शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

ग्रामपंचायत बिनविरोध केली, पण दमडीही नाही दिली; ५० लाखांची घोषणा हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यात ४४ ग्रामपंचायती बिनविरोध

कोल्हापूर : बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ ते ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी २७ डिसेंबर २०२० रोजी केली होती. त्याआधी आर. आर. पाटील ग्रामविकास मंत्री असतानाही अशीच घोषणा केली होती. परंतु यातील एक दमडीही आतापर्यंत मिळालेली नाही. ज्या घोषणा अमलात येत नाहीत अशा घोषणा नेते का करतात असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.या घोषणेमागचा हेतू चांगला होता. राजकारणाच्या इर्षेतून गावात गटबाजी वाढते. नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याचाही गावच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे निवडणुका बिनविरोध करा आणि निधी मिळवा अशा या घोषणा करण्यात आल्या होत्या. परंतु मुळात अशा पद्धतीने आमिष दाखवून लोकशाही राज्यात निवडणूक बिनविरोध करता येणार नाही असा सूर निघाल्याने या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही.

ग्रामपंचायतींना २५ ते ५० लाखांचा निधीतत्कालीन ग्रामविकास मंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी स्वच्छता अभियान राबवले. त्यानंतर तंटामुक्त अभियानही राबवण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली तर ५० लाख रुपयांचा निधी अशी घोषणा केली होती. परंतु, त्याची नंतरच्या काळात कायदेशीरदृष्टया अंमलबजावणी करता आली नाही.

जिल्ह्यात ४४ ग्रामपंचायती बिनविरोधगेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ४२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील ४४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. अनेक छाेट्या गावांमध्ये निष्कारण निवडणुकीचे वातावरण नको म्हणून या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आल्या.

तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायतीपन्हाळा - १०राधानगरी -०८शाहूवाडी- ०५आजरा -०५भुदरगड - ०५गडहिंग्लज - ०४चंदगड - ०३गगनबावडा -०३करवीर - ०१कागल -००शिरोळ - ००हातकणंगले - ००एकूण ४४

गेल्यावर्षी आमची ग्रामपंचायतीची निवडणूक आम्ही बिनविरोध केली. परंतु त्याची शासन दरबारी काहीही दखल घेतली नाही. निवडणूक बिनविरोध केली म्हणून जादा एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. - बयाजी मिसाळ, सरपंच, आवंडी, धनगरवाडा 

जरी काही मंत्र्यांनी निवडणूक बिनविरोध झाल्यास निधी देण्याची घोषणा केली होती. तरीही कोणत्याही ग्रामपंचायतीला असा निधी मिळालेला नाही. -राजू पाेतनीस, राज्य सरचिटणीस, सरपंच परिषद

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत