शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोणाला कशाचेच काही वाटत नाही हे धोकादायक - गिरीश कुबेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:43 IST

सुनीलकुमार लवटे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

कोल्हापूर : आणीबाणीच्या काळात उसळून रस्त्यावर उतरलेला मध्यमवर्गीय आता आर्थिक स्थिरता आल्यानंतर थंडावला आहे. अर्थसंपन्नता आली तशी वैचारिक संपन्नता कमी झाली. त्यामुळे कोणीही कसेही वागले, कसेही निर्णय घेतले, कोणावरही अन्याय केला, तरी कोणाला कशाचेच काही वाटत नाही. लोकशाहीची आसही राहिली नाही. ही देशभरातील अवस्था धाेकादायक आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी दिला.डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहाेत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा इतिहास, वर्तमान आणि भविष्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जळगावपासून बेळगावपर्यंतच्या लवटेप्रेमींनी तुडुंब गर्दी केली होती. यावेळी डॉ. लवटे आणि रेखा लवटे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, लवटे यांच्याविषयीच्या दोन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.कुबेर म्हणाले, इतिहासाकडे पाहिले, तर तर्कवादाचा देशभरातील उगम महाराष्ट्रात झाला. प्रबोधनाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. महात्मा फुलेंनी बौद्धिक पुनरूत्थानाची चळवळ सुरू केली. बाळशास्त्री जांभेकरांनी शोषण हा शब्द पहिल्यांदा वापरला. ताराबाई शिंदे, विठाबाई, चिपळूणकर, रानडे यांच्या काळाचा आवश्यक अभ्यास झाला नाही. महाराष्ट्राचा हा तुटलेला वैचारिक धागा कसा जोडायचा हा प्रश्न आहे. सध्याची भारतीय मानसिक पौरूषता नियम मोडण्याच्या क्षमतेशी जोडली गेली आहे.महाराष्ट्राबाबत बोलताना ते म्हणाले, १९९२ पूर्वीचा मुंबई दंगल होण्याआधीचा आणि नंतरचा महाराष्ट्र असे दोन महाराष्ट्र दिसून येतात. अर्थसुधारणांनी मध्यमवर्गीयांना आर्थिक स्थैर्य आले आणि प्रबोधनाची गरज वाटेनाशी झाली. सुखांतपणा, डोक्याला ताप नको ही वृत्ती जर आपले वर्तमान असेल, तर भविष्य अंधकारमय आहे. परदेशात नोकरीसाठी जाणारी मुले हे मोठे आव्हान भारतासमोर आहे.सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. जी. पी. माळी यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम, निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. माणिकराव साळुंखे, राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अर्जुन चव्हाण, डाॅ. रमेश जाधव, महावीर जोंधळे, हसन देसाई, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रभाकर हेरवाडे, डॉ. विश्वास सुतार, मेधा पानसरे, डॉ. मंजुश्री पवार, सौम्या तिरोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वर्षभरातील कार्यक्रमांबद्दल कौतुकडॉ. जयसिंगराव पवार यांनी लवटे यांच्या अमृतमहाेत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम राबविण्यात आले याचे कौतुक केले. ते म्हणाले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या १८ खंडांचे लवटे यांनी केलेले काम ही त्यांची मोठी महाराष्ट्र सेवा आहे. सयाजी गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्राची प्रबोधनपरंपरा जपण्यासाठी इतिहासाचा डोळस अभ्यास आवश्यक आहे.

चिमटे, टोले आणि हास्याचा खळखळाटसर्वच वक्त्यांनी आपल्या बोलण्यात कुठेही सत्तारूढांचे एकदाही नाव घेतले नाही, परंतु असे काही दाखले दिले आणि आता तुलना तुम्हीच करा, असे सांगत अप्रत्यक्ष टोले असे मारले की, गडकरी सभागृह काही वेळा हास्यात बुडाले, तर काही वेळा टाळ्यांचा कडकडाटात हरवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर