमींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 11:43 IST

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी जातीव्यवस्थेवर केले होते वादग्रस्त वक्तव्य 

कोल्हापूर : करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी मनुस्मृतीवर आधारित ब्राह्मणी जातीव्यवस्था टिकली पाहिजे, आरक्षण संपले पाहिजे, असे वक्तव्य केले. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. विद्यानृसिंह भारती यांनी माफी मागावी अन्यथा करवीर पीठावर मोर्चा काढू, असा इशारा राजर्षी शाहूप्रेमींच्या बैठकीत देण्यात आला.करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी पुण्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोल्हापुरात उमटत असून राजर्षी शाहूप्रेमींची चित्रदुर्ग मठात बुधवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी सरलाताई पाटील होत्या. गिरीश फोंडे म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस ते करूच शकतात कसे? त्यांच्या मागे कोणती शक्ती कार्यरत आहे हे सांगायला नको. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, विद्यानृसिंहभारती यांना जाब विचारायचा आहे, त्यांना कोल्हापूरकरांचा हिसका दाखवत असताना शाहूंच्या भूमीत शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जिवंत असल्याचे दाखवून देऊया. जनता दलाचे रवींद्र चव्हाण म्हणाले, विद्यानृसिंहभारती यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करूया. व्यंकाप्पा भोसले म्हणाले, यापूर्वी १९७४ ला तत्कालीन शंकराचार्यांनी असे वक्तव्य केले होते, त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवला होता. ही विचारांची लढाई असून बिंदू चौकात धरणे धरत असतानाच त्यांच्यावर कारवाईसाठी आग्रह धरला पाहिजे. सतीशचंद्र कांबळे, दिलीप सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी, शंकराचार्यांनी माफी मागावी अन्यथा करवीर पीठावर मोर्चा काढण्याचा इशारा देत उद्या पोलिस अधीक्षकांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी करूया, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी अनिल चव्हाण, बाबूराव कदम, आर.के. पोवार, अशोक भंडारे, शिवाजीराव परुळेकर, संदीप देसाई, दगडू भास्कर, भारती पोवार, टी.एस. पाटील, सीमा पाटील, आदी उपस्थित होते.

शहरात कोपरा सभा घेऊया..शंकराचार्य काय बोलले? हे सामान्य माणसाला समजले पाहिजे. अन्यथा हिंदुत्ववाद्यांच्या हातात आयते कोलीत मिळेल. यासाठी कोल्हापूर शहरात २५-३० कोपरा सभा घेऊया, अशी सूचना अतुल दिघे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर