शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

पंचगंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर : सव्वीस गावांत दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:10 IST

अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे सरकारने प्रदूषणमुक्तीकडे गांभीर्याने लक्ष घालावे; अन्यथा सर्वच गावांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या नदीतून पाणी आणण्याच्या ...

ठळक मुद्देप्रदूषणमुक्त झाल्यास सर्वच गावांचा पाण्याचा प्रश्न मिटेल

अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे सरकारने प्रदूषणमुक्तीकडे गांभीर्याने लक्ष घालावे; अन्यथा सर्वच गावांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या नदीतून पाणी आणण्याच्या योजना मंजूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.प्रयाग चिखली (ता. करवीर) येथून निघालेली पंचगंगा ६७ किलोमीटरचा प्रवास करीत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत मिसळते. कोल्हापूर शहराच्या वरील गावांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळते. मात्र, तेथून गांधीनगरपासून नृसिंहवाडीपर्यंत २६ गावांतील तीन लाख ४८ हजार ९४६ लोकांना प्रदूषित व मैलामिश्रित पाणी प्यावे लागते. यामध्ये इचलकरंजी शहराची लोकसंख्या अधिक केल्यास सुमारे साडेसहा लाख लोक प्रदूषित पाणी पितात. रुई (ता. हातकणंगले) बंधाºयानंतर नृसिंहवाडीपर्यंतच्या १७ गावांना, तर प्रदूषणाची तीव्रता वाढलेले पाणी मिळते आणि इचलकरंजी शहरापासून नृसिंहवाडीपर्यंतच्या १४ गावांना अतिप्रदूषित पाणी प्यावे लागते, ही सध्याची परिस्थिती आहे. त्याचबरोबर ५७ गावांतील बारा हजार ३२५.२२ हेक्टर जमिनीतील पिकांना प्रदूषित पाणी दिले जाते. त्यामुळे जमिनी खराब होणे, तसेच प्रदूषित पाण्यातून उत्पादित झालेली पिके, भाजीपाला खाल्ल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.रुई बंधाºयानंतर लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित व रसायनमिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीमध्ये मिसळते. त्यानंतर इचलकरंजीतील इंडस्ट्रियल इस्टेट, काही प्रोसेसर्स, पंचतारांकित औद्योगिक वसाहत यामधून औद्योगिक सांडपाणी सोडले जाते. त्याचबरोबर साखर कारखान्यांमधूनही सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळले जाते. राष्टÑीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेच्या (निरी) माध्यमातून शासनाने प्रदूषणाबाबतचा अहवाल मागविला होता. त्यानुसार ‘निरी’ ने सन २०१४ साली १३ तपासण्या व प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्या अहवालात कोल्हापूर महानगरपालिका ५२ टक्के, इचलकरंजी नगरपालिका २३ टक्के जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर प्रदूषण करणारे घटक, प्रदूषणाची तीव्रता, परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तरीही आजतागायत कोणतीच कारवाई झालेली नाही.परिणामी, पंचगंगा नदीतील पाणी पिण्यापेक्षा २०-२५ किलोमीटर लांब असलेल्या वारणा, दूधगंगा, कृष्णा या नद्यांमधून पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी इचलकरंजीसह पंचगंगा नदीकाठच्या अनेक गावांनी योजना राबविल्या आहेत. यामध्ये यड्राव, तारदाळ, हातकणंगले, आळते, कोरोची, खोतवाडी, मजले, टाकवडे, हुपरी, रेंदाळ, तामगाव, वसगडे, उचगाव, गडमुडशिंगी, कुरुंदवाड, हेरवाड, शिरोळ, कोंडिग्रे, जांभळी अशा अनेक गावांचा त्यामध्ये समावेश आहे.अन्य नद्यांमधून पाणी आणून ते पिण्यासाठी, तसेच औद्योगिक कारणासाठी वापरून प्रदूषित झालेले पाणी व गावातील सांडपाणी पंचगंगा नदीत सोडले जाते. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणात आणखीनच वाढ होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्त करा, अन्यथा उरलेल्या सर्व गावांनाही अन्य नद्यांतून पाणी आणण्यासाठी योजना मंजूर करा, अशीही मागणी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater pollutionजल प्रदूषण