शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात  : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:05 IST

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान ...

ठळक मुद्देकलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात  : माधव भंडारी​​​​​​​ भारतीय जनता पक्षाच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. त्यामुळेच भाजपने ३७० कलम रद्द करत खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरला राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी दुपारी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर एकेकाळी काश्मीरमध्ये जाण्यासाठी व्हिसाप्रमाणे अन्य भारतीयांना परमिट घ्यावे लागत होते. याविरोधात जनसंघाने मोठे जनआंदोलन उभारले. संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्याबद्दल २१ दिवस तुरुंगवास झाला. त्यांच्या बलिदानाची परिपूर्ती हे कलम रद्द करून भाजपने केली आहे.

हे कलम रद्द झाल्याने आता केंद्र सरकारच्या रोजगार हमीपासून शिक्षण, रस्ते, आरोग्य सुविधांच्या विविध योजना थेट जम्मू-काश्मीरमध्ये अवलंबल्या जातील. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा, असाच हा निर्णय आहे.स्वागत जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर भाजप संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, नगरसेविका भाग्यश्री शेटके, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायणन, अ‍ॅड. संपत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील, बाबा इंदूलकर, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, रवींद्र मुतगी, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरkolhapurकोल्हापूर