शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

ग्रामपंचायत बिनविरोध केली, पण दमडीही नाही दिली; ५० लाखांची घोषणा हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यात ४४ ग्रामपंचायती बिनविरोध

कोल्हापूर : बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ ते ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी २७ डिसेंबर २०२० रोजी केली होती. त्याआधी आर. आर. पाटील ग्रामविकास मंत्री असतानाही अशीच घोषणा केली होती. परंतु यातील एक दमडीही आतापर्यंत मिळालेली नाही. ज्या घोषणा अमलात येत नाहीत अशा घोषणा नेते का करतात असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.या घोषणेमागचा हेतू चांगला होता. राजकारणाच्या इर्षेतून गावात गटबाजी वाढते. नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याचाही गावच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे निवडणुका बिनविरोध करा आणि निधी मिळवा अशा या घोषणा करण्यात आल्या होत्या. परंतु मुळात अशा पद्धतीने आमिष दाखवून लोकशाही राज्यात निवडणूक बिनविरोध करता येणार नाही असा सूर निघाल्याने या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही.

ग्रामपंचायतींना २५ ते ५० लाखांचा निधीतत्कालीन ग्रामविकास मंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी स्वच्छता अभियान राबवले. त्यानंतर तंटामुक्त अभियानही राबवण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली तर ५० लाख रुपयांचा निधी अशी घोषणा केली होती. परंतु, त्याची नंतरच्या काळात कायदेशीरदृष्टया अंमलबजावणी करता आली नाही.

जिल्ह्यात ४४ ग्रामपंचायती बिनविरोधगेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ४२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील ४४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. अनेक छाेट्या गावांमध्ये निष्कारण निवडणुकीचे वातावरण नको म्हणून या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आल्या.

तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायतीपन्हाळा - १०राधानगरी -०८शाहूवाडी- ०५आजरा -०५भुदरगड - ०५गडहिंग्लज - ०४चंदगड - ०३गगनबावडा -०३करवीर - ०१कागल -००शिरोळ - ००हातकणंगले - ००एकूण ४४

गेल्यावर्षी आमची ग्रामपंचायतीची निवडणूक आम्ही बिनविरोध केली. परंतु त्याची शासन दरबारी काहीही दखल घेतली नाही. निवडणूक बिनविरोध केली म्हणून जादा एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. - बयाजी मिसाळ, सरपंच, आवंडी, धनगरवाडा 

जरी काही मंत्र्यांनी निवडणूक बिनविरोध झाल्यास निधी देण्याची घोषणा केली होती. तरीही कोणत्याही ग्रामपंचायतीला असा निधी मिळालेला नाही. -राजू पाेतनीस, राज्य सरचिटणीस, सरपंच परिषद

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत