शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा धंदा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:38 IST

मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा

कोल्हापूर : कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा नवीन धंदा राज्यात सुरू झाला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर शुक्रवारी हल्लाबोल केला.मागच्या महिन्या दोन महिन्यात जे अध्यादेश काढले गेले त्यांची संख्या जवळपास ३५० इतकी आहे आणि त्याची अंमलबजावणी करायची म्हटले तर एक लाख ४४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा लागली आहे. जे मिळेल ते लुटा असं सगळं राज्य चालले असल्याची टीका त्यांनी केली.जे जे अध्यादेश काढले, त्यामुळे लोक दुखावले जात आहेत. धनगरांसाठी अध्यादेश काढला, त्यामुळे ओबीसी दुखावला गेला. तो मंत्रालयात उड्या मारतो आहे. त्यांनी भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. केवढे दुर्दैव आहे. उपेक्षित आमदारांना तीन दिवसापासून वेळ मिळत नसेल तर राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत हे स्पष्ट झाले, असे वडेट्टीवार म्हणाले.

..त्यावेळी दिवा जास्त फडफडतोदिवा विझायला लागतो त्यावेळी जास्त फडफडतो. महायुतीचा दिवा विझणारच आहे. त्यातील तेल संपले आहे. सरकारचे तेल आता संपले आहे. कालच तीस हजार कोटींचे ओव्हरड्राफ्ट सरकारने काढले. म्हणजे कर्ज काढून लग्न करा आणि घराला बरबाद करा, असा सरकारचा फंडा दिसतोय, असेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारGovernmentसरकार