शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यानृसिंह भारतींनी माफी मागावी, अन्यथा..; कोल्हापुरातील राजर्षी शाहूप्रेमींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 11:43 IST

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी जातीव्यवस्थेवर केले होते वादग्रस्त वक्तव्य 

कोल्हापूर : करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी मनुस्मृतीवर आधारित ब्राह्मणी जातीव्यवस्था टिकली पाहिजे, आरक्षण संपले पाहिजे, असे वक्तव्य केले. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. विद्यानृसिंह भारती यांनी माफी मागावी अन्यथा करवीर पीठावर मोर्चा काढू, असा इशारा राजर्षी शाहूप्रेमींच्या बैठकीत देण्यात आला.करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी पुण्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोल्हापुरात उमटत असून राजर्षी शाहूप्रेमींची चित्रदुर्ग मठात बुधवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी सरलाताई पाटील होत्या. गिरीश फोंडे म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस ते करूच शकतात कसे? त्यांच्या मागे कोणती शक्ती कार्यरत आहे हे सांगायला नको. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, विद्यानृसिंहभारती यांना जाब विचारायचा आहे, त्यांना कोल्हापूरकरांचा हिसका दाखवत असताना शाहूंच्या भूमीत शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जिवंत असल्याचे दाखवून देऊया. जनता दलाचे रवींद्र चव्हाण म्हणाले, विद्यानृसिंहभारती यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करूया. व्यंकाप्पा भोसले म्हणाले, यापूर्वी १९७४ ला तत्कालीन शंकराचार्यांनी असे वक्तव्य केले होते, त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवला होता. ही विचारांची लढाई असून बिंदू चौकात धरणे धरत असतानाच त्यांच्यावर कारवाईसाठी आग्रह धरला पाहिजे. सतीशचंद्र कांबळे, दिलीप सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी, शंकराचार्यांनी माफी मागावी अन्यथा करवीर पीठावर मोर्चा काढण्याचा इशारा देत उद्या पोलिस अधीक्षकांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी करूया, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी अनिल चव्हाण, बाबूराव कदम, आर.के. पोवार, अशोक भंडारे, शिवाजीराव परुळेकर, संदीप देसाई, दगडू भास्कर, भारती पोवार, टी.एस. पाटील, सीमा पाटील, आदी उपस्थित होते.

शहरात कोपरा सभा घेऊया..शंकराचार्य काय बोलले? हे सामान्य माणसाला समजले पाहिजे. अन्यथा हिंदुत्ववाद्यांच्या हातात आयते कोलीत मिळेल. यासाठी कोल्हापूर शहरात २५-३० कोपरा सभा घेऊया, अशी सूचना अतुल दिघे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर