शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

‘जलयुक्त’साठी कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावे निश्चित

By admin | Updated: April 12, 2017 16:33 IST

बैठकीत शिक्कामोर्तब : जादा गावे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांतदादा पाटील

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १२ : जलयुक्त शिवार योजनेसाठी २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील १८ गावांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत या गावांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यामध्ये आणखी जादा ३८ गावे वाढविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजयसिंह देशमुख, वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले आदींची होती.पाणलोट एकात्मिक योजनेतून ५० टक्के काम झालेली गावे व आमदारांनी सुचविलेल्या गावांचा समन्वय ठेवून २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी १८ गावांची निवड करण्यात आली आहे. यंदा ५६ गावे या योजनेसाठी घ्यावीत कारण यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो असे सुचविण्यात आल्याने. निवडण्यात आलेल्या १८ गावांसह आणखी ३८ गावे वाढवून २० कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी आणता येऊ शकतो. त्यामुळे यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करु असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये काही तक्रारी आहेत. परंतु त्या गंभीर स्वरुपाच्या नाहीत. तसेच २०१६-१७पर्यंत झालेल्या या योजनेतील कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात आली आहेत. तमदलगे (ता. हातकणंगले) येथील कामाबाबत तक्रारी होत्या. त्याची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये तथ्थ आढळले आहे. त्याप्रमाणे शासनाला अहवाल सादर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले.निवडलेली १८ गावेकरवीर-खाटांगळे, सादळे मादळेगगनबवडा-वेसरफभुदरगड-कोंडोशी, लोटेवाडीआजरा-आर्दाळहातकणंगले-अंबपवाडीशिरोळ-कोंडीग्रेपन्हाळा-पोहाळे तर्फ आळते, कुशिरे तर्फ ठाणेशाहुवाडी-आकुर्लेराधानगरी-पडळी, रामणवाडीकागल-मांगनूरगडहिंग्लज-तेगीनहाळ, कवळीकट्टीचंदगड-गुडवळे खालसा, मजरे कारवे