शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

रात्रीचा प्रवास अपघाताला निमंत्रणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:52 IST

कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देजादाच्या पैशासाठी चालकही घेतात जोखीम पुरेशी झोप न मिळाल्यानेच अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई जाण्या-येण्यासाठी हजार-दीड हजार रुपये मिळत असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनांच्या चालकांचे काम सुरू आहे.

कायम एकाच गाडीवर राहिले तर फार तर सहा-सात हजार पगार भेटतो, त्यापेक्षा रोज वेगळ्या गाडीवर काम केले तर त्यापेक्षा जादा पैसे व रात्रीचा वेगळा भत्ताही मिळत असल्याने त्याकडे कल वाढला असून, त्यातूनच चालक जोखीम घेऊन प्रवास करतात. सकाळी मुंबईहून आल्यानंतर रात्री पुन्हा मुंबईला जातात, झोप पुरेशी होत नसल्यानेच पहाटेच्या वेळी डुलकी येते आणि त्यातूनच अपघात होतो.जिल्हा बॅँकेचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक रणवीर उदाजीराव चव्हाण यांचा मंगळवारी पहाटे पनवेलजवळ अपघातात मृत्यू झाला. चव्हाण हे घोरपडे साखर कारखान्याचे अधिकारी दीपक चव्हाण यांच्या गाडीतून गेले होते. चव्हाण यांनी बाहेरील चालक घेतला होता. मृत्यू कोणालाही रोखता येत नसला तरी काळजी घेणे आपल्या हातात असते. रात्री दहा वाजता कोल्हापुरातून ते निघाले आणि पहाटे अपघात झाला.

अपघातामध्ये चूक कोणाची हा विषय वेगळा असला तरी मुळात रात्रीचा प्रवास किती सुरक्षित हे पाहणे महत्त्वाचे आहे. रणवीर चव्हाण व दीपक चव्हाण हे दिवसभर आपापली कामे करून रात्री मुंबईकडे रवाना झाले. चालक घेतला तो दिवसभर झोपला होता का? त्याची कदाचित विचारपूस न करता ते निघाले.

रात्रीचे जेवण आणि महामार्गावर रात्रीची वाहने एकदम सुसाट असल्याने वेगाने निघाले. त्यात महामार्गावर किमान १० ते १५ किलोमीटर विनागेअर बदलता गाडी एकसारखी चालते. हे सर्वांत धोकादायक असून या कालावधीत डोळ्यावर झापड येते आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते होते.

वेळेची बचत अन्.....प्रत्येक क्षेत्रात धावपळ वाढल्याने प्रत्येकजण वेळेची बचत करण्याच्या मागे लागला आहे. मुंबईला काम असेल तर रात्रीचे निघायचे, सकाळी पोहचल्यानंतर दिवसभर काम करायचे आणि पुन्हा रात्री कोल्हापूरकडे निघायचे, असेच प्रयोजन असते. वेळेची बचत होते मात्र, आयुष्याचा वेग थांबतो.

लक्झरी, एस.टी.चा प्रवास सुरक्षितमुंबईला तातडीने जायचे असेल तर लक्झरी अथवा एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित बसेस असतात. त्यांच्याकडे दोन-दोन चालक असतात, ठरावीक अंतरानंतर ते बदलत असल्याने त्यातून प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर