शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Kolhapur News: ‘सद्भावना रॅली’हे राजकीय षडयंत्र आहे का?, सकल हिंदू समाजाच्यावतीने सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:44 IST

एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे?

कोल्हापूर : एकीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला काहीही न करता, त्याला हिंदूंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर ‘सद्भावना रॅली’ का काढली जात आहे? हे नाटक फक्त हिंदूंवर अन्याय झाल्यानंतर हिंदू रस्त्यावर उतरल्यावरच कसे सुचते आणि ही रॅली म्हणजे राजकीय षडयंत्र आहे का? असा सवाल हिंदुत्ववादी पंचवीस संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.कसबा बावडा येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीला पाळणा सजवणाऱ्या हिंदू महिलांना मारहाण झाली, हेर्ले येथे शिवजयंतीचे पोस्टर फाडले, बिहारमधील ६९ मुलांना आजऱ्याच्या मदरशात शिक्षण देण्यात येणार होते, ‘इंडिका’ गाडीवर ‘शरीयानुसार अजून ६ लग्नं बाकी आहेत’, असे लिहिलेली गाडी हिंदूंनी पकडून दिली.एका मौलवीच्या मुलाने एकटी आई, दोन मुली, एक वयस्कर आजी अशा परिवाराला हेरले. धमक्या दिल्या. राजकीय दबाव आणला आणि १६ वर्षांच्या हिंदू मुलीला फूस लावून तिचे धर्मांतर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी ‘औरंगजेब सगळ्यांचा बाप’ असे स्टेटस ठेवले. या सगळ्या घटना घडत असताना तथाकथित पुरोगामी कुठे होते? असा सवाल विचारण्यात आला आहे.जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा पुरोगामी गप्प का असतात? खरा हिंदुत्ववाद आतापर्यंत जपला म्हणूनच जिल्हा शांत असतो. परंतु, या रॅलीच्या निमित्ताने जर हिंदूंना दंगलखोर ठरवले जाणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. शांतता राहायची असेल तर या सद्भावना रॅलीला परवानगी देऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर