शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कागलच्या भुमिपुत्राची गरूड भरारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी ...

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी चौक ते मंत्रालय असे म्हणावे लागेल. राजकीय पंडितांनीही आवक् व्हावे, असा हा प्रवास आहे. तसे तर आम्ही मुश्रीफांचे राजकीय सहकारी आणि विरोधकही होतो. विक्रमसिंह घाटगेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. नंतर मुश्रीफ साहेब मंडलिक गटात गेले. ते आमचे राजकीय विरोधक बनले; पण या विरोधात त्यांचे दोन गुण मला आवडले. एक तर ते एका बाजूला राजकीय अपरिहार्यता म्हणून टोकाचा विरोध करतातच; पण दुसऱ्या बाजूला विरोध विसरूनही जातात. विधायक काम आणि व्यक्तिगत आडचणीत ते कट्टर विरोधकालाही छातीशी धरतात. एकच मुद्दा घेऊन खुजे राजकारण करीत नाहीत. मनात शल्य साचून ठेवीत नाहीत. त्यांनी जिल्ह्यात आज आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ते या दोन गुणांच्या जोरावरच, असे म्हणावे लागेल. माझ्यासारखा कार्यकर्ता गट तटाच्या राजकारणात त्यांचा विरोधक होता; पण मला मिळालेल्या सत्तेतून कागल शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण एकत्र काम करूया, यासाठी चांगल्या माणसासाठी पुढे आले पाहिजे, अशी भूमिका घेणारे हे नेतृत्व आहे. आज कागल शहर राज्यात आघाडीवर आहे. क वर्ग नगरपालिका असूनही महानगरपालिकेसारखी कामे झाली आहेत. देशात जे जे चांगले आहे ते कागलात असायला हवे, हा त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्याला समजून घेणारा, त्याच्या प्रत्येक सुख दुखात सामील होणारा, अडचणी ऐकून घेऊन जेवढे शक्य तेवढे सहकार्य, मदत प्रामाणिकपणे करणारा हा नेता राजकारणात वस्ताद असला तरी सामाजिक जाणिवा जपणारा संवेदनशील व्यक्तीही आहे. कार्यकर्त्यांच्या मागे हिमालयासारखी भक्कम ताकत उभी करण्याचे धाडस कोल्हापूर जिल्ह्यात फक्त आणि फक्त हसन मुश्रीफ करू शकतात. हे अनेक प्रसंग, घटनांमध्ये सिद्ध झाले आहे. राजकीय संघर्षात ते वज्राहून कठोर बनतात; पण जेव्हा कार्यकर्त्यांवर दुखाचे प्रसंग येतात तेव्हा ते मेणाहून मऊ बनतात. आपल्या कर्तृत्वान कार्यकर्त्यांला मानाची पदे मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे, सामान्य निवडणूकही सिरिअसपणे घेऊन कार्यकर्ता जिंकलाच पाहिजे म्हणून तन- मन- धन, साम दंड भेद अशा सर्वच अस्त्रांचा उपयोग करणारे मुश्रीफसाहेब आपण निवडलेल्या उमेदवाराचा विजय झालाच पाहिजे म्हणून प्रचाराचे रान उठवितात.

आज ते राज्याचे ग्रामविकासमंत्री आहेत. कामगारमंत्री म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त खाते आहे. अव्याहतपणे त्यांचे कार्य सुरू आहे. सदैव उपल्बध, कधीही भेटावे, न कंटाळता, न थकता त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू आहे. हे गेली कित्येक वर्षे अव्यहतपणे सुरू आहे. जनतेला रोज भेटायचे. यात सातत्य आहे. इतका वेळ जनतेच्या कामासाठी भेटीसाठी देणारा नेता, तसा दुर्मीळच म्हणावा लागेल. कोणीही कोणतीही समस्या घेऊन त्यांच्यासमोर उभा राहतो. रस्त्यात समारंभात अडवून त्याच्यांशी बोलू शकतो. असे नेतृत्व सहजासहजी लाभत नाही. ‘दिव्यत्वाची जिथे प्रचीती तिथे कर माझे जुळती,’ अशा नेत्याला 66 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यापुढेही त्यांची राजकीय भरारी उंच्चच उंच्च व्हावी. ही ईश्वरचरणी प्रार्थना.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा...

मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकारण जवळून पाहिले असता असे दिसते की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे कृतिशील अनुकरण केले आहे. कागलमधील भव्य अश्वारूढ पुतळा, शिवाजी चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण, छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी, सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारकासाठी भरघोस निधी, शिवराज्याभिषेकदिनी सहा जूनला शासकीय शिवस्वराज्य दिनाची घोषणा, कागल शहरात शिवछत्रपतींच्या जीवनावर मोफत नाट्य प्रयोग, असे किती तरी काम येथे सांगता येईल. पुढचा जन्म मिळाला तर मला मदारी मेहतरचा मिळावा आणि छत्रपती शिवरायांची सेवा करण्याचे भाग्य मिळावे, असे ते जाहीरपणे सांगतात.

कागलचा भूमिपुत्र...

इतकी वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद असूनही ते कागलमध्येच राहतात. मुंबई, कोल्हापूरला जाऊन स्थायिक व्हावे. असा मोह त्यांना झाला नाही. कागल शहराच्या विकासाकडे त्यांचे सदैव लक्ष आहे. या व्यापातही ते नगरसेवकांची बैठक घेऊन आढावा घेतात. आज हा आमच्या नगरीचा भूमिपुत्र राज्याच्या राजकारणात अढळ स्थानावर पोहोचला आहे. याचा समस्त कागलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा अभिमान जोपासला आहे. मुश्रीफसाहेबही एक कागलकर याच नजरेने सर्वांकडे पाहत आले आहेत.

-रमेश यशवंत माळी, कागल