शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

कोणाला कशाचेच काही वाटत नाही हे धोकादायक - गिरीश कुबेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:43 IST

सुनीलकुमार लवटे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

कोल्हापूर : आणीबाणीच्या काळात उसळून रस्त्यावर उतरलेला मध्यमवर्गीय आता आर्थिक स्थिरता आल्यानंतर थंडावला आहे. अर्थसंपन्नता आली तशी वैचारिक संपन्नता कमी झाली. त्यामुळे कोणीही कसेही वागले, कसेही निर्णय घेतले, कोणावरही अन्याय केला, तरी कोणाला कशाचेच काही वाटत नाही. लोकशाहीची आसही राहिली नाही. ही देशभरातील अवस्था धाेकादायक आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी दिला.डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहाेत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा इतिहास, वर्तमान आणि भविष्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जळगावपासून बेळगावपर्यंतच्या लवटेप्रेमींनी तुडुंब गर्दी केली होती. यावेळी डॉ. लवटे आणि रेखा लवटे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, लवटे यांच्याविषयीच्या दोन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.कुबेर म्हणाले, इतिहासाकडे पाहिले, तर तर्कवादाचा देशभरातील उगम महाराष्ट्रात झाला. प्रबोधनाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. महात्मा फुलेंनी बौद्धिक पुनरूत्थानाची चळवळ सुरू केली. बाळशास्त्री जांभेकरांनी शोषण हा शब्द पहिल्यांदा वापरला. ताराबाई शिंदे, विठाबाई, चिपळूणकर, रानडे यांच्या काळाचा आवश्यक अभ्यास झाला नाही. महाराष्ट्राचा हा तुटलेला वैचारिक धागा कसा जोडायचा हा प्रश्न आहे. सध्याची भारतीय मानसिक पौरूषता नियम मोडण्याच्या क्षमतेशी जोडली गेली आहे.महाराष्ट्राबाबत बोलताना ते म्हणाले, १९९२ पूर्वीचा मुंबई दंगल होण्याआधीचा आणि नंतरचा महाराष्ट्र असे दोन महाराष्ट्र दिसून येतात. अर्थसुधारणांनी मध्यमवर्गीयांना आर्थिक स्थैर्य आले आणि प्रबोधनाची गरज वाटेनाशी झाली. सुखांतपणा, डोक्याला ताप नको ही वृत्ती जर आपले वर्तमान असेल, तर भविष्य अंधकारमय आहे. परदेशात नोकरीसाठी जाणारी मुले हे मोठे आव्हान भारतासमोर आहे.सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. जी. पी. माळी यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम, निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. माणिकराव साळुंखे, राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अर्जुन चव्हाण, डाॅ. रमेश जाधव, महावीर जोंधळे, हसन देसाई, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रभाकर हेरवाडे, डॉ. विश्वास सुतार, मेधा पानसरे, डॉ. मंजुश्री पवार, सौम्या तिरोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वर्षभरातील कार्यक्रमांबद्दल कौतुकडॉ. जयसिंगराव पवार यांनी लवटे यांच्या अमृतमहाेत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम राबविण्यात आले याचे कौतुक केले. ते म्हणाले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या १८ खंडांचे लवटे यांनी केलेले काम ही त्यांची मोठी महाराष्ट्र सेवा आहे. सयाजी गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्राची प्रबोधनपरंपरा जपण्यासाठी इतिहासाचा डोळस अभ्यास आवश्यक आहे.

चिमटे, टोले आणि हास्याचा खळखळाटसर्वच वक्त्यांनी आपल्या बोलण्यात कुठेही सत्तारूढांचे एकदाही नाव घेतले नाही, परंतु असे काही दाखले दिले आणि आता तुलना तुम्हीच करा, असे सांगत अप्रत्यक्ष टोले असे मारले की, गडकरी सभागृह काही वेळा हास्यात बुडाले, तर काही वेळा टाळ्यांचा कडकडाटात हरवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर