शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: ‘सद्भावना रॅली’हे राजकीय षडयंत्र आहे का?, सकल हिंदू समाजाच्यावतीने सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:44 IST

एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे?

कोल्हापूर : एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे? हे नाटक फक्त हिंदूंवर अन्याय झाल्यानंतर हिंदू रस्त्यावर उतरल्यावरच कसे सुचते आणि ही रॅली म्हणजे राजकीय षडयंत्र आहे का? असा सवाल हिंदुत्ववादी पंचवीस संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.कसबा बावडा येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीला पाळणा सजवणाऱ्या हिंदू महिलांना मारहाण झाली, हेर्ले येथे शिवजयंतीचे पोस्टर फाडले, बिहारमधील ६९ मुलांना आजऱ्याच्या मदरशात शिक्षण देण्यात येणार होते, ‘इंडिका’ गाडीवर ‘शरीयानुसार अजून ६ लग्नं बाकी आहेत’, असे लिहिलेली गाडी हिंदूंनी पकडून दिली.एका मौलवीच्या मुलाने एकटी आई, दोन मुली, एक वयस्कर आजी अशा परिवाराला हेरले. धमक्या दिल्या. राजकीय दबाव आणला आणि १६ वर्षांच्या हिंदू मुलीला फूस लावून तिचे धर्मांतर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी ‘औरंगजेब सगळ्यांचा बाप’ असे स्टेटस ठेवले. या सगळ्या घटना घडत असताना तथाकथित पुरोगामी कुठे होते? असा सवाल विचारण्यात आला आहे.जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा पुरोगामी गप्प का असतात? खरा हिंदुत्ववाद आतापर्यंत जपला म्हणूनच जिल्हा शांत असतो. परंतु, या रॅलीच्या निमित्ताने जर हिंदूंना दंगलखोर ठरवले जाणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. शांतता राहायची असेल तर या सद्भावना रॅलीला परवानगी देऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर