शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विश्वकर्मा योजना: कोल्हापूर जिल्ह्यात १८ हजार कारागीर, दोन हजारांनाच मिळाली ‘ओळख’

By पोपट केशव पवार | Updated: May 4, 2024 17:07 IST

ग्रामपंचायत व राज्य स्तरावर अर्ज प्रलंबित

पोपट पवार कोल्हापूर : पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२३ मध्ये विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेतून लाखो नागरिकांना लाभ मिळत असल्याचा दावाही पंतप्रधानांनी नुकताच कोल्हापुरात केला. मात्र, या योजनेची कोल्हापुरात मात्र म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे.

ही योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत जिल्ह्यातील १८ हजार ३९८ नागरिकांनी या योजनेत कारागीर म्हणून ओळख मिळवण्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र, यातील केवळ २१३९ नागरिकांनाच कारागीर म्हणून मान्यता मिळाली असून उर्वरित नागरिकांचे अर्ज अद्यापही ग्रामपंचायत व राज्यस्तरावरच प्रलंबित आहेत. त्यामुळे पारंपरिक कौशल्य असूनही शासनाच्या लेखी कारागीर म्हणून ओळख मिळत नसल्याने विश्वकर्मा योजनेतून लाभ मिळणे अवघड झाले आहे.प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही कारागिरांना लाभ मिळवून देणारी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागिरांना सामान्य सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्रात नि:शुल्क नोंदणी करता येते. ती नोंदणी झाल्यानंतर त्यांचे अर्ज ग्रामपंचायतीमध्ये पडताळणीसाठी जातात. जिल्ह्यात १८ हजारांपैकी १२ हजार अर्ज जिल्हास्तरावर पाठवण्यात आले. उर्वरित ६ हजार १६० अर्ज अद्यापही ग्रामपंचायत स्तरावरच प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे या जिल्हास्तरावरील समितीने १२ हजार ११४ अर्ज राज्यस्तरावर पाठवले. त्यापैकी केवळ २१३९ कारागिरांच्या अर्जांनाच मान्यता देत त्यांना कारागीर म्हणून ओळखपत्र दिले आहे.

१८ प्रकारच्या कारागिरांचा समावेशसुतार, बोट बनविणारा, चिलखत बनिवणारा, लोहार, औजारे बनविणारा, शिल्पकार, मूर्तिकार, सोनार, कुंभार, विणकर यासह १८ प्रकारच्या कारागिरांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून लाभ दिला जातो.

‘विश्वकर्मा’मधून कोणता लाभ मिळतो?पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळालेल्या नागरिकाला सुरुवातीला प्रशिक्षण घ्यावे लागते. ते पूर्ण झाले की बँकांकडे अर्ज केल्यानंतर पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज फक्त ५ टक्के व्याजदराने मिळते. पुढे ३ लाख रुपयांपर्यंतचे विनाहमी कर्ज मिळते.

विश्वकर्मा योजनेत मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. याची जिल्हास्तरावर कोणतीच प्रलंबित प्रकरणे नाहीत. ग्रामपंचायत पातळीवरील प्रलंबित अर्जांचा निपटारा करून त्यांनी ते जिल्हास्तरावर पाठवणे गरजेचे आहे. - श्रीकांत जौंजाळ, सदस्य, विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर