शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत कर्नाटक सरकार योग्य निर्णय घेईल, मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 18:50 IST

कन्यागत महापर्वकाळ निधीचा प्रश्न मार्गी लावू

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास त्याचे परिणाम काय होतील याचा अभ्यास केल्याशिवाय उंची वाढविणे योग्य होणार नाही. याबाबत कर्नाटक सरकारशी आम्ही बोलू. ते योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला खात्री असल्याचा विश्वास शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर व्यक्त केला. धार्मिक विधी व दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, सातत्याने येणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी गतवर्षी प्रमाणे पॅटर्न राबवून पुराचा धोका टाळला जाईल असे सांगितले. तर, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती बाबत कालबद्ध कार्यक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. २०२५ पर्यंत पंचगंगा नदी निश्चित प्रदूषणमुक्त होईल याची खात्री आम्ही देतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आज, शनिवारी दुपारी मंत्री केसरकर धार्मिक विधी व दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी येथे खासगी दौऱ्यावर आले होते. सुरुवातीस त्यांनी दत्त दर्शन घेऊन प्रार्थना केली. व कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर नातेवाईकांच्या धार्मिक विधीसाठी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने, तहसीलदार अपर्णा मोरे, दत्त देव संस्थानचे विश्वस्त सोनू उर्फ संजय पुजारी, ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते तसेच अभिजित जगदाळे, सागर धनवडे, सागर मोरबाळे, ग्रामसेवक बी एन टोने आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. दत्त देव संस्थानचे वतीने विश्वस्त सोनू उर्फ संजय पुजारी यांनी मंत्री केसरकर यांना शाल, श्रीफळ व दत्त प्रतिमा देऊन सत्कार केला.कन्यागत महापर्वकाळ निधीचा प्रश्न मार्गी लावूनृसिंहावाडी येथील कन्यागत महापर्वकाळ दुसर्या टप्प्यातील निधी बाबत ७ जानेवारीला नियोजनाच्या बैठकीत निश्चित निर्णय घेऊन रखडलेल्या निधी बाबतचा प्रश्न मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Karnatakकर्नाटक