शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

टीईटी पास नसलेल्या १२५ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण (पास) झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब ...

कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण (पास) झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील १२५ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुदानित शाळेतील ६०, कायम विनाअनुदानित शाळांतील ४० आणि विनाअनुदानित शाळेमधील २५ शिक्षकांचा समावेश आहे.

राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी टीईटी अथवा सीटीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. शासनाने शिक्षकांना टीईटीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी डिसेंबर २०१९ पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, सेवेतील शिक्षकांना टीईटी देता आली नाही, तर काहींनी परीक्षा दिली. पण, त्यांना त्यामध्ये उत्तीर्ण होता आले नाही. अशा शिक्षकांच्या सेवा थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १२५ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. या शिक्षकांना टीईटीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आणखी संधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

पॉईंटर

एकूण शिक्षक : १४७००

अनुदानित शाळांतील शिक्षक : १२०००

विनाअनुदानित शाळांतील शिक्षक : १५००

कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक : १२००

टीईटी पास नसलेले शिक्षक : १२५

अनुदानित शाळांतील शिक्षक : ६०

विनाअनुदानित शाळांतील शिक्षक :२५

कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक : ४०

प्रतिक्रिया

नोकरीला लागताना टीईटी उत्तीर्ण होण्याची अट नव्हती. शाळेत रुजू होताना दिलेल्या ऑर्डरमध्ये तशी नोंद नव्हती. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी संधी वाढवून द्यावी.

-राजेंद्र देशमुख, शिक्षक

शासन नियमानुसार आमची भरती झाली आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच स्पर्धा, शासनाच्या उपक्रमांचे देखील काम करावे लागते. त्यामुळे टीईटीच्या तयारीला पुरेसा वेळ मिळत नाही. काही गुणांनी शिक्षकांच्या या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची संधी हुकली आहे. एक तर टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी संधी वाढवून द्यावी; अथवा सेवेत असणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीतून वगळण्यात यावे.

-अतुल कुंभार, शिक्षक

शिक्षक संघटनांचा विरोध

गेल्या दहा वर्षांपासून सेवेत असणारे शिक्षक सेवाशर्ती नियमावली १९८१ नुसार सेवेत कायम झाले आहेत. तसेच टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशी संधी मिळाली नाही. त्यांना या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने मुदतवाढ द्यावी. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत.

-भरत रसाळे, राज्याध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती

शासन नियमानुसार नियुक्ती होऊन गेल्या सात ते नऊ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णतेची अट लागू करणे चुकीचे आहे. त्यांना या अटीतून वगळण्यात यावे. नवीन नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना अट लागू करावी.

-खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समिती

शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी टीईटी अथवा सीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. एनसीआरटी आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी