शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कोणाला कशाचेच काही वाटत नाही हे धोकादायक - गिरीश कुबेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:43 IST

सुनीलकुमार लवटे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

कोल्हापूर : आणीबाणीच्या काळात उसळून रस्त्यावर उतरलेला मध्यमवर्गीय आता आर्थिक स्थिरता आल्यानंतर थंडावला आहे. अर्थसंपन्नता आली तशी वैचारिक संपन्नता कमी झाली. त्यामुळे कोणीही कसेही वागले, कसेही निर्णय घेतले, कोणावरही अन्याय केला, तरी कोणाला कशाचेच काही वाटत नाही. लोकशाहीची आसही राहिली नाही. ही देशभरातील अवस्था धाेकादायक आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी दिला.डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहाेत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा इतिहास, वर्तमान आणि भविष्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जळगावपासून बेळगावपर्यंतच्या लवटेप्रेमींनी तुडुंब गर्दी केली होती. यावेळी डॉ. लवटे आणि रेखा लवटे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, लवटे यांच्याविषयीच्या दोन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.कुबेर म्हणाले, इतिहासाकडे पाहिले, तर तर्कवादाचा देशभरातील उगम महाराष्ट्रात झाला. प्रबोधनाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. महात्मा फुलेंनी बौद्धिक पुनरूत्थानाची चळवळ सुरू केली. बाळशास्त्री जांभेकरांनी शोषण हा शब्द पहिल्यांदा वापरला. ताराबाई शिंदे, विठाबाई, चिपळूणकर, रानडे यांच्या काळाचा आवश्यक अभ्यास झाला नाही. महाराष्ट्राचा हा तुटलेला वैचारिक धागा कसा जोडायचा हा प्रश्न आहे. सध्याची भारतीय मानसिक पौरूषता नियम मोडण्याच्या क्षमतेशी जोडली गेली आहे.महाराष्ट्राबाबत बोलताना ते म्हणाले, १९९२ पूर्वीचा मुंबई दंगल होण्याआधीचा आणि नंतरचा महाराष्ट्र असे दोन महाराष्ट्र दिसून येतात. अर्थसुधारणांनी मध्यमवर्गीयांना आर्थिक स्थैर्य आले आणि प्रबोधनाची गरज वाटेनाशी झाली. सुखांतपणा, डोक्याला ताप नको ही वृत्ती जर आपले वर्तमान असेल, तर भविष्य अंधकारमय आहे. परदेशात नोकरीसाठी जाणारी मुले हे मोठे आव्हान भारतासमोर आहे.सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. जी. पी. माळी यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम, निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. माणिकराव साळुंखे, राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अर्जुन चव्हाण, डाॅ. रमेश जाधव, महावीर जोंधळे, हसन देसाई, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रभाकर हेरवाडे, डॉ. विश्वास सुतार, मेधा पानसरे, डॉ. मंजुश्री पवार, सौम्या तिरोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वर्षभरातील कार्यक्रमांबद्दल कौतुकडॉ. जयसिंगराव पवार यांनी लवटे यांच्या अमृतमहाेत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम राबविण्यात आले याचे कौतुक केले. ते म्हणाले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या १८ खंडांचे लवटे यांनी केलेले काम ही त्यांची मोठी महाराष्ट्र सेवा आहे. सयाजी गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्राची प्रबोधनपरंपरा जपण्यासाठी इतिहासाचा डोळस अभ्यास आवश्यक आहे.

चिमटे, टोले आणि हास्याचा खळखळाटसर्वच वक्त्यांनी आपल्या बोलण्यात कुठेही सत्तारूढांचे एकदाही नाव घेतले नाही, परंतु असे काही दाखले दिले आणि आता तुलना तुम्हीच करा, असे सांगत अप्रत्यक्ष टोले असे मारले की, गडकरी सभागृह काही वेळा हास्यात बुडाले, तर काही वेळा टाळ्यांचा कडकडाटात हरवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर