शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ईर्ष्या कार्यकर्त्यांतच; मतदार स्तब्ध

By admin | Updated: October 8, 2014 21:47 IST

दररोज बदलणाऱ्या राजकीय आखाड्यामुळे मतदाराची मती मात्र गुंग

संतोष पाटील - कोल्हापूर -पै-पाहुण्यांच्या कुंडलीसह प्रत्येक मतदारांपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या पोहोचून त्यांना ‘प्रसन्न’ करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची चाललेली खटपट, दररोज एका उमेदवाराची गावात येणारी रॅली, दर पंधरा मिनिटांच्या अंतराने वाजणारी प्रचाराची रिक्षा, सकाळी व संध्याकाळी एका तरी उमेदवाराचे होणारे दर्शन, असे अस्सल निवडणुकीचे वातावरण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आहे. कार्यकर्त्यांत टोकाची ईर्ष्या असली तरीही मतदार मात्र दररोज बदलणाऱ्या परिस्थितीकडे स्तब्ध होऊनच पाहत असल्याचे चित्र आहे.शहरी व ग्रामीण असा संमिश्र चेहरा असणाऱ्या दक्षिण मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र, प्रचार, वातावरण व मतदारांचा मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न आज, मंगळवारी दिवसभर फिरून ‘लोकमत’ टीमने घेतला. जवाहरनगर, शास्त्रीनगर, आर. के. नगर, मोरेवाडी, पाचगाव, गिरगाव, दऱ्याचे वडगाव, चुये, कावणे, कळंबा, संभाजीनगर, गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, फुलेवाडी, आदी परिसरातील निवडणुकीची रंगत व जोर तपासण्याचा प्रयत्न प्रस्तुत टीमने केला.जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष्यवेधी असलेल्या येथील लढतीबाबत मतदार राजा मात्र विश्लेषण करण्यातच दंग आहे. ‘गावात सर्वाधिक मतदान साहेबांना मिळेल. मात्र, मोदी पण चांगलं वाटतात हो...! गावकऱ्यांचा कायबी अंदाज येईना बघा’, अशी बोलकी प्रतिक्रिया दऱ्याचे वडगाव येथे सकाळी गाडीची वाट पाहत बसलेल्या बाळू खाडे यांनी दिली. दररोज बदलणाऱ्या राजकीय आखाड्यामुळे मतदाराची मती मात्र गुंग झाली आहे. प्रत्येकाने नेमके काय करायचे, हे मनात पक्के ठरविले आहे. उघड बोलून कशाला अंगावर घ्या, अशीच सर्वसमावेशक मानसिकता ‘दक्षिण’मधील मतदारांची दिसली. मतदारसंघात कोठेही पोस्टरबाजी नाही किंवा पक्षाचे झेंडे नाहीत. प्रचाराचा भपकेबाजपणा जाणवत नाही. तरीही दररोज प्रत्येक मतदाराकडे एक तरी उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी भेटत आहे. गांधीनगर, वळिवडेसह मतदारसंघात कसबा बावड्यासह ‘दक्षिण’मधील कार्यकर्ते पै-पाहुण्यांसह मतदारांची यादी घेऊन फिरताना दिसतात, तर यापूर्वी कधीही भगवी-हिरवी टोपी डोकीवर न घेतलेले कार्यकर्ते जिवाचे रान करत आहेत. ग्रामीण भागात भात कापणी असल्याने बहुतांश मतदार शिवारात आहेत.गावात व गल्लीत एखाद्या उमेदवाराची रिक्षा किंवा जीप ‘गाणे वाजवून’ गेली की, काही मिनिटांत दुसरीही हजर. गावात एका उमेदवाराचे, तर वेशीवर दुसऱ्या उमेदवाराचे कार्यकर्ते जाहिराती हातात घेऊन तयारच आहेत. कार्यकर्त्यांत टोकाची ईर्ष्या आहे. मतदार मात्र शांतपणे गावचा विकास, विश्वासार्हता, लाट, मताधिक्य, आश्वासने, प्रत्यक्ष स्थिती, आदी कसोट्यांवर पडताळून पाहत आहे. विजय कोणाचाही होवो, ‘दक्षिण’चा लढा यंदाही मागील वेळीप्रमाणे लक्ष्यवेधी व क्षणाक्षणाला ठोके वाढविणारा असाच आहे. यात तसूभरही फरक पडलेला नाही.