शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलदारांच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली : भालचंद्र कानगो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:09 IST

२०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले.

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्यांचा आयटक आणि कामगार हिताच्या विचारांना विरोध, तर भांडवलदारांना पाठिंबा आहे, अशा विचारांचे सरकार सध्या देशात सत्तेवर आहे. देशातील सरकारने कामगारांसाठी काम करावे, असे वाटत असेल तर सध्याच्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आता आली आहे. या सरकारला सत्तेतून बाहेर काढून घरचा रस्ता दाखविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करा, असे आवाहन ‘आयटक’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी येथे केले.ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) १९ व्या राज्य अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी दसरा चौक येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष दिलीप पोवार होते. कानगो म्हणाले, कामगार विरोधी सरकार केवळ भांडवलदारांसाठी देशाचा कारभार करीत आहे. देशाच्या कारभार कोणासाठी हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. २०२४ मध्ये मतदानाच्या माध्यमातून ते आपल्याला दाखवून द्यावे लागेल.‘आयटक’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा म्हणाले, सार्वजनिक उद्योग कवडीमोल दराने भांडवलदारांच्या घशामध्ये घातले जात आहेत. त्यामुळे कामगारांनी सामाजिक, राजकीय दृष्टीने सक्रिय व्हावे.राज्यपालांनी त्वरित राजीनामा द्यावाछत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत; पण राज्यपाल सातत्याने त्यांचा अवमान करीत आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. गायरान जमिनीवर ज्यांचे अतिक्रमण आहे, ती जमीन त्या व्यक्तीच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी डॉ. कानगो यांनी या ठरावांद्वारे केली.हिवाळी अधिवेशनावर सर्व कामगार संघटनांचा मोर्चामहाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला गेले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या संख्येने बेरोजगारी निर्माण होणार आहे. याचा जाब सध्याच्या ईडी सरकारला विचारण्यासाठी २८ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.मोदींच्या पराभवाचा ठरावपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या सुरक्षेचे सर्व कायदे मोडीत काढले आहेत. सरकारी संस्थांचे गतीने खासगीकरण करीत आहेत. कामगार नेहमी खाली मान घालून काम करावेत आणि भांडवलदार, मोठ्या उद्योजकांना फायदा व्हावा, असे धोरण पंतप्रधान मोदी राबवत आहेत. यामुळे २०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले.मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याईव्हीएम यंत्रावरील निवडणुकांवर अनेकांचे आक्षेप आहेत. यामुळे प्रगत देशात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका होतात. प्रगत देशाचा आदर्श घेऊन देशातही सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, असा ठराव करण्यात आल्याचे कानगो यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकार