शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कागलच्या भुमिपुत्राची गरूड भरारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी ...

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी चौक ते मंत्रालय असे म्हणावे लागेल. राजकीय पंडितांनीही आवक् व्हावे, असा हा प्रवास आहे. तसे तर आम्ही मुश्रीफांचे राजकीय सहकारी आणि विरोधकही होतो. विक्रमसिंह घाटगेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. नंतर मुश्रीफ साहेब मंडलिक गटात गेले. ते आमचे राजकीय विरोधक बनले; पण या विरोधात त्यांचे दोन गुण मला आवडले. एक तर ते एका बाजूला राजकीय अपरिहार्यता म्हणून टोकाचा विरोध करतातच; पण दुसऱ्या बाजूला विरोध विसरूनही जातात. विधायक काम आणि व्यक्तिगत आडचणीत ते कट्टर विरोधकालाही छातीशी धरतात. एकच मुद्दा घेऊन खुजे राजकारण करीत नाहीत. मनात शल्य साचून ठेवीत नाहीत. त्यांनी जिल्ह्यात आज आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ते या दोन गुणांच्या जोरावरच, असे म्हणावे लागेल. माझ्यासारखा कार्यकर्ता गट तटाच्या राजकारणात त्यांचा विरोधक होता; पण मला मिळालेल्या सत्तेतून कागल शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण एकत्र काम करूया, यासाठी चांगल्या माणसासाठी पुढे आले पाहिजे, अशी भूमिका घेणारे हे नेतृत्व आहे. आज कागल शहर राज्यात आघाडीवर आहे. क वर्ग नगरपालिका असूनही महानगरपालिकेसारखी कामे झाली आहेत. देशात जे जे चांगले आहे ते कागलात असायला हवे, हा त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्याला समजून घेणारा, त्याच्या प्रत्येक सुख दुखात सामील होणारा, अडचणी ऐकून घेऊन जेवढे शक्य तेवढे सहकार्य, मदत प्रामाणिकपणे करणारा हा नेता राजकारणात वस्ताद असला तरी सामाजिक जाणिवा जपणारा संवेदनशील व्यक्तीही आहे. कार्यकर्त्यांच्या मागे हिमालयासारखी भक्कम ताकत उभी करण्याचे धाडस कोल्हापूर जिल्ह्यात फक्त आणि फक्त हसन मुश्रीफ करू शकतात. हे अनेक प्रसंग, घटनांमध्ये सिद्ध झाले आहे. राजकीय संघर्षात ते वज्राहून कठोर बनतात; पण जेव्हा कार्यकर्त्यांवर दुखाचे प्रसंग येतात तेव्हा ते मेणाहून मऊ बनतात. आपल्या कर्तृत्वान कार्यकर्त्यांला मानाची पदे मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे, सामान्य निवडणूकही सिरिअसपणे घेऊन कार्यकर्ता जिंकलाच पाहिजे म्हणून तन- मन- धन, साम दंड भेद अशा सर्वच अस्त्रांचा उपयोग करणारे मुश्रीफसाहेब आपण निवडलेल्या उमेदवाराचा विजय झालाच पाहिजे म्हणून प्रचाराचे रान उठवितात.

आज ते राज्याचे ग्रामविकासमंत्री आहेत. कामगारमंत्री म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त खाते आहे. अव्याहतपणे त्यांचे कार्य सुरू आहे. सदैव उपल्बध, कधीही भेटावे, न कंटाळता, न थकता त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू आहे. हे गेली कित्येक वर्षे अव्यहतपणे सुरू आहे. जनतेला रोज भेटायचे. यात सातत्य आहे. इतका वेळ जनतेच्या कामासाठी भेटीसाठी देणारा नेता, तसा दुर्मीळच म्हणावा लागेल. कोणीही कोणतीही समस्या घेऊन त्यांच्यासमोर उभा राहतो. रस्त्यात समारंभात अडवून त्याच्यांशी बोलू शकतो. असे नेतृत्व सहजासहजी लाभत नाही. ‘दिव्यत्वाची जिथे प्रचीती तिथे कर माझे जुळती,’ अशा नेत्याला 66 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यापुढेही त्यांची राजकीय भरारी उंच्चच उंच्च व्हावी. ही ईश्वरचरणी प्रार्थना.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा...

मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकारण जवळून पाहिले असता असे दिसते की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे कृतिशील अनुकरण केले आहे. कागलमधील भव्य अश्वारूढ पुतळा, शिवाजी चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण, छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी, सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारकासाठी भरघोस निधी, शिवराज्याभिषेकदिनी सहा जूनला शासकीय शिवस्वराज्य दिनाची घोषणा, कागल शहरात शिवछत्रपतींच्या जीवनावर मोफत नाट्य प्रयोग, असे किती तरी काम येथे सांगता येईल. पुढचा जन्म मिळाला तर मला मदारी मेहतरचा मिळावा आणि छत्रपती शिवरायांची सेवा करण्याचे भाग्य मिळावे, असे ते जाहीरपणे सांगतात.

कागलचा भूमिपुत्र...

इतकी वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद असूनही ते कागलमध्येच राहतात. मुंबई, कोल्हापूरला जाऊन स्थायिक व्हावे. असा मोह त्यांना झाला नाही. कागल शहराच्या विकासाकडे त्यांचे सदैव लक्ष आहे. या व्यापातही ते नगरसेवकांची बैठक घेऊन आढावा घेतात. आज हा आमच्या नगरीचा भूमिपुत्र राज्याच्या राजकारणात अढळ स्थानावर पोहोचला आहे. याचा समस्त कागलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा अभिमान जोपासला आहे. मुश्रीफसाहेबही एक कागलकर याच नजरेने सर्वांकडे पाहत आले आहेत.

-रमेश यशवंत माळी, कागल