शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

शालेय पोषणमधील अपहारात नेमका कोण?, कोल्हापूर जिल्हा परिषद चौकशी समितीही संभ्रमात

By समीर देशपांडे | Updated: November 1, 2024 13:46 IST

पाच व्हीडीओ, ऑडिओ असलेला पेन ड्राईव्ह

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार विभागातील २८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी चौकशी पूर्ण झाली. परंतु यात नेमका दोष कोणाचा याबाबत चौकशी समिती संभ्रमात पडली आहे. त्यामुळे चार प्रकारे हा अपहार झाला असावा, असे याबाबतच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नेमका दोषी कोण आणि या रकमेची वसुली कशी होणार, असा सवाल उपस्थित होत असून, आता नेमकी जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी याबाबत सुनावणीला लेखाधिकारी दीपक माने यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.

१७ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या या विभागाचे लेखाधिकारी दीपक माने यांचे काही जणांनी अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्यांच्या फिर्यादीनंतर अपहाराचा प्रकार समोर आला. या अपहाराची जबाबदारी घेण्यासाठीच आपले अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी दिली होती. या प्रकरणी या विभागातील कंत्राटी कर्मचारी तेजस्विनी साठे यांच्या पतीसह काही जणांना अटकही झाली. दरम्यान, साठे यांना कार्यमुक्त करण्यात आले आणि माने यांचे निलंबन करून त्यांच्या मूळ आस्थापनेकडे पाठविण्यात आले.या प्रकरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने १२ ऑगस्ट २४ रोजी सुनावणी घेतली आणि त्याचा अहवाल ९ सप्टेंबर रोज दिला. त्याआधीच स्वयंपाक्यांच्या मानधनाची २८ लाख रुपयांची रक्कम परस्पर साठे यांनी आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर वळवल्याचे स्पष्ट झाले. चौकशी समितीने सुनावणी घेतल्यानंतरचा अहवाल मोघम असून त्यामध्ये ठोस कोणावर जबाबदार निश्चित करण्यात आलेली नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा या सर्व प्रक्रियेशी संबंधित असून यातील माने यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचा मुद्दा चौकशी समितीने मांडला आहे.

पाच व्हीडीओ, ऑडिओ असलेला पेन ड्राईव्हतेजस्विनी साठे आणि त्यांच्या पतींनी अपहारित रकमेबाबत कबुली दिल्याच्या क्लिप पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये चार व्हिडीओ आहेत आणि एक ऑडिओ क्लिप आहे. परंतु यामध्ये पुरुष आणि पुरुष महिला असे संभाषण ऐकू येते. तथापि संभाषणानुसार ओठांची हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या व्यक्तींचे संभाषण आहे व ते कधी झालेले आहे हे समजून येत नाही. त्यामुळे संभाषण/आवाज तज्ज्ञांकडून खात्री करणे योग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद