शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

कागलला ‘चिठ्ठी’ की ‘समझोता’

By admin | Updated: March 7, 2017 00:17 IST

सभापती-उपसभापती निवडी : समान संधीमुळे पेच, भुदरगड-राधानगरी पॅटर्न राबविण्याची गरज

दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवेकागल तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पंचायत समितीमध्ये सत्तेची वाटणी बरोबरीत दिली आहे. त्यामुळे सभापती-उपसभापती निवडीतही दोन्ही पक्षांनी सत्तेची समान वाटणी करून निवडी कराव्यात, अशी येथील नागरिकांची मानसिकता आहे. राधानगरी, भुदरगडच्या धर्तीवर आता कागलमधील सभापती निवड होणार की दोन्ही पक्ष चिठ्ठीद्वारे आपले नशीब आजमावणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.२०१२ च्या निवडणुकीत भुदरगड पंचायत समितीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी ४ जागा निवडून आल्याने दोघांनाही सत्तेत सहभागी करण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील व काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना प्रत्येकी सव्वा वर्षे सभापती, उपसभापती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे पाच वर्षांत कार्यकर्ते आणि पदाधिकारी गुण्यगोविंदाने राहिले होते. तशीच परिस्थिती राधानगरी तालुक्यात उद्भवली होती. तेथे काँग्रेस, राष्ट्रवादी व जनता दलाने एकत्रित येऊन सत्ता स्थापन करून सर्वांनाच संधी उपलब्ध करून दिली होती. कागल तालुक्यात सभापती निवड चिठ्ठीवर झाली, तर यापुढील काळात कोणतेही कामकाज करताना अथवा निर्णय घेताना ठराव (बहुमत) घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे सर्वांना सत्तेत सहभागी करून एकत्रितपणे काम करणे हितावह ठरणार आहे, असे मत तालुक्यातील अनुभवी व्यक्तींतून व्यक्त होत आहे.दरम्यान, दोन्ही पक्षांकडून सभापती निवडीच्या तडजोडी झाल्या, तर आरक्षणाप्रमाणे राजश्री माने (कसबा सांगाव), मनीषा संग्राम सावंत (बानगे), कमल रघुनाथ पाटील (कापशी) यांना पहिल्या अडीच वर्षांत सभापतींचा बहुमान मिळणार आहे.