शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Kolhapur: चित्रपट महामंडळ निवडणुकीचा खेळखंडोबा, मार्ग काढण्याची गरज

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 30, 2024 18:10 IST

मतदानासाठी पात्र सभासद किती?

इंदुमती गणेशकोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सत्ताधारी व विरोधी गट एकमेकांविरोधात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेल्याने मराठी चित्रपटसृष्टीचा मानबिंदू असलेल्या या शिखर संस्थेचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. आपल्यामुळे हजारो चित्रपट व्यावसायिक, कामगार, तंत्रज्ञ वेठीस धरले गेले आहेत, धोरणात्मक निर्णय घेता येत नाही, कामकाज ठप्प झाले आहे, बरं यातून मार्ग काढला पाहिजे, असे जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनाही वाटत नाही, यासारखे दुर्दैव नाही.

चित्रपट महामंडळाची मुदत संपून अडीच वर्षे झाली आहेत. या कार्यकारिणीतील अंतर्गत राजकारणामुळे आजवर निवडणूक होऊ शकली नाही. दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे निवडणूक लावली. अखेर धर्मादायने निवडणूक जाहीर केली, तर सभासदांच्या पात्रतेच्या मुद्यावरून ही प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे आता महामंडळातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. मतदानासाठी पात्र सभासद किती?निवडणुकीची मतदारयादी प्रसिद्ध झाल्यावर विरोधी गटाने ‘अ’ वर्ग सभासदांच्या मुद्यावरून हरकती नोंदवल्या. मतदानासाठी पात्र सभासदांची संख्या ६ हजारांवरून थेट ३ हजारांवर आली. प्रत्यक्षात महामंडळाचे ४५ हजार सभासद आहेत. मग मतदानासाठी नेमके पात्र सभासद किती यावरून वाद सुरू आहे.

धर्मादाय, उच्च न्यायालय की सर्वोच्च न्यायालयपात्र सभासद संख्येवरून अध्यक्षांचा दावा उच्च न्यायालयात सुरू आहे, तर विरोधी गटाने थेट सर्वोच्च न्यायालयातच दावा केला आहे. तिथे अजून सुनावणीची तारीखच लागलेली नाही. प्रकरण रेंगाळत पडले आहे. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात दावे प्रलंबित असल्याने धर्मादायला निर्णय घेता येत नाही, असे हे त्रांगडे होऊन बसले आहे.

चहा बंद कराधर्मादायच्या निरीक्षकांनी चित्रपट महामंडळाच्या घटनेत चहाचे बिल देण्याची तरतूद नाही. त्यामुळे चहा बंद करा, असा फतवा काढला आहे. त्यामुळे चहासुद्धा बंद झाला आहे. अध्यक्ष स्वत:च्या पातळीवर मार्ग काढत आहेत. मुळातच पगार कमी, त्यात अशी अवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडायला सुरुवात केली आहे.

बेजबाबदार लोकांच्या तक्रारींमुळे महामंडळावर ही वेळ आली आहे. आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही, हे मान्य आहे; पण धर्मादायमधून नियुक्त निरीक्षकांनी वस्तुस्थिती, बिले तपासून दैनंदिन खर्च व कर्मचाऱ्यांच्या पगाराला परवानगी दिली पाहिजे. सणासुदीच्या काळात अशा पद्धतीने अडवणूक होत असल्याने कामकाज करण्यात अडचणी येत आहेत. -मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ 

महामंडळाकडून केल्या गेलेल्या वारेमाप खर्चामुळे मी या कारभाराविरोधात तक्रार केली आहे. संचालकांनी आजवर रीतसर हिशोब मांडलेला नाही म्हणून ही बंधने आली आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारासह दैनंदिन खर्च निरीक्षकांच्या सहीने केले जाण्यास आक्षेप नाही. -बाबा लाड, तक्रारदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूर