शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी ‘एफआरपी’ देणेही अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:34 IST

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने ३२१७ रुपये पहिली उचल मागून ऊसदराचे रणशिंग फुंकले आहे; पण सध्याचा बाजारातील साखरेचा दर, ...

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने ३२१७ रुपये पहिली उचल मागून ऊसदराचे रणशिंग फुंकले आहे; पण सध्याचा बाजारातील साखरेचा दर, बॅँकांकडून मिळणारी उचल पाहता एकरकमी ‘एफआरपी’ देणेही अवघड असल्याचे साखर कारखानदारांमध्ये मत आहे. एकूणच परिस्थिती पाहता एकरकमी एफआरपीवर तडजोड होण्याची दाट शक्यता आहे.रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटन ३५०० रुपये, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ‘रयत’ संघटनेने एफआरपी अधिक २00 रुपये, तर खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’ संघटनेने एकरकमी ३२१७ रुपये (म्हणजे एफआरपी अधिक दोनशे) मागणी करून ऊसदर आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. केंद्र सरकारने यंदा एफआरपीचा बेस ९.५ वरून १० टक्के करून एफआरपीत २०० रुपयांची वाढ केली आहे; त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची सरासरी एफआरपी २७५० रुपये होते. तिन्ही संघटनांनी वेगवेगळी मागणी केली असली तरी सध्याचा साखरेचा दर २९०० रुपये प्रतिक्ंिवटल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखरेचा किमान दर ३१ रुपये करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याला वेळ लागणार आहे. गेल्या हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात साखरेचा दर ३५०० रुपये होता, त्यावेळी यावर्षीपेक्षा एफआरपी कमी असूनही ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपयांवर तडजोड झाली आणि कारखान्यांची धुराडी पेटली; पण त्यानंतर साखरेचे दर घसरू लागले आणि उर्वरित २00 सोडाच, पण दोन तुकड्यांत एफआरपी द्यावी लागली.यंदा साखरेचे दर २९०० ते ३००० रुपयांच्या दरम्यान असल्याने बॅँकांचे मूल्यांकन त्या पटीतच होणार आहे; त्यामुळे बॅँकांकडून (८५ टक्के) २५६५ रुपये मिळू शकतात. त्यातून ५०० रुपये मागील कर्जाचा हप्ता व २५० रुपये प्रक्रिया खर्च वजा जाता १८६५ रुपये निव्वळ उसासाठी शिल्लक राहतात. बगॅससह इतर उपपदार्थांच्या विक्रीतून ३00 ते ४00 रुपये जरी उपलब्ध झाले तरी एफआरपी देण्यासाठी ५00 ते ६00 रुपये कमी पडतात, असे गणित साखर कारखानदारांचे आहे. शेतकरी संघटनांनी आपापल्या मागण्या रेटल्या असल्या तरी साखर दर, मूल्यांकन आणि उचलीचा ठोकताळा मांडूनच कारखानदार व संघटनांमध्ये तडजोड होऊ शकते. एकरकमी एफआरपीवर तडजोड होऊन आंदोलन शांत होऊन कारखान्यांची धुराडी पेटतील. पहिल्या १५ दिवसांचे बिल त्याप्रमाणे दिलेही जाईल; पण तेथून पुढे गत वर्षीप्रमाणे तुकडे करूनच पैसे देण्याची शक्यता नाकारता येत नाही.