शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारची पूर्वतयारी नसल्याचे स्पष्ट  :चंद्रकांत पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:06 IST

मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील सरकारची पूर्वतयारी नाही. हे सरकार याबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणप्रश्नी सरकारची पूर्वतयारी नसल्याचे स्पष्ट  चंद्रकांत पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : सरकारने आपल्याला मराठा आरक्षणप्रश्नी पुरेशी माहिती दिलेली नाही असे सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करणे धक्कादायक असून या प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील सरकारची पूर्वतयारी नाही. हे सरकार याबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणप्रश्नी आता १ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.ते म्हणाले, आम्ही सुरूवातीपासून सांगत होतो की हे प्रकरण गांर्भियाने घ्या. महाराष्ट्रातील ३२ टक्के समाजाचा हा प्रश्न आहे. तेव्हा दोनच दिवसांपुर्वी शनिवारी सरकारने आमची पूर्वतयारी झाल्याचे सांगितले होते. मग सर्वोच्च न्यायालयात पुरेशी माहिती मिळालेली नाही आणि व्हर्च्युअल सुनावणी शक्य नाही असे सांगून सरकारच्या वकिलांनी पुढची तारीख वाढवून का मागितली असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे आता कोणतीही नोकरभरती करताना मराठा आरक्षण गृहित धरून भरती करता येणार नाही. यामुळे मराठा तरूण तरूणींची झोप उडाली आहे.अड. प्रकाश आंबेडकर यांनी तुम्हांला इगतपुरीला विपश्यनेला जाण्याचा सल्ला दिला आहे याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ते डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यांच्याबद्दल आम्हांला आदर आहे. त्यांनी आपुलकीनेच सल्ला दिला आहे. मी विचार करेन.एका प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, राममंदिर हा जगभरातील हिंदूच्या आस्थेचा विषय आहे. शिवसेनेने याबाबत काहीही न करता यात आपला मोठा वाटा असल्याचा दावा केला. तीन कोटी भाविकांनी या कार्यक्रमाला जावू नये हे मान्य. पण निवडक ३०० जणांना बोलावण्यात आले आहे.

 मुस्लीम व्होट बँकेची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादीसोबत सत्ता राबवायची असल्याने अयोध्येला जायचे की नाही असा पेच उध्दव ठाकरे यांच्यासमोर आहे. त्यांना हिंदूत्वापेक्षा खूर्ची महत्वाची आहे. वाढदिवसासाठी तसेच राष्ट्रीय पातळीवरील कार्यासाठीही त्यांना शुभेच्छा आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर