शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर : सव्वीस गावांत दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:10 IST

अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे सरकारने प्रदूषणमुक्तीकडे गांभीर्याने लक्ष घालावे; अन्यथा सर्वच गावांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या नदीतून पाणी आणण्याच्या ...

ठळक मुद्देप्रदूषणमुक्त झाल्यास सर्वच गावांचा पाण्याचा प्रश्न मिटेल

अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे सरकारने प्रदूषणमुक्तीकडे गांभीर्याने लक्ष घालावे; अन्यथा सर्वच गावांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या नदीतून पाणी आणण्याच्या योजना मंजूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.प्रयाग चिखली (ता. करवीर) येथून निघालेली पंचगंगा ६७ किलोमीटरचा प्रवास करीत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत मिसळते. कोल्हापूर शहराच्या वरील गावांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळते. मात्र, तेथून गांधीनगरपासून नृसिंहवाडीपर्यंत २६ गावांतील तीन लाख ४८ हजार ९४६ लोकांना प्रदूषित व मैलामिश्रित पाणी प्यावे लागते. यामध्ये इचलकरंजी शहराची लोकसंख्या अधिक केल्यास सुमारे साडेसहा लाख लोक प्रदूषित पाणी पितात. रुई (ता. हातकणंगले) बंधाºयानंतर नृसिंहवाडीपर्यंतच्या १७ गावांना, तर प्रदूषणाची तीव्रता वाढलेले पाणी मिळते आणि इचलकरंजी शहरापासून नृसिंहवाडीपर्यंतच्या १४ गावांना अतिप्रदूषित पाणी प्यावे लागते, ही सध्याची परिस्थिती आहे. त्याचबरोबर ५७ गावांतील बारा हजार ३२५.२२ हेक्टर जमिनीतील पिकांना प्रदूषित पाणी दिले जाते. त्यामुळे जमिनी खराब होणे, तसेच प्रदूषित पाण्यातून उत्पादित झालेली पिके, भाजीपाला खाल्ल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.रुई बंधाºयानंतर लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित व रसायनमिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीमध्ये मिसळते. त्यानंतर इचलकरंजीतील इंडस्ट्रियल इस्टेट, काही प्रोसेसर्स, पंचतारांकित औद्योगिक वसाहत यामधून औद्योगिक सांडपाणी सोडले जाते. त्याचबरोबर साखर कारखान्यांमधूनही सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळले जाते. राष्टÑीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेच्या (निरी) माध्यमातून शासनाने प्रदूषणाबाबतचा अहवाल मागविला होता. त्यानुसार ‘निरी’ ने सन २०१४ साली १३ तपासण्या व प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्या अहवालात कोल्हापूर महानगरपालिका ५२ टक्के, इचलकरंजी नगरपालिका २३ टक्के जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर प्रदूषण करणारे घटक, प्रदूषणाची तीव्रता, परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तरीही आजतागायत कोणतीच कारवाई झालेली नाही.परिणामी, पंचगंगा नदीतील पाणी पिण्यापेक्षा २०-२५ किलोमीटर लांब असलेल्या वारणा, दूधगंगा, कृष्णा या नद्यांमधून पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी इचलकरंजीसह पंचगंगा नदीकाठच्या अनेक गावांनी योजना राबविल्या आहेत. यामध्ये यड्राव, तारदाळ, हातकणंगले, आळते, कोरोची, खोतवाडी, मजले, टाकवडे, हुपरी, रेंदाळ, तामगाव, वसगडे, उचगाव, गडमुडशिंगी, कुरुंदवाड, हेरवाड, शिरोळ, कोंडिग्रे, जांभळी अशा अनेक गावांचा त्यामध्ये समावेश आहे.अन्य नद्यांमधून पाणी आणून ते पिण्यासाठी, तसेच औद्योगिक कारणासाठी वापरून प्रदूषित झालेले पाणी व गावातील सांडपाणी पंचगंगा नदीत सोडले जाते. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणात आणखीनच वाढ होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्त करा, अन्यथा उरलेल्या सर्व गावांनाही अन्य नद्यांतून पाणी आणण्यासाठी योजना मंजूर करा, अशीही मागणी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater pollutionजल प्रदूषण