शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जिल्हा परिषदांच्या एकसष्टीचा शासनाला विसर

By समीर देशपांडे | Updated: August 19, 2022 17:58 IST

महाराष्ट्रामध्ये १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. त्यास १ मे २०२२ ला साठ वर्षे पूर्ण झाली.

समीर देशपांडेकोल्हापूर : नेतृत्व तयार करण्याचे विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना ६० वर्षे पूर्ण झाली. या पंचायत राजव्यवस्थेतील महत्त्वाच्या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची एकसष्टी सुरू होऊन साडेतीन महिने झाली तरी शासनाला याचा विसर पडला आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.महाराष्ट्रामध्ये १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. त्यास १ मे २०२२ ला साठ वर्षे पूर्ण झाली. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्हा परिषदेमध्ये १ मे रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेतला. सर्व जिल्हा परिषदांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली; परंतु त्यानंतर किमान प्रशासकीय पातळीवर तरी याबाबत काही नियोजन झाल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही.यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. राज्यसभा, विधान परिषद निवडणुका, गुवाहाटी दौऱ्यानंतर सत्ता स्थापना आणि ३३ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार यामध्ये बराच कालावधी गेला. गिरीश महाजन यांच्याकडे आता ग्रामविकास खाते देण्यात आले आहे. आता तरी या संस्थांच्या एकसष्टीच्या निमित्ताने ग्रामविकास विभाग नियोजन करेल अशी अपेक्षा आहे.

केवळ चारच महिने मिळणार

सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासक आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पदाधिकारी सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकसष्टीचे वर्ष केवळ चारच महिन्यांत संपणार आहे. त्यामुळे आतापासूनच याची तयारी करण्याची गरज आहे.महाराष्ट्रातील पंचायत राज

  • पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २७ जून १९६० ला समितीची स्थापना.
  • या समितीने १५ मार्च १९६१ रोजी अहवाल सादर केला. २२६ पैकी मुख्य शिफारशी स्वीकारण्यात आल्या. त्याचा अधिनियम तयार करण्यात आला.
  • या अधिनियमाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर, १३ मार्च १९६२ रोजी तो राजपत्रामध्ये प्रकाशित.
  • जिल्हा परिषदांची प्रशासनिक यंत्रणा १ मे १९६२ पासून कार्यरत
  • २४ मे १९६२ ते ८ जून १९६२ या कालावधीत निवडणुका झाल्या.
  • पुढच्या दोन महिन्यांत पं. स. सभापती, जि. प. अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड. १५ ऑगस्ट १९६२ पासून लोकशाहीचे हे नवे अंग कार्यप्रवण.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती