शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

वृक्ष प्राधिकरणाचे नियम तयार झाले कोल्हापूरमुळेच

By विश्वास पाटील | Updated: September 19, 2022 17:57 IST

झाडांची कत्तल थांबविण्यासाठीचा कायदा १९७५ साली अस्तित्वात आला तरी वृक्ष संरक्षण आणि संवर्धन म्हणून त्याचे अधिनियम तयार व्हायला २००९ उजाडले.

विश्वास पाटीलकोल्हापूर : झाडांची कत्तल थांबविण्यासाठीचा कायदा १९७५ साली अस्तित्वात आला तरी वृक्ष संरक्षण आणि संवर्धन म्हणून त्याचे अधिनियम तयार व्हायला २००९ उजाडले. त्यासाठीही कोल्हापुरातील आंदोलनाचीच मदत झाली आहे. या प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली तरच झाड तोडता येते. अन्यथा एका झाडासाठी न्यायालयाकडून लाखापर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.अनेकदा कायदा केला जातो परंतु त्याचे नियम केल्याशिवाय त्या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करता येत नाही. या कायद्याचेही तसेच झाले होते. कोल्हापुरात २००९ ला आयआरबी कंपनीने साडेचार हजार झाडांची कत्तल करून रस्त्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांचा ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.मधुकर बाचूळकर यांच्याशी त्यावरून वाद झाला व बाचूळकर यांनी या वृक्षतोडीबद्दल न्यायालयात दावा दाखल केला. त्यामुळे रस्त्याचे काम सहा महिने रखडले.त्यावेळी या कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व लक्षात आल्यावर उच्च न्यायालयाने अगोदर कायद्याचे नियम करण्याचे आदेश दिले व त्यानुसार तब्बल कायदा झाल्यावर ३४ वर्षांनी हे नियम अस्तित्वात आले. त्याची अंमलबजावणी आता राज्यभर सुरू आहे. कोल्हापूरच्या रस्ते आंदोलनाची ही राज्यातील निसर्ग संपदेला ही देणगीच म्हटली पाहिजे.

वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक

नागरिक नवीन घर बांधताना, कललेले झाड, मुळांमुळे इमारतीला धोका, झाडांचा पाला पडतो म्हणून, गाडी लावायला जागा नाही म्हणून, वाऱ्यामुळे झाडाचा जास्त आवाज येतो अशा विविध कारणांसाठी झाड तोडायचे आहे म्हणून वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागतात.

असे आहे प्राधिकरणप्राधिकरणाच्या महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे अध्यक्ष आहेत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे सदस्य सचिव आहेत.प्राधिकरणामध्ये उद्यान निरीक्षक, सभागृहातील तीन लोकप्रतिनिधी, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या तीन संस्था, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी समितीचे सदस्य आहेत.

वर्षभरात एक लाख १० हजार रुपये वसूलझाडे तोडल्याच्या तक्रारी झाल्यावर चौकशी केली जाते. बऱ्याचदा नागरिक त्याची कबुली देतात. मग त्यांना एक झाड तोडले असेल तर किमान पाच झाडे लावण्याची सक्ती केली जाते. काही जणांना झाडे लावणे शक्य नसते मग महापालिका झाडे लावण्याचा खर्च म्हणून ही रक्कम वसूल करते. त्यातून गेल्या वर्षभरात सुमारे एक लाख १० हजार रुपये वसूल झाल्याचे सांगण्यात आले.

अनेकांना केवळ नोटिसा (बॉक्स)झाडे तोडली, फांद्या तोडल्या म्हणून महापालिकेकडे तक्रारी आल्यास दरमहा सरासरी किमान चार नागरिकांना नोटीस बजावली जाते.

वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज अजूनही सक्षम होण्याची गरज आहे. नागरिकांमध्ये वृक्षसंपदा जागविण्यासाठी जनजागृती व्हायला हवी. त्यावर सध्या फारसे काम होत नाही. अनेक बहाद्दर महापालिकेचा बूम परस्पर नेऊन दबावाने झाडे, फांद्या तोडतात यांना चाप लावण्याची गरज आहे. - उदय गायकवाड, वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण