शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Jain Monk Tarun Sagar : कोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:28 IST

क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे यथोचित स्मारक व्हावेसमस्त जैन बांधवांतर्फे ‘विनयांजली’प्रसंगी मागणी

कोल्हापूर : क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.शुक्रवार पेठेतील जैन मठात राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांना ‘विनयांजली’ अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत उपस्थितांमधून असा सूर उमटला. सभेसाठी डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी विशेष उपस्थित होते.भारतीय जैन संघाचे पारस ओसवाल म्हणाले, महाराजांनी श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथांच्या लोकांना एकत्र आणले. राष्ट्रीय जैन मायनॉरिटीजचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराजांनी केवळ जैन धर्मियांनाच नव्हे, तर बहुजन समाजालाही प्रेरणा देणारे कार्य केले आहे.|पद्मिनी कापसे म्हणाल्या, आपल्या संपूर्ण प्रवचनात महिलांचा सन्मान होईल, अशी शिकवण महाराजांनी दिली. आई-वडील हे ईश्वरासमान आहेत. घरातून बाहेर पडताना त्यांना नतमस्तक झाले पाहिजे, असे सांगणारे ते एकमात्र तरुणसागर महाराज होते.पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असणाऱ्या भगवान महावीर अध्यासन केंद्रांतर्गत मुनीश्री तरुणसागर महाराजांचे चिरंतन स्मारक व्हावे. त्यामध्ये महाराजांच्या संपूर्ण शिकवणीचा अभ्यास, ग्रंथालय, शिष्यवृत्ती, आदींचा समावेश असावा, अशी भावना व्यक्त केली. त्यास सर्व उपस्थितांनी हात वर करून संमती दिली.यावेळी मेजर एन. एन. पाटील, अ‍ॅड. महावीर बिंदगे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, आदींनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुधीर अलगौडर, सुनील पाटील, संजय आडके, अशोक रोटे, अमृत वणकुद्रे, सुशांत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

णमोकार महामंत्रातून विनयांजलीराष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराजांनी जैन समाजातील मरगळ दूर केली. नव्या क्रांतीची जागृती केली. त्यातून जैनधर्मीयच नव्हे तर सर्व धर्मियांमध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केले. त्यांचे विचार समाजाने पुढे नेले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. लक्ष्मीसेन महास्वामींनी आपल्या आशीर्वचनात केले. यावेळी उपस्थितांनी स्वर्गस्थ महाराजांना णमोकार महामंत्रातून विनयांजली अर्पण केली. 

 

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरkolhapurकोल्हापूर