शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रेशनवर आता लोह अन् आयोडिनयुक्त मीठ: नागपुरात विक्रीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 11:56 IST

रेशनवर ग्राहकांना आता लोह व आयोडिनयुक्त मीठ मिळणार आहे. याच्या विक्रीला बुधवारी नागपूरमधून सुरुवात झाली. कोल्हापुरात पुढील महिन्यापासून हे मीठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांना पुढील महिन्यापासून लाभ शक्य दुकानदाराला किलोमागे दीड रुपये कमिशन

कोल्हापूर : रेशनवर ग्राहकांना आता लोह व आयोडिनयुक्त मीठ मिळणार आहे. याच्या विक्रीला बुधवारी (दि. १८) नागपूरमधून सुरुवात झाली. कोल्हापुरात पुढील महिन्यापासून हे मीठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे.रेशनवर गहू, तांदळासोबतचा पाच वस्तू विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार असल्याचे सरकारकडून नुकतेच जाहीर करण्यात आले होेते. भाजीपाला, छोटे गॅस सिलिंडर, खते, बी-बियाणे, पोस्ट तिकिटांचा यामध्ये समावेश होता. याची प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी सुरुवातही करण्यात आली आहे. यापूर्वी तूरडाळ रेशनवर देण्यात आली आहे.आता मीठ ही रेशनवर देण्यास सरकारने परवानगी देऊन ते विक्रीसाठी ही उपलब्ध करून दिले आहे. नागपूरमध्ये बुधवारी (दि. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशन दुकानांतून मीठ विक्रीला सुरुवात करण्यात आली.

लोह व आयोडिनयुक्त मिठाच्या एक किलोच्या पॅकेटची विक्री होणार आहे. १४ रुपये प्रतिकिलो याची विक्री होणार असून त्यामध्ये दीड रुपया दुकानदाराला कमिशन मिळणार आहे. कार्डधारकांच्या संख्येनुसार प्रत्येक दुकानदाराला हे मीठ पुरविले जाणार आहे. खुल्या बाजारात एक किलो मिठाच्या पिशवीचा दर हा २० रुपये आहे. सर्वसामान्यांना माफक दरात मीठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.रेशनवर साखर, पामतेल, काडेपेटी, साबण, खोबरेल तेल यासह १४ वस्तू विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी रेशनदुकानदारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने काही वस्तू विकण्यास परवानगी देऊन सकारात्मक पाऊल उचलल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी इतर वस्तूंच्या विक्री परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून रेशनवर विक्रीसाठी जादा वस्तू वाढविण्याची मागणी होती. त्यानुसार सरकारने यापूर्वी तूरडाळ विक्रीला परवानगी दिली आहे. आता मीठ विक्रीला ही परवानगी दिली आहे. या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाला यश मिळत आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत असून अन्य वस्तूंच्या विक्रीसही लवकरच परवानगी द्यावी.-रवींद्र मोरे, शहराध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, कोल्हापूर 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर