शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

कोल्हापूरकर! ‘काळम्मावाडी’चे पाणी सप्टेंबर महिन्यात ‘थेट’ तुमच्या दारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 16:59 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येणार असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे काम गतीने सुरू असून, एक एक महत्त्वाचे टप्पे ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येणार असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे काम गतीने सुरू असून, एक एक महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सप्टेंबर अखेर सर्व कामे पूर्ण होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी या योजनेद्वारे मिळेल, असा विश्वास माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जॅकवेलवर पाणी उपसा करणारे चार पंप बसविण्यात आले, त्याची चाचणीही झाली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आमदार सतेज पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, ठेकेदाराचे प्रतिनिधी, सल्लागार कंपनीची अधिकारी उपस्थित हाेते.दोन्ही जॅकवेलची कामे पूर्ण होऊन त्यावर पाणी उपसा करणारे चार पंपदेखील बसविण्यात आले आहेत. काळम्मावाडीपासून पुईखडीपर्यंत टाकण्यात आलेल्या ११०० एम. एम. जाडीच्या ५२ किलोमीटर जलवाहिनीपैकी ३३ किलोमीटरपर्यंत जलवाहिनीची पाणी वाहून नेण्याची क्षमता चाचणी पूर्ण झाली आहे. व्हाॅल्व्ह सेट न केल्यामुळे एका ठिकाणी मागच्या आठवड्यात गळती लागली. त्यामुळे सर्वच्या सर्व ७२ व्हॉल्व्हची एकदा तपासणी करून घ्या, मगच जलवाहिनीची चाचणी घ्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढचे सर्व व्हॉल्व्ह तपासणी करण्याकरिता आठ दिवस लागतील. त्यानंतर जलवाहिनीची चाचणी सुरू केली जाईल. परंतु, ही कामे पुढील महिन्याभरात पूर्ण होतील, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

‘अमृत’च्या ठेकेदारास सूचना

या योजनेचा एक भाग असलेल्या अमृत योजनेतील शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याचे तसेच शहराच्या विविध ठिकाणी पाण्याच्या १२ टाक्यांचे काम अपूर्ण आहे. मी स्वत: संबंधित ठेकेदाराशी चर्चा केली आहे. त्यांनी चार महिन्यांची मुदत मागितली आहे. परंतु, आम्ही तोपर्यंत थांबणार नाही. हे काम पूर्ण होईपर्यंत सध्याच्या ज्या अंतर्गत जलवाहिनी वापरात आहेत, त्याद्वारे काळम्मावाडीचे पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जुन्या जलवाहिनीवरून घरोघरी पाणी देऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन जलवाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत जुन्या जलवाहिन्यांचा वापर केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.काहीही करून सप्टेंबर अखेर कोल्हापूरकरांना काळम्मावाडी धरणाचे थेट पाइपलाइनने पाणी देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे कामाची गती वाढविण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. जॅकवेल, पंप जोडणी, जलशुद्धिकरण केंद्र, ५२ किलोमीटरची जलवाहिनी, दोन किलोमीटर अंतराची लाईन वगळता वीज कनेक्शनची २४ किलोमीटरची लाईन ओढणे अशी कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत पाणी देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर