शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

जावीरचा आंतरराज्य टोळीचा प्रयत्न उधळला

By admin | Updated: April 4, 2015 00:29 IST

दहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी : आणखी एका साथीदाराचा शोध सुरू

कोल्हापूर : पन्हाळा येथून पोलिसांच्या हाताला हिसडा मारून व चटणी डोळ्यांत फेकून बेड्यासह पसार झालेला इचलकरंजीतील कुविख्यात गुंड संशयित बबलू ऊर्फ विजय संजय जावीर (वय ३२ रा. कारंडे मळा, शहापूर) याच्यासह त्याच्या तीन साथीदार आंतरराज्य टोळी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी हैदराबाद येथे जाऊन त्याठिकाणी दरोडा टाकण्याचा या सर्वांचा कट त्यांनी रचला होता,अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे पण,जावीरसह त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, अटक केलेल्या जावीरसह साथीदार संशयित अंकुश भगवान गरड (वय २४ रा. श्रीकृष्णनगर,तारदाळ), पिंटू उर्फ धनाजी पांडुरंंग जाधव (२४ कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी) यांना शुक्रवारी पन्हाळा येथील न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली.पन्हाळा येथे आठ डिसेंबर २०१४ ला न्यायालयात नेत असताना पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकून व हाताला हिसडा मारून पोलिसांवर हल्ला करून बबलू उर्फ विजय जावीरची त्याच्या दोन साथीदारांनी पोलिसांच्या तावडीतून सुटका केली होती. त्यानंतर हे तिघेजण दुचाकीवरून पसार झाले होते. जावीरला कोतोली येथील एका गुन्ह्णाप्रकरणी पोलीस पन्हाळा न्यायालयात हजर करत होते. इचलकरंजी येथील खूनप्रकरणी तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात होता. जावीरच्या अपहरणाचा कट त्याच्या एका साथीदाराने रचला होता. पन्हाळा येथून पसार झाल्यानंतर ते येथून मिरज येथे गेले. त्याठिकाणी रेल्वेतून ते दौंड (जि. पुणे) येथे गेले . त्याठिकाणी तिघांनी पंधरा दिवस वास्तव्य केले. त्यानंतर ते रेल्वेने परभणीमार्गे नांदेडला गेले. तीन महिने नांदेडमध्ये एका खोलीत राहिले. घरमालकाला आपण महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी याठिकाणी आलो आहे. आपण विद्यार्थी आहे, असे त्यांनी सांगितल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे. साडेतीन महिन्यांपासून या तिघांचा पोलीस शोध घेत होते. कोल्हापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस त्याच्या मागावर होते. संशयित गरड व जाधव हे जावीरला नांदेडला ठेवून ते नातेवाईकांच्या मोबाईलवरून संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कोल्हापुरातूनच गरड व जाधव याचा पाठलाग सुरू केला. अखेर नांदेड येथे पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी त्यांना कोल्हापुरात आणले. जावीरच्या अपहरणाचा कट रचण्याऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. सहाय्यक निरीक्षक विकास जाधव अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)