शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

जयसिंगपूर : हे सातशे विद्यार्थी एसटीने करतात 'फ्री 'प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:49 PM

संदीप बावचे। जयसिंगपूर : राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी मोफत पास योजनेची अंमलबजावणी शिरोळ ...

ठळक मुद्देशिरोळ तालुका : नांदणी, नृसिंहवाडी सर्कलमध्ये दुष्काळसदृश योजनेची अंमलबजावणी

संदीप बावचे।जयसिंगपूर : राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळसदृश तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी मोफत पास योजनेची अंमलबजावणी शिरोळ तालुक्यात सुरू झाली आहे. नांदणी व नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मोफत पास योजनेचा लाभ घेतला आहे. जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून पास काढत आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. अन्य शासकीय ज्या सवलती आहेत, त्यांचीही अंमलबजावणी करावी, अशी मागणी या दोन सर्कलमधील गावातील नागरिकांतून होत आहे.

तालुक्यातील ज्या महसुली मंडळांमध्ये सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान साडेसातशे मिलिमीटरपेक्षा कमी झाला आहे अशा महसुली मंडळातील गावांत दुष्काळ घोषित करून शासनाने सुमारे आठ सवलती जाहीर केल्या आहेत. शिरोळ तालुक्यात एस. टी. विभागाने ही सवलत सुरू करून आपली कार्यवाही केली आहे.

शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये राज्य परिवहन विभागातर्फे ६६.६७ टक्के सवलत दिली जाते. दुष्काळसदृश म्हणून घोषित केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत शंभर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत येणाºया औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी व बस्तवाड, तर नांदणी सर्कल अंतर्गत नांदणी, हरोली, जांभळी, धरणगुत्ती, चिपरी, कोंडिग्रे, निमशिरगांव, तमदलगे, गावांतील विद्यार्थ्यांना मोफत एस. टी. पास योजनेचा लाभ मिळाला आहेदुष्काळसदृश अंतर्गत सवलतीजमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषीपंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा सवलतींचा समावेश आहे. नांदणी व नृसिंहवाडी सर्कल अंतर्गत दुष्काळसदृश म्हणून शासनाने सवलती जाहीर केल्या आहेत.

अंमलबजावणीची गरजराज्य शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला होता. याव्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यांतील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत कमी पर्जन्यमान झालेल्या ठिकाणी दुष्काळ घोषित केला आहे. याचा फायदा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी व नांदणी महसुली मंडळाला झाला आहे. त्यामुळे आठ सवलतींचा फायदा या सर्कलमधील महसुली गावांना होणार आहे. या सवलतींची देखील अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय