शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

कळंबा टोलनाका फोडला

By admin | Updated: April 5, 2015 00:26 IST

कोल्हापुरात वातावरण तंग : कर्मचारी पसार

कोल्हापूर : गारगोटीहून कोल्हापूरकडे येणारी कार अडविल्यावरून चालक व कळंबा टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीमधून संतप्त नागरिकांनी कळंबा टोलनाका फोडला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. हा प्रकार समजताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, टोलनाक्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद आय.आर.बी. कंपनीचे कर्मचारी उमाकांत नारायण राजमाने (रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांनी दिली. अज्ञात ५० ते ६० जणांनी टोलनाका व केबिन, खुर्च्यांची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गारगोटी (ता. भुदरगड) येथील सुरेश आनंदराव जाधव हे कुटुंबीयांसह नवीन वॅगन आर या कारमधून सकाळी कोल्हापूरला नातेवाइकांकडे येण्यास निघाले. जाधव यांची कार कळंबा टोलनाक्यावर आली. नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे टोलची मागणी केली. यावेळी जाधव हे ‘टोल देणार नाही’, पर्यायी मार्गाने जातो, असे सांगून कार मागे घेऊ लागले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी कारमागे लोखंडी बॅरिकेटस लावले. गाडी पाठीमागे घेत असताना बॅरिकेटस गाडीला घासले. यामुळे सुरेश जाधव यांचा राग अनावर झाला. यावेळी गाडीत बसलेल्या दोन महिलांसह त्यांचे इतर बंधू हे कर्मचाऱ्यांबरोबर वाद घालू लागले. हा वाद सुरू असतानाच नागरिक हळूहळू एकत्र जमू लागले. या वादातून संतप्त जमावाने टोलनाक्यावरील केबिन व दिसेल त्या साहित्याची तोडफोड सुरू केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. या प्रकारानंतर काही काळ टोलवसुली बंद होती. पुन्हा दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी केबिन उभी करून पुन्हा टोलवसुली सुरू केली. (प्रतिनिधी)