शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

उद्योग क्षेत्रात गुंतवणूक महत्त्वाची बाब: संजय किर्लोस्कर, इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’ प्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 20:27 IST

कोल्हापूर : उद्योग क्षेत्रात गुंतवणूक ही महत्त्वाची बाब आहे. पुण्या-मुंबईनंतर गुंतवणूक करण्यासाठी कोल्हापूरला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्योग जगताला बहर येईल.

ठळक मुद्दे नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात देशात दुसºया क्रमांकावरकोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी परिसरांत नवनवीन उद्योग

कोल्हापूर : उद्योग क्षेत्रात गुंतवणूक ही महत्त्वाची बाब आहे. पुण्या-मुंबईनंतर गुंतवणूक करण्यासाठी कोल्हापूरला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उद्योग जगताला बहर येईल, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे चेअरमन संजय किर्लोस्कर यांनी शनिवारी केले.

कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना येथे ‘सीआयआय’तर्फे आयोजित केलेल्या ‘इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’ या चारदिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.किर्लोस्कर म्हणाले, सांगली येथील किर्लोस्करवाडी येथे आमच्या पूर्वजांनी छोटासा उद्योग सुरू केला होता. तो वाढीला लागला. त्याची दखल कोल्हापूरच्या राजांनी घेतली होती. त्यातून कोल्हापूरमध्ये उद्योग क्षेत्राला त्यांनी चालना दिली होती. त्यामुळे आज ही उद्योगनगरी बहरत आहे.

आता त्यात आम्हीही गुंतवणूक केली आहे. आमच्या उद्योगांनाही बळ आले आहे. आमचा उद्धार जसा झाला आहे तसाच तुमचाही होईल. कोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी परिसरांत नवनवीन उद्योग आहेत; पण ते वाढण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची आहे. तरी उद्योजकांनी अधिक गुंतवणूक करावी.

खासदार महाडिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी शिक्षण, उद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. त्याच संस्कारांमुळे आज कोल्हापूरच्या उद्योग जगताचे नाव देशासह परदेशात झाले आहे. उत्तम हवा, मुबलक पाणी, सुपीक जमीन या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात देशात दुसºया क्रमांकावर आहे. सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय केवळ कर्तबागारीच्या जोरावर येथील उद्योजक ांनी उद्योग जगत वाढविले आहे. कुशल तंत्रज्ञ, दर्जात्मक उत्पादन यांचा विचार करता कोल्हापुरात संरक्षण विभागाचा एक प्रकल्प उभा राहिल्यास त्याला लागणारे साहित्य येथील उद्योजक देतील. येत्या हिवाळी अधिवेशनात यासाठी मागणी करू. त्याकरिता उद्योजकांनी अशा प्रकल्पाचा सादरीकरण आराखडा तयार करावा. तो देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व राज्यमंत्री सुभाष भांबरे यांना सादर करू. प्रास्ताविकात सीआयआय साउथ महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी प्रदर्शन आयोजनचा हेतू विशद केला. ‘सीआयआय’चे साउथ महाराष्ट्र झोनलचे माजी अध्यक्ष मोहन घाटगे यांनी आभार मानले.

‘सीआयआय’चे महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष ऋषिकुमार बागला, ज्येष्ठ उद्योजक बाबाभाई वसा, ‘आयआयएफ’चे दीपंकर विश्वास, ‘मॅक’चे हरिश्चंद्र धोतरे, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सुरजितसिंग पवार, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, सौगत मुखर्जी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, पंचतारांकित एमआयडीसीचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ‘एमएसएमईडीआय’चे राजीव गुप्ते, अभय दफ्तरदार, फौंड्री इक्विपमेंटचे रवींद्र चिरपुटकर, उद्यम को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत मुळे, ‘सीआयआय’चे वेस्टर्न रिजनचे मॅनेजर शौगट मुखर्जी, आदी उपस्थित होते.आज, रविवारी सकाळी दहा ते बारा यादरम्यान ‘ग्रोथ आॅपॉर्च्युनिटीज इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅँड टुरिझम सेक्टर’ व दुपारी २.३० ते ४ या दरम्यान ‘इलेक्ट्रिकल व्हेईकल चेंजिंग द डायनॅमिक आॅपॉर्च्युनिटीज अ‍ॅँड वे फॉरवर्ड’ या, तर सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत ‘इंडियन वुमेन नेटवर्क’ या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.