शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Jain Monk Tarun Sagar : कोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:28 IST

क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे यथोचित स्मारक व्हावेसमस्त जैन बांधवांतर्फे ‘विनयांजली’प्रसंगी मागणी

कोल्हापूर : क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.शुक्रवार पेठेतील जैन मठात राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांना ‘विनयांजली’ अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत उपस्थितांमधून असा सूर उमटला. सभेसाठी डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी विशेष उपस्थित होते.भारतीय जैन संघाचे पारस ओसवाल म्हणाले, महाराजांनी श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथांच्या लोकांना एकत्र आणले. राष्ट्रीय जैन मायनॉरिटीजचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराजांनी केवळ जैन धर्मियांनाच नव्हे, तर बहुजन समाजालाही प्रेरणा देणारे कार्य केले आहे.|पद्मिनी कापसे म्हणाल्या, आपल्या संपूर्ण प्रवचनात महिलांचा सन्मान होईल, अशी शिकवण महाराजांनी दिली. आई-वडील हे ईश्वरासमान आहेत. घरातून बाहेर पडताना त्यांना नतमस्तक झाले पाहिजे, असे सांगणारे ते एकमात्र तरुणसागर महाराज होते.पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असणाऱ्या भगवान महावीर अध्यासन केंद्रांतर्गत मुनीश्री तरुणसागर महाराजांचे चिरंतन स्मारक व्हावे. त्यामध्ये महाराजांच्या संपूर्ण शिकवणीचा अभ्यास, ग्रंथालय, शिष्यवृत्ती, आदींचा समावेश असावा, अशी भावना व्यक्त केली. त्यास सर्व उपस्थितांनी हात वर करून संमती दिली.यावेळी मेजर एन. एन. पाटील, अ‍ॅड. महावीर बिंदगे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, आदींनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुधीर अलगौडर, सुनील पाटील, संजय आडके, अशोक रोटे, अमृत वणकुद्रे, सुशांत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

णमोकार महामंत्रातून विनयांजलीराष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराजांनी जैन समाजातील मरगळ दूर केली. नव्या क्रांतीची जागृती केली. त्यातून जैनधर्मीयच नव्हे तर सर्व धर्मियांमध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केले. त्यांचे विचार समाजाने पुढे नेले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. लक्ष्मीसेन महास्वामींनी आपल्या आशीर्वचनात केले. यावेळी उपस्थितांनी स्वर्गस्थ महाराजांना णमोकार महामंत्रातून विनयांजली अर्पण केली. 

 

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरkolhapurकोल्हापूर