शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारची पूर्वतयारी नसल्याचे स्पष्ट  :चंद्रकांत पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:06 IST

मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील सरकारची पूर्वतयारी नाही. हे सरकार याबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणप्रश्नी सरकारची पूर्वतयारी नसल्याचे स्पष्ट  चंद्रकांत पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : सरकारने आपल्याला मराठा आरक्षणप्रश्नी पुरेशी माहिती दिलेली नाही असे सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करणे धक्कादायक असून या प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील सरकारची पूर्वतयारी नाही. हे सरकार याबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणप्रश्नी आता १ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.ते म्हणाले, आम्ही सुरूवातीपासून सांगत होतो की हे प्रकरण गांर्भियाने घ्या. महाराष्ट्रातील ३२ टक्के समाजाचा हा प्रश्न आहे. तेव्हा दोनच दिवसांपुर्वी शनिवारी सरकारने आमची पूर्वतयारी झाल्याचे सांगितले होते. मग सर्वोच्च न्यायालयात पुरेशी माहिती मिळालेली नाही आणि व्हर्च्युअल सुनावणी शक्य नाही असे सांगून सरकारच्या वकिलांनी पुढची तारीख वाढवून का मागितली असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे आता कोणतीही नोकरभरती करताना मराठा आरक्षण गृहित धरून भरती करता येणार नाही. यामुळे मराठा तरूण तरूणींची झोप उडाली आहे.अड. प्रकाश आंबेडकर यांनी तुम्हांला इगतपुरीला विपश्यनेला जाण्याचा सल्ला दिला आहे याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ते डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यांच्याबद्दल आम्हांला आदर आहे. त्यांनी आपुलकीनेच सल्ला दिला आहे. मी विचार करेन.एका प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, राममंदिर हा जगभरातील हिंदूच्या आस्थेचा विषय आहे. शिवसेनेने याबाबत काहीही न करता यात आपला मोठा वाटा असल्याचा दावा केला. तीन कोटी भाविकांनी या कार्यक्रमाला जावू नये हे मान्य. पण निवडक ३०० जणांना बोलावण्यात आले आहे.

 मुस्लीम व्होट बँकेची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादीसोबत सत्ता राबवायची असल्याने अयोध्येला जायचे की नाही असा पेच उध्दव ठाकरे यांच्यासमोर आहे. त्यांना हिंदूत्वापेक्षा खूर्ची महत्वाची आहे. वाढदिवसासाठी तसेच राष्ट्रीय पातळीवरील कार्यासाठीही त्यांना शुभेच्छा आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर