शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

कागलच्या भुमिपुत्राची गरूड भरारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी ...

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी चौक ते मंत्रालय असे म्हणावे लागेल. राजकीय पंडितांनीही आवक् व्हावे, असा हा प्रवास आहे. तसे तर आम्ही मुश्रीफांचे राजकीय सहकारी आणि विरोधकही होतो. विक्रमसिंह घाटगेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. नंतर मुश्रीफ साहेब मंडलिक गटात गेले. ते आमचे राजकीय विरोधक बनले; पण या विरोधात त्यांचे दोन गुण मला आवडले. एक तर ते एका बाजूला राजकीय अपरिहार्यता म्हणून टोकाचा विरोध करतातच; पण दुसऱ्या बाजूला विरोध विसरूनही जातात. विधायक काम आणि व्यक्तिगत आडचणीत ते कट्टर विरोधकालाही छातीशी धरतात. एकच मुद्दा घेऊन खुजे राजकारण करीत नाहीत. मनात शल्य साचून ठेवीत नाहीत. त्यांनी जिल्ह्यात आज आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ते या दोन गुणांच्या जोरावरच, असे म्हणावे लागेल. माझ्यासारखा कार्यकर्ता गट तटाच्या राजकारणात त्यांचा विरोधक होता; पण मला मिळालेल्या सत्तेतून कागल शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण एकत्र काम करूया, यासाठी चांगल्या माणसासाठी पुढे आले पाहिजे, अशी भूमिका घेणारे हे नेतृत्व आहे. आज कागल शहर राज्यात आघाडीवर आहे. क वर्ग नगरपालिका असूनही महानगरपालिकेसारखी कामे झाली आहेत. देशात जे जे चांगले आहे ते कागलात असायला हवे, हा त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्याला समजून घेणारा, त्याच्या प्रत्येक सुख दुखात सामील होणारा, अडचणी ऐकून घेऊन जेवढे शक्य तेवढे सहकार्य, मदत प्रामाणिकपणे करणारा हा नेता राजकारणात वस्ताद असला तरी सामाजिक जाणिवा जपणारा संवेदनशील व्यक्तीही आहे. कार्यकर्त्यांच्या मागे हिमालयासारखी भक्कम ताकत उभी करण्याचे धाडस कोल्हापूर जिल्ह्यात फक्त आणि फक्त हसन मुश्रीफ करू शकतात. हे अनेक प्रसंग, घटनांमध्ये सिद्ध झाले आहे. राजकीय संघर्षात ते वज्राहून कठोर बनतात; पण जेव्हा कार्यकर्त्यांवर दुखाचे प्रसंग येतात तेव्हा ते मेणाहून मऊ बनतात. आपल्या कर्तृत्वान कार्यकर्त्यांला मानाची पदे मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे, सामान्य निवडणूकही सिरिअसपणे घेऊन कार्यकर्ता जिंकलाच पाहिजे म्हणून तन- मन- धन, साम दंड भेद अशा सर्वच अस्त्रांचा उपयोग करणारे मुश्रीफसाहेब आपण निवडलेल्या उमेदवाराचा विजय झालाच पाहिजे म्हणून प्रचाराचे रान उठवितात.

आज ते राज्याचे ग्रामविकासमंत्री आहेत. कामगारमंत्री म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त खाते आहे. अव्याहतपणे त्यांचे कार्य सुरू आहे. सदैव उपल्बध, कधीही भेटावे, न कंटाळता, न थकता त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू आहे. हे गेली कित्येक वर्षे अव्यहतपणे सुरू आहे. जनतेला रोज भेटायचे. यात सातत्य आहे. इतका वेळ जनतेच्या कामासाठी भेटीसाठी देणारा नेता, तसा दुर्मीळच म्हणावा लागेल. कोणीही कोणतीही समस्या घेऊन त्यांच्यासमोर उभा राहतो. रस्त्यात समारंभात अडवून त्याच्यांशी बोलू शकतो. असे नेतृत्व सहजासहजी लाभत नाही. ‘दिव्यत्वाची जिथे प्रचीती तिथे कर माझे जुळती,’ अशा नेत्याला 66 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यापुढेही त्यांची राजकीय भरारी उंच्चच उंच्च व्हावी. ही ईश्वरचरणी प्रार्थना.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा...

मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकारण जवळून पाहिले असता असे दिसते की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे कृतिशील अनुकरण केले आहे. कागलमधील भव्य अश्वारूढ पुतळा, शिवाजी चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण, छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी, सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारकासाठी भरघोस निधी, शिवराज्याभिषेकदिनी सहा जूनला शासकीय शिवस्वराज्य दिनाची घोषणा, कागल शहरात शिवछत्रपतींच्या जीवनावर मोफत नाट्य प्रयोग, असे किती तरी काम येथे सांगता येईल. पुढचा जन्म मिळाला तर मला मदारी मेहतरचा मिळावा आणि छत्रपती शिवरायांची सेवा करण्याचे भाग्य मिळावे, असे ते जाहीरपणे सांगतात.

कागलचा भूमिपुत्र...

इतकी वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद असूनही ते कागलमध्येच राहतात. मुंबई, कोल्हापूरला जाऊन स्थायिक व्हावे. असा मोह त्यांना झाला नाही. कागल शहराच्या विकासाकडे त्यांचे सदैव लक्ष आहे. या व्यापातही ते नगरसेवकांची बैठक घेऊन आढावा घेतात. आज हा आमच्या नगरीचा भूमिपुत्र राज्याच्या राजकारणात अढळ स्थानावर पोहोचला आहे. याचा समस्त कागलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा अभिमान जोपासला आहे. मुश्रीफसाहेबही एक कागलकर याच नजरेने सर्वांकडे पाहत आले आहेत.

-रमेश यशवंत माळी, कागल