शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Kolhapur News: ‘सद्भावना रॅली’हे राजकीय षडयंत्र आहे का?, सकल हिंदू समाजाच्यावतीने सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:44 IST

एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे?

कोल्हापूर : एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे? हे नाटक फक्त हिंदूंवर अन्याय झाल्यानंतर हिंदू रस्त्यावर उतरल्यावरच कसे सुचते आणि ही रॅली म्हणजे राजकीय षडयंत्र आहे का? असा सवाल हिंदुत्ववादी पंचवीस संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.कसबा बावडा येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीला पाळणा सजवणाऱ्या हिंदू महिलांना मारहाण झाली, हेर्ले येथे शिवजयंतीचे पोस्टर फाडले, बिहारमधील ६९ मुलांना आजऱ्याच्या मदरशात शिक्षण देण्यात येणार होते, ‘इंडिका’ गाडीवर ‘शरीयानुसार अजून ६ लग्नं बाकी आहेत’, असे लिहिलेली गाडी हिंदूंनी पकडून दिली.एका मौलवीच्या मुलाने एकटी आई, दोन मुली, एक वयस्कर आजी अशा परिवाराला हेरले. धमक्या दिल्या. राजकीय दबाव आणला आणि १६ वर्षांच्या हिंदू मुलीला फूस लावून तिचे धर्मांतर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी ‘औरंगजेब सगळ्यांचा बाप’ असे स्टेटस ठेवले. या सगळ्या घटना घडत असताना तथाकथित पुरोगामी कुठे होते? असा सवाल विचारण्यात आला आहे.जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा पुरोगामी गप्प का असतात? खरा हिंदुत्ववाद आतापर्यंत जपला म्हणूनच जिल्हा शांत असतो. परंतु, या रॅलीच्या निमित्ताने जर हिंदूंना दंगलखोर ठरवले जाणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. शांतता राहायची असेल तर या सद्भावना रॅलीला परवानगी देऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर