शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्यास फौजदारी; विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:16 IST

विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कलम १६३ लागू

कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणाबाबत काही घटकांकडून सामाजिक तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण, चित्रीकरण, छायाचित्रे समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात कलम १६३ लागू केले आहे. याअंतर्गत इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुकद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे, तसेच बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास सक्त मनाई केली असून, तसे आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.विशाळगड येथे अनधिकृत अतिक्रमणाविरोधात रविवारी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने जिल्ह्यातील वातावरण बिघडले आहे. कार्यकर्त्यांनी अचानक दगडफेक करून सार्वजनिक शांततेचा भंग केला, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून नुकसान केले. वरील सर्व घटनांचे व्हिडीओ, रील्स, फोटो काही लोक सोशल मीडियामार्फत, तसेच प्रसारमाध्यमामधून पसरवून समाजामध्ये अस्थिरता निर्माण करीत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून प्रक्षोभक संदेशाद्वारे अफवा पसरविल्या जात आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट, स्टेटस ठेवून तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे कलम लागू केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी