शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शालेय पोषणमधील अपहारात नेमका कोण?, कोल्हापूर जिल्हा परिषद चौकशी समितीही संभ्रमात

By समीर देशपांडे | Updated: November 1, 2024 13:46 IST

पाच व्हीडीओ, ऑडिओ असलेला पेन ड्राईव्ह

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार विभागातील २८ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी चौकशी पूर्ण झाली. परंतु यात नेमका दोष कोणाचा याबाबत चौकशी समिती संभ्रमात पडली आहे. त्यामुळे चार प्रकारे हा अपहार झाला असावा, असे याबाबतच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नेमका दोषी कोण आणि या रकमेची वसुली कशी होणार, असा सवाल उपस्थित होत असून, आता नेमकी जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी याबाबत सुनावणीला लेखाधिकारी दीपक माने यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.

१७ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या या विभागाचे लेखाधिकारी दीपक माने यांचे काही जणांनी अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्यांच्या फिर्यादीनंतर अपहाराचा प्रकार समोर आला. या अपहाराची जबाबदारी घेण्यासाठीच आपले अपहरण झाल्याची तक्रार त्यांनी दिली होती. या प्रकरणी या विभागातील कंत्राटी कर्मचारी तेजस्विनी साठे यांच्या पतीसह काही जणांना अटकही झाली. दरम्यान, साठे यांना कार्यमुक्त करण्यात आले आणि माने यांचे निलंबन करून त्यांच्या मूळ आस्थापनेकडे पाठविण्यात आले.या प्रकरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने १२ ऑगस्ट २४ रोजी सुनावणी घेतली आणि त्याचा अहवाल ९ सप्टेंबर रोज दिला. त्याआधीच स्वयंपाक्यांच्या मानधनाची २८ लाख रुपयांची रक्कम परस्पर साठे यांनी आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर वळवल्याचे स्पष्ट झाले. चौकशी समितीने सुनावणी घेतल्यानंतरचा अहवाल मोघम असून त्यामध्ये ठोस कोणावर जबाबदार निश्चित करण्यात आलेली नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा या सर्व प्रक्रियेशी संबंधित असून यातील माने यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचा मुद्दा चौकशी समितीने मांडला आहे.

पाच व्हीडीओ, ऑडिओ असलेला पेन ड्राईव्हतेजस्विनी साठे आणि त्यांच्या पतींनी अपहारित रकमेबाबत कबुली दिल्याच्या क्लिप पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये चार व्हिडीओ आहेत आणि एक ऑडिओ क्लिप आहे. परंतु यामध्ये पुरुष आणि पुरुष महिला असे संभाषण ऐकू येते. तथापि संभाषणानुसार ओठांची हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या व्यक्तींचे संभाषण आहे व ते कधी झालेले आहे हे समजून येत नाही. त्यामुळे संभाषण/आवाज तज्ज्ञांकडून खात्री करणे योग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद