शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

‘केल्याने होत आहे रे...आधी..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:22 AM

शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन सहकार चळवळीत काम करताना विश्वास संपादन करणे, हेच सूत्र महत्त्वाचे आहे. माझ्या कार्यक्षेत्रात हेच सूत्र वापरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळेच सहकार

ठळक मुद्दे नेहमीच मनात ठेवून प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करावे लागेल, असे मला मनापासून वाटते.

शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन सहकार चळवळीत काम करताना विश्वास संपादन करणे, हेच सूत्र महत्त्वाचे आहे. माझ्या कार्यक्षेत्रात हेच सूत्र वापरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळेच सहकार चळवळीच्या रथाची ही दोन चाके गतिमान होताना दिसत आहेत. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हे मात्र नक्की!

सहकार चळवळीचा मूलभूत पाया शेतकरी व कामगार वर्गानेच घातला आहे. चळवळ यशस्वी व्हायची असेल, तर अशा पायाभूत काम करणाऱ्या घटकांना विश्वासात घेऊन काम करावे लागते, हा माझा अनुभव आहे. एकदा का विश्वास निर्माण झाला की, समन्वय साधता येतो. नवनवीन प्रयोग करताना या घटकांचा अधिक लाभ मिळतो. या घटकांकडे दुर्लक्ष झाल्यास चळवळीचा हेतू बिघडतो. सद्य:स्थितीला शेती उत्पादन हा विषय चिंतनाचा बनला आहे. दिवसेंदिवस शेतकºयांचे प्रश्न गंभीर स्वरूपाने पुढे येत आहेत, अशा प्रश्नांकडे पाठ फिरवून चालणार नाही. उदा. शिरोळ तालुक्यातील क्षारपड झालेल्या हजारो एकर नापिक जमिनी व या संकटातून आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला शेतकरी हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही. याप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आम्ही अशा शेतकºयांना एकत्रित करून जमीन क्षारपडमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

कामगार व कष्टकरी हा वर्ग उत्पादनाशी निगडित असला तरी सर्व क्षेत्रांंत येऊ पाहत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान कामगारांना देऊन त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे व दर्जेदार उत्पादनानंतर त्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून देण्याचे काम योग्य वेळी झाले पाहिजे, ही माझी भूमिका आहे.- गणपतराव पाटील, अध्यक्ष श्री दत्त साखर कारखाना, शिरोळ.बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यातून आमचे प्रयत्नही सुरू आहेत. कामगार व कर्मचारी यांची नोकर वर्ग एवढीच व्याख्या न करता तेही समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. प्रत्येकांशी संवाद साधण्याचे काम करीत राहिल्याने कामगार वर्गाशीही आमचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. कारण शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावरच पुढे जायचे आहे. ते नेहमीच मनात ठेवून प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करावे लागेल, असे मला मनापासून वाटते.