शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा धंदा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:38 IST

मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा

कोल्हापूर : कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा नवीन धंदा राज्यात सुरू झाला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर शुक्रवारी हल्लाबोल केला.मागच्या महिन्या दोन महिन्यात जे अध्यादेश काढले गेले त्यांची संख्या जवळपास ३५० इतकी आहे आणि त्याची अंमलबजावणी करायची म्हटले तर एक लाख ४४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा लागली आहे. जे मिळेल ते लुटा असं सगळं राज्य चालले असल्याची टीका त्यांनी केली.जे जे अध्यादेश काढले, त्यामुळे लोक दुखावले जात आहेत. धनगरांसाठी अध्यादेश काढला, त्यामुळे ओबीसी दुखावला गेला. तो मंत्रालयात उड्या मारतो आहे. त्यांनी भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. केवढे दुर्दैव आहे. उपेक्षित आमदारांना तीन दिवसापासून वेळ मिळत नसेल तर राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत हे स्पष्ट झाले, असे वडेट्टीवार म्हणाले.

..त्यावेळी दिवा जास्त फडफडतोदिवा विझायला लागतो त्यावेळी जास्त फडफडतो. महायुतीचा दिवा विझणारच आहे. त्यातील तेल संपले आहे. सरकारचे तेल आता संपले आहे. कालच तीस हजार कोटींचे ओव्हरड्राफ्ट सरकारने काढले. म्हणजे कर्ज काढून लग्न करा आणि घराला बरबाद करा, असा सरकारचा फंडा दिसतोय, असेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारGovernmentसरकार