शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

रात्रीचा प्रवास अपघाताला निमंत्रणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:52 IST

कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देजादाच्या पैशासाठी चालकही घेतात जोखीम पुरेशी झोप न मिळाल्यानेच अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.

कायम एकाच गाडीवर राहिले तर फार तर सहा-सात हजार पगार भेटतो, त्यापेक्षा रोज वेगळ्या गाडीवर काम केले तर त्यापेक्षा जादा पैसे व रात्रीचा वेगळा भत्ताही मिळत असल्याने त्याकडे कल वाढला असून, त्यातूनच चालक जोखीम घेऊन प्रवास करतात. सकाळी मुंबईहून आल्यानंतर रात्री पुन्हा मुंबईला जातात, झोप पुरेशी होत नसल्यानेच पहाटेच्या वेळी डुलकी येते आणि त्यातूनच अपघात होतो.जिल्हा बॅँकेचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक रणवीर उदाजीराव चव्हाण यांचा मंगळवारी पहाटे पनवेलजवळ अपघातात मृत्यू झाला. चव्हाण हे घोरपडे साखर कारखान्याचे अधिकारी दीपक चव्हाण यांच्या गाडीतून गेले होते. चव्हाण यांनी बाहेरील चालक घेतला होता. मृत्यू कोणालाही रोखता येत नसला तरी काळजी घेणे आपल्या हातात असते. रात्री दहा वाजता कोल्हापुरातून ते निघाले आणि पहाटे अपघात झाला.

अपघातामध्ये चूक कोणाची हा विषय वेगळा असला तरी मुळात रात्रीचा प्रवास किती सुरक्षित हे पाहणे महत्त्वाचे आहे. रणवीर चव्हाण व दीपक चव्हाण हे दिवसभर आपापली कामे करून रात्री मुंबईकडे रवाना झाले. चालक घेतला तो दिवसभर झोपला होता का? त्याची कदाचित विचारपूस न करता ते निघाले.

रात्रीचे जेवण आणि महामार्गावर रात्रीची वाहने एकदम सुसाट असल्याने वेगाने निघाले. त्यात महामार्गावर किमान १० ते १५ किलोमीटर विनागेअर बदलता गाडी एकसारखी चालते. हे सर्वांत धोकादायक असून या कालावधीत डोळ्यावर झापड येते आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते होते.

वेळेची बचत अन्.....प्रत्येक क्षेत्रात धावपळ वाढल्याने प्रत्येकजण वेळेची बचत करण्याच्या मागे लागला आहे. मुंबईला काम असेल तर रात्रीचे निघायचे, सकाळी पोहचल्यानंतर दिवसभर काम करायचे आणि पुन्हा रात्री कोल्हापूरकडे निघायचे, असेच प्रयोजन असते. वेळेची बचत होते मात्र, आयुष्याचा वेग थांबतो.

लक्झरी, एस.टी.चा प्रवास सुरक्षितमुंबईला तातडीने जायचे असेल तर लक्झरी अथवा एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित बसेस असतात. त्यांच्याकडे दोन-दोन चालक असतात, ठरावीक अंतरानंतर ते बदलत असल्याने त्यातून प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर