शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

कलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात  : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:05 IST

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान ...

ठळक मुद्देकलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात  : माधव भंडारी​​​​​​​ भारतीय जनता पक्षाच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. त्यामुळेच भाजपने ३७० कलम रद्द करत खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरला राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी दुपारी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर एकेकाळी काश्मीरमध्ये जाण्यासाठी व्हिसाप्रमाणे अन्य भारतीयांना परमिट घ्यावे लागत होते. याविरोधात जनसंघाने मोठे जनआंदोलन उभारले. संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्याबद्दल २१ दिवस तुरुंगवास झाला. त्यांच्या बलिदानाची परिपूर्ती हे कलम रद्द करून भाजपने केली आहे.

हे कलम रद्द झाल्याने आता केंद्र सरकारच्या रोजगार हमीपासून शिक्षण, रस्ते, आरोग्य सुविधांच्या विविध योजना थेट जम्मू-काश्मीरमध्ये अवलंबल्या जातील. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा, असाच हा निर्णय आहे.स्वागत जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर भाजप संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, नगरसेविका भाग्यश्री शेटके, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायणन, अ‍ॅड. संपत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील, बाबा इंदूलकर, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, रवींद्र मुतगी, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरkolhapurकोल्हापूर