शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जलसिंचन योजनांमधील भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही

By admin | Updated: April 18, 2015 00:05 IST

गिरीश महाजन : कर्जरोखे काढून रखडलेल्या योजना पूर्ण करणार

मिरज : सिंचन योजनांसाठी कर्जरोखे काढून २५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुढे नवीन प्रकल्प सुरू न करता अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करू, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी भोसे (ता. मिरज) येथे शेतकरी मेळाव्यात केली. यापूर्वी जलसिंचन योजनांत हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. म्हैसाळ योजनेंतर्गत डोंगरवाडी उपसा योजनेचे उद्घाटन महाजन यांनी केले. त्यानंतर भोसे येथील शेतकरी मेळाव्यात त्यांनी आघाडी शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जलसिंचनात भ्रष्टाचार होऊन योजना रखडल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पंधरा वर्षांपूर्वी युती शासनाला पुन्हा संधी मिळाली असती तर म्हैसाळ योजना पूर्ण झाली असती. आता म्हैसाळची अपूर्ण कामे दोन वर्षात पूर्ण करू. आघाडी शासनाच्या अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी ७० हजार कोटी लागणार आहेत. मात्र, जलसंपदा विभागाकडे केवळ आठ हजार कोटींचा निधी उपलब्ध असल्याने या रकमेत पुढील ५० वर्षे कामे पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे यापुढे सिंचनाचे नवीन प्रकल्प सुरू न करता जुने व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करावे लागणार आहे. कर्जे घेऊन व कर्जरोख्यांव्दारे २५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून चार महिन्यात योजनांची कामे सुरू करण्यात येणार आहेत.विजय शिवतारे म्हणाले की, टेंभू, म्हैसाळ या सिंचन योजनांचे श्रेय युतीचे आहे. मात्र, पतंगराव कदम त्याचे खोटे श्रेय घेऊन निवडून येतात. दुष्काळ निर्मूलनासाठी शासनाने नेमलेल्या सहा समित्यांनी अवर्षणप्रवण भागात सिंचन व्यवस्था व जलसंधारणाची कामे करावीत अशी शिफारस केली आहे. याप्रसंगी आ. शिवाजीराव नाईक, आ. सुधीर गाडगीळ, आ. उल्हास पाटील, आ. अनिल बाबर, जयसिंग शेडगे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, गोपीचंद पडळकर उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले टांग मारतात : शिवतारेविजय शिवतारे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यात पतंगराव कदम यांच्यासारखे निवडून येतात. यापुढे जयंतराव पाटीलही घरी बसले पाहिजेत. यापुढे त्यांचे काही चालणार नाही. त्यांचे पैसे किंवा काय घ्यायचे ते घ्या; मात्र त्यांना निवडून देऊ नका. मी पवारांच्या बालेकिल्ल्यात दारू किंवा पैशाचे वाटप न करता निवडून येतो, काँग्रेस-राष्ट्रवादी नेते फायद्यासाठी सेना-भाजपकडे येतात आणि परत टांग मारतात.ठिबकचा वापर सक्तीचा करावा लागेलपाण्याची उपलब्धता कमी असल्याने पाणी वापर संस्थांमार्फत पाण्याचा वापर व नियोजन आवश्यक आहे. ठिबक योजनेद्वारे शेतीसाठी पाण्याचा वापर सक्तीचा करावा लागणार आहे, असेही महाजन यांनी सांगितले.