शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

भांडवलदारांच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली : भालचंद्र कानगो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:09 IST

२०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले.

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्यांचा आयटक आणि कामगार हिताच्या विचारांना विरोध, तर भांडवलदारांना पाठिंबा आहे, अशा विचारांचे सरकार सध्या देशात सत्तेवर आहे. देशातील सरकारने कामगारांसाठी काम करावे, असे वाटत असेल तर सध्याच्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आता आली आहे. या सरकारला सत्तेतून बाहेर काढून घरचा रस्ता दाखविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करा, असे आवाहन ‘आयटक’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी येथे केले.ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) १९ व्या राज्य अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी दसरा चौक येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष दिलीप पोवार होते. कानगो म्हणाले, कामगार विरोधी सरकार केवळ भांडवलदारांसाठी देशाचा कारभार करीत आहे. देशाच्या कारभार कोणासाठी हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. २०२४ मध्ये मतदानाच्या माध्यमातून ते आपल्याला दाखवून द्यावे लागेल.‘आयटक’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा म्हणाले, सार्वजनिक उद्योग कवडीमोल दराने भांडवलदारांच्या घशामध्ये घातले जात आहेत. त्यामुळे कामगारांनी सामाजिक, राजकीय दृष्टीने सक्रिय व्हावे.राज्यपालांनी त्वरित राजीनामा द्यावाछत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत; पण राज्यपाल सातत्याने त्यांचा अवमान करीत आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. गायरान जमिनीवर ज्यांचे अतिक्रमण आहे, ती जमीन त्या व्यक्तीच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी डॉ. कानगो यांनी या ठरावांद्वारे केली.हिवाळी अधिवेशनावर सर्व कामगार संघटनांचा मोर्चामहाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला गेले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या संख्येने बेरोजगारी निर्माण होणार आहे. याचा जाब सध्याच्या ईडी सरकारला विचारण्यासाठी २८ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.मोदींच्या पराभवाचा ठरावपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या सुरक्षेचे सर्व कायदे मोडीत काढले आहेत. सरकारी संस्थांचे गतीने खासगीकरण करीत आहेत. कामगार नेहमी खाली मान घालून काम करावेत आणि भांडवलदार, मोठ्या उद्योजकांना फायदा व्हावा, असे धोरण पंतप्रधान मोदी राबवत आहेत. यामुळे २०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले.मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याईव्हीएम यंत्रावरील निवडणुकांवर अनेकांचे आक्षेप आहेत. यामुळे प्रगत देशात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका होतात. प्रगत देशाचा आदर्श घेऊन देशातही सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, असा ठराव करण्यात आल्याचे कानगो यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकार