शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

रात्रीचा प्रवास अपघाताला निमंत्रणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:52 IST

कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देजादाच्या पैशासाठी चालकही घेतात जोखीम पुरेशी झोप न मिळाल्यानेच अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.

कायम एकाच गाडीवर राहिले तर फार तर सहा-सात हजार पगार भेटतो, त्यापेक्षा रोज वेगळ्या गाडीवर काम केले तर त्यापेक्षा जादा पैसे व रात्रीचा वेगळा भत्ताही मिळत असल्याने त्याकडे कल वाढला असून, त्यातूनच चालक जोखीम घेऊन प्रवास करतात. सकाळी मुंबईहून आल्यानंतर रात्री पुन्हा मुंबईला जातात, झोप पुरेशी होत नसल्यानेच पहाटेच्या वेळी डुलकी येते आणि त्यातूनच अपघात होतो.जिल्हा बॅँकेचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक रणवीर उदाजीराव चव्हाण यांचा मंगळवारी पहाटे पनवेलजवळ अपघातात मृत्यू झाला. चव्हाण हे घोरपडे साखर कारखान्याचे अधिकारी दीपक चव्हाण यांच्या गाडीतून गेले होते. चव्हाण यांनी बाहेरील चालक घेतला होता. मृत्यू कोणालाही रोखता येत नसला तरी काळजी घेणे आपल्या हातात असते. रात्री दहा वाजता कोल्हापुरातून ते निघाले आणि पहाटे अपघात झाला.

अपघातामध्ये चूक कोणाची हा विषय वेगळा असला तरी मुळात रात्रीचा प्रवास किती सुरक्षित हे पाहणे महत्त्वाचे आहे. रणवीर चव्हाण व दीपक चव्हाण हे दिवसभर आपापली कामे करून रात्री मुंबईकडे रवाना झाले. चालक घेतला तो दिवसभर झोपला होता का? त्याची कदाचित विचारपूस न करता ते निघाले.

रात्रीचे जेवण आणि महामार्गावर रात्रीची वाहने एकदम सुसाट असल्याने वेगाने निघाले. त्यात महामार्गावर किमान १० ते १५ किलोमीटर विनागेअर बदलता गाडी एकसारखी चालते. हे सर्वांत धोकादायक असून या कालावधीत डोळ्यावर झापड येते आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते होते.

वेळेची बचत अन्.....प्रत्येक क्षेत्रात धावपळ वाढल्याने प्रत्येकजण वेळेची बचत करण्याच्या मागे लागला आहे. मुंबईला काम असेल तर रात्रीचे निघायचे, सकाळी पोहचल्यानंतर दिवसभर काम करायचे आणि पुन्हा रात्री कोल्हापूरकडे निघायचे, असेच प्रयोजन असते. वेळेची बचत होते मात्र, आयुष्याचा वेग थांबतो.

लक्झरी, एस.टी.चा प्रवास सुरक्षितमुंबईला तातडीने जायचे असेल तर लक्झरी अथवा एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित बसेस असतात. त्यांच्याकडे दोन-दोन चालक असतात, ठरावीक अंतरानंतर ते बदलत असल्याने त्यातून प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर