शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चायनीज फुलांचे फुलशेतीवर आक्रमण-: सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:34 IST

नसिम सनदी । कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ...

ठळक मुद्देपॉलिहाउसवर संक्रांत

नसिम सनदी ।कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ओढवली आहे. चायनीज कृत्रिम फुलांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याने खºया फुलांचा रंग फिका पडू लागला आहे.

लग्नसराईसह मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी जरबेरा, कार्नेशन, गुलाब या अस्सल फुलांची आरास केली जात असे. पण आता चिनी बनावटीच्या हुबेहूब दिसणारी आणि पुन्हा वापरता येणारी ही फुले सजावटीसाठी अधिक वापरली जात आहेत. खºया फुलांच्या तुलनेत त्यांचा दरही कमी असल्याने स्टेज डेकोरेटर्स यालाच अधिक प्राधान्य देत आहेत. या सर्वांचा परिणाम होऊन पॉलिहाउसमध्ये शेतकºयांनी मोठ्या कष्टाने घेतलेल्या फुलांना आता पुरेशी बाजारपेठेच उरलेली नाही. फुलांची मागणी झपाट्याने कमी होत आहे. शिवाय जे पॉलिहाऊसमधील फुले खरेदी करतात त्यांच्याकडून शेतकºयांना परवडणारा दरही मिळत नाही.

कवडीमोल दराने ही फुले विकावी लागत आहेत. पॉलिहाउसमध्ये फुलांची लागवड करण्यासाठी लागणारी खते, औषधे, पाणी, तोडणी मजुरी, पॅकिंग, माल पाठविण्यासाठीचे वाहतूक भाडे यांचा खर्च दिवसागणिक वाढत चालला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत चालल्याने पॉलिहाउस बंद करण्याचा पर्याय शेतकरी जवळ करीत आहेत.१५ रुपयांचे फूल ५० पैशांतऐन हंगामात १५ रुपयांना एक असे विकले जाणारे जरबेरा फूल आताकेवळ किमान ५० पैसे, तर जास्तीत जास्त दोन रुपयांपर्यंत विकले जात आहे. या फुलाच्या काढणीसाठीच दोन रुपयांचा खर्च येतो. घातलेला खर्चही विक्रीतून निघत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.फूलशेती संपण्याच्या मार्गावर : गुलाब, आॅक्रीड, जरबेरा, कार्नेशियन, डच रोझ, ग्लॅडीलिओस, शेवंती, झेंडू या फुलांसह स्पृंगेरी हे गवतही प्लास्टिकमध्ये तयार केले गेले आहे. चायनीज कंपनीने तयार केलेल्या फुलांनी खºया फूलशेतीवर आक्रमण करून त्यांचे अस्तित्वच संपविण्यास सुरुवात केली आहे. 

पॉलिहाउसमध्ये फूलशेती केल्याने चांगला फायदा मिळतो, असा प्रचार झाल्याने फूलशेतीकडे वळलो; पण त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर ती पूर्णपणे बंद केली आहे. निर्यातीची सोय असेल तरच फूलशेती परवडते. कृत्रिम फुलांच्या बाजारपेठेच्या विस्ताराला वाव दिल्याने शेतकºयांची वाताहत होत असून, शेतकरी विरोधी धोरणाचा पुनर्विचार व्हावा.- मोहन खोत, पॉलिहाउस शेतकरी, रेंदाळ, ता. हातकणंगले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी