शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
10
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
11
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
12
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
13
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
14
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
15
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
16
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
17
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
19
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
20
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?

कागलच्या भुमिपुत्राची गरूड भरारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी ...

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत म्हटले जात होते की, बाभूळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री. ना. हसन मुश्रीफ यांच्या बाबतही गैबी चौक ते मंत्रालय असे म्हणावे लागेल. राजकीय पंडितांनीही आवक् व्हावे, असा हा प्रवास आहे. तसे तर आम्ही मुश्रीफांचे राजकीय सहकारी आणि विरोधकही होतो. विक्रमसिंह घाटगेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. नंतर मुश्रीफ साहेब मंडलिक गटात गेले. ते आमचे राजकीय विरोधक बनले; पण या विरोधात त्यांचे दोन गुण मला आवडले. एक तर ते एका बाजूला राजकीय अपरिहार्यता म्हणून टोकाचा विरोध करतातच; पण दुसऱ्या बाजूला विरोध विसरूनही जातात. विधायक काम आणि व्यक्तिगत आडचणीत ते कट्टर विरोधकालाही छातीशी धरतात. एकच मुद्दा घेऊन खुजे राजकारण करीत नाहीत. मनात शल्य साचून ठेवीत नाहीत. त्यांनी जिल्ह्यात आज आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ते या दोन गुणांच्या जोरावरच, असे म्हणावे लागेल. माझ्यासारखा कार्यकर्ता गट तटाच्या राजकारणात त्यांचा विरोधक होता; पण मला मिळालेल्या सत्तेतून कागल शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण एकत्र काम करूया, यासाठी चांगल्या माणसासाठी पुढे आले पाहिजे, अशी भूमिका घेणारे हे नेतृत्व आहे. आज कागल शहर राज्यात आघाडीवर आहे. क वर्ग नगरपालिका असूनही महानगरपालिकेसारखी कामे झाली आहेत. देशात जे जे चांगले आहे ते कागलात असायला हवे, हा त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्याला समजून घेणारा, त्याच्या प्रत्येक सुख दुखात सामील होणारा, अडचणी ऐकून घेऊन जेवढे शक्य तेवढे सहकार्य, मदत प्रामाणिकपणे करणारा हा नेता राजकारणात वस्ताद असला तरी सामाजिक जाणिवा जपणारा संवेदनशील व्यक्तीही आहे. कार्यकर्त्यांच्या मागे हिमालयासारखी भक्कम ताकत उभी करण्याचे धाडस कोल्हापूर जिल्ह्यात फक्त आणि फक्त हसन मुश्रीफ करू शकतात. हे अनेक प्रसंग, घटनांमध्ये सिद्ध झाले आहे. राजकीय संघर्षात ते वज्राहून कठोर बनतात; पण जेव्हा कार्यकर्त्यांवर दुखाचे प्रसंग येतात तेव्हा ते मेणाहून मऊ बनतात. आपल्या कर्तृत्वान कार्यकर्त्यांला मानाची पदे मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे, सामान्य निवडणूकही सिरिअसपणे घेऊन कार्यकर्ता जिंकलाच पाहिजे म्हणून तन- मन- धन, साम दंड भेद अशा सर्वच अस्त्रांचा उपयोग करणारे मुश्रीफसाहेब आपण निवडलेल्या उमेदवाराचा विजय झालाच पाहिजे म्हणून प्रचाराचे रान उठवितात.

आज ते राज्याचे ग्रामविकासमंत्री आहेत. कामगारमंत्री म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त खाते आहे. अव्याहतपणे त्यांचे कार्य सुरू आहे. सदैव उपल्बध, कधीही भेटावे, न कंटाळता, न थकता त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू आहे. हे गेली कित्येक वर्षे अव्यहतपणे सुरू आहे. जनतेला रोज भेटायचे. यात सातत्य आहे. इतका वेळ जनतेच्या कामासाठी भेटीसाठी देणारा नेता, तसा दुर्मीळच म्हणावा लागेल. कोणीही कोणतीही समस्या घेऊन त्यांच्यासमोर उभा राहतो. रस्त्यात समारंभात अडवून त्याच्यांशी बोलू शकतो. असे नेतृत्व सहजासहजी लाभत नाही. ‘दिव्यत्वाची जिथे प्रचीती तिथे कर माझे जुळती,’ अशा नेत्याला 66 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यापुढेही त्यांची राजकीय भरारी उंच्चच उंच्च व्हावी. ही ईश्वरचरणी प्रार्थना.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा...

मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकारण जवळून पाहिले असता असे दिसते की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे कृतिशील अनुकरण केले आहे. कागलमधील भव्य अश्वारूढ पुतळा, शिवाजी चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरण, छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणी, सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारकासाठी भरघोस निधी, शिवराज्याभिषेकदिनी सहा जूनला शासकीय शिवस्वराज्य दिनाची घोषणा, कागल शहरात शिवछत्रपतींच्या जीवनावर मोफत नाट्य प्रयोग, असे किती तरी काम येथे सांगता येईल. पुढचा जन्म मिळाला तर मला मदारी मेहतरचा मिळावा आणि छत्रपती शिवरायांची सेवा करण्याचे भाग्य मिळावे, असे ते जाहीरपणे सांगतात.

कागलचा भूमिपुत्र...

इतकी वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद असूनही ते कागलमध्येच राहतात. मुंबई, कोल्हापूरला जाऊन स्थायिक व्हावे. असा मोह त्यांना झाला नाही. कागल शहराच्या विकासाकडे त्यांचे सदैव लक्ष आहे. या व्यापातही ते नगरसेवकांची बैठक घेऊन आढावा घेतात. आज हा आमच्या नगरीचा भूमिपुत्र राज्याच्या राजकारणात अढळ स्थानावर पोहोचला आहे. याचा समस्त कागलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा अभिमान जोपासला आहे. मुश्रीफसाहेबही एक कागलकर याच नजरेने सर्वांकडे पाहत आले आहेत.

-रमेश यशवंत माळी, कागल