शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

भांडवलदारांच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली : भालचंद्र कानगो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:09 IST

२०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले.

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्यांचा आयटक आणि कामगार हिताच्या विचारांना विरोध, तर भांडवलदारांना पाठिंबा आहे, अशा विचारांचे सरकार सध्या देशात सत्तेवर आहे. देशातील सरकारने कामगारांसाठी काम करावे, असे वाटत असेल तर सध्याच्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आता आली आहे. या सरकारला सत्तेतून बाहेर काढून घरचा रस्ता दाखविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करा, असे आवाहन ‘आयटक’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी येथे केले.ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) १९ व्या राज्य अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी दसरा चौक येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष दिलीप पोवार होते. कानगो म्हणाले, कामगार विरोधी सरकार केवळ भांडवलदारांसाठी देशाचा कारभार करीत आहे. देशाच्या कारभार कोणासाठी हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. २०२४ मध्ये मतदानाच्या माध्यमातून ते आपल्याला दाखवून द्यावे लागेल.‘आयटक’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा म्हणाले, सार्वजनिक उद्योग कवडीमोल दराने भांडवलदारांच्या घशामध्ये घातले जात आहेत. त्यामुळे कामगारांनी सामाजिक, राजकीय दृष्टीने सक्रिय व्हावे.राज्यपालांनी त्वरित राजीनामा द्यावाछत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत; पण राज्यपाल सातत्याने त्यांचा अवमान करीत आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. गायरान जमिनीवर ज्यांचे अतिक्रमण आहे, ती जमीन त्या व्यक्तीच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी डॉ. कानगो यांनी या ठरावांद्वारे केली.हिवाळी अधिवेशनावर सर्व कामगार संघटनांचा मोर्चामहाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला गेले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या संख्येने बेरोजगारी निर्माण होणार आहे. याचा जाब सध्याच्या ईडी सरकारला विचारण्यासाठी २८ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.मोदींच्या पराभवाचा ठरावपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या सुरक्षेचे सर्व कायदे मोडीत काढले आहेत. सरकारी संस्थांचे गतीने खासगीकरण करीत आहेत. कामगार नेहमी खाली मान घालून काम करावेत आणि भांडवलदार, मोठ्या उद्योजकांना फायदा व्हावा, असे धोरण पंतप्रधान मोदी राबवत आहेत. यामुळे २०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले.मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याईव्हीएम यंत्रावरील निवडणुकांवर अनेकांचे आक्षेप आहेत. यामुळे प्रगत देशात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका होतात. प्रगत देशाचा आदर्श घेऊन देशातही सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, असा ठराव करण्यात आल्याचे कानगो यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकार