शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचा कल्पवृक्ष लोकनेते सदाशिवराव मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये नेतृत्वाच्या साखळीतील राजकारणाचा वापर कष्टकरी, श्रमिक, शेतकरी आणि जनसामान्यांच्या हितासाठी करणाऱ्या नेतृत्वापैकी दिवगंत ल़ोकनेते सदाशिवराव मंडलिक ...

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये नेतृत्वाच्या साखळीतील राजकारणाचा वापर कष्टकरी, श्रमिक, शेतकरी आणि जनसामान्यांच्या हितासाठी करणाऱ्या नेतृत्वापैकी दिवगंत ल़ोकनेते सदाशिवराव मंडलिक हे एक असामान्य नेतृत्व होते. १० मार्च २०१५ रोजी हे कार्यकर्तृत्वाचे वादळ शमले. गेल्या पन्नास वर्षांपासून वटवृक्षाप्रमाणे असणारी छाया गायब झाल्याने कार्यकर्तेही कासावीस झाले आहेत. लोककल्याणाचा ध्यास घेऊन समाजकारण आणि राजकारणाची पायवाट मळविणाऱ्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे आज तृतीय पुण्यस्मरण करताना त्यांच्या देदीप्यमान कार्यकर्तृत्वाला दिलेला उजाळा...

१० मार्च... असा शब्द जरी मंडलिक प्रेमी कार्यकर्त्यांच्या कानावर पडला तरी त्यांच्या हृदयात चर्रर होते. तो दिवस या कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस ठरला. लोककल्याणाचा ध्यास घेऊन निरपेक्ष भावनेतून मनुष्यरूपी एक-एक बिंदू जोडून लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे घट्ट जाळे विनले आहे. त्यांच्या रूपाने जिल्ह्यासह राज्यामध्ये पुरोगामी विचारांचे करारी आणि कणखर व्यक्तिमत्त्व असणारे नेतृत्व उदयास आले. ७ ऑक्टोबर १९३४ रोजी मुरगूड येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्यामध्ये विद्यार्थीदशेपासूनच नेतृत्वगुण जडले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे आकर्षण वाटणाऱ्या मंडलिक यांना कोणताही राजकीय वारसा अथवा आर्थिक पाठबळही नव्हते. तरीही जनसामान्यांच्या भरभक्कम पाठबळ आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी सार्वजनिक जीवनात उडी घेतली. १९६७ मध्ये ते बिद्री-बोरवडे जि.प. मतदारसंघातून निवडून आले. यावेळी ते जि.प.च्या बांधकाम समितीच्या सभापतीही झाले.

बांधकाम सभापती असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला. हा अविश्वास ठराव मंजूर होऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. मात्र, ते असफलच ठरले. त्यानंतर १९७२ च्या विधान सभेसाठी त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. मात्र, काँग्रेसने ती नाकारली; परंतु रणभूमीवर माघार घेतील ते मंडलिक कसले. त्यांनी सामान्य, गोरगरीब, शेतकरी आणि काही युवकांना संघटित करून लढाईचे रणशंख फुंकले. ‘एकला चलो रे’चा नारा देत त्यांनी बंडखोरी केली. यावेळी उमेदवारीचा अर्ज दाखल केला. कागलच्या जनतेनेही या लढवय्या नेतृत्वाला सलाम करत त्यांना संधी देण्याची खून गाठ बांधली. यावेळी झालेल्या विजयानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. १९७२, १९८५, १९९०, १९९५ मध्ये चार वेळा, तर १९९८ ते २००९ पर्यंत सलग चार वेळा त्यांना लोकसभेत पाठविले.

दरम्यान, चार माणसं घरी आल्यानंतर त्यांना दोन घास खाऊ घालण्याची ऐपत नसताना राजकारणात उडी घेऊन बलाढ्य शक्ती बरोबर झुंज द्यायची, सातत्याने संघर्षमय जीवन जगायचे, आर्थिकदृष्ट्या फाटक्या माणसांचे नेतृत्व करायचे आठ ते दहा निवडणुका लढवायच्या कधी, सत्ताधाऱ्यांबरोबर, तर कधी स्वकीयांशी तर कधी गटांतर्गत संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला. मात्र, १० मार्च २०१५ हा कागलच्या राजकीय पटलावर काळा दिवसच उगवला. यादिवशी संघर्षाचे अंतहीन वादळ शमले होते. त्यांचा झालेला अंत कोल्हापुरातील लढवय्या कार्यकर्त्यांना सहन न होणाराच होता. मंडलिकांची ही पोकळी भरून न येणारी ठरली आहे. आजही त्यांच्या कार्यपद्धतीची पदोपदी आठवण येत राहते अशा या दिव्यत्व लाभलेल्या मंडलिकरूपी असामान्य व्यक्तिमत्त्वाला सलाम करावा तितका थोडाच ठरावा...!!

प्रेरणादायी कार्य

स्व. मंडलिकांनी दुधगंगेचे पाणी वेदगंगेत आणून कागल तालुक्यात हरित क्रांती साधली, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कारखान्याची उभारणी केली. सहवीज, इथेनॉल प्रकल्पाच्या उभारणीचा मनोदय केला. त्यानुसार सहवीजची उभारणी त्यांच्या हयातीतच झाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. तर इथेनॉल उभारणीसह ग्राहक संस्थेची उभारणी करून प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ, तसेच सर्वच कार्यकर्ते मंडलिकांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत. स्व. मंडलिकांच्या आठवणी आणि त्यांचे विचार भावी पिढीलाही प्रेरणादायी ठरावेत यासाठी कारखाना कार्यस्थळावर शेतकरी, सभासद व कार्यकर्ते या सर्वांच्या सहयोगातून स्व. मंडलिकांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्यामुळे हा कारखाना परिसर सर्वांसाठी प्रेरणास्थळ ठरत आहे.

-बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर

उपाध्यक्ष, सदासाखर