शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

चायनीज फुलांचे फुलशेतीवर आक्रमण-: सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:34 IST

नसिम सनदी । कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ...

ठळक मुद्देपॉलिहाउसवर संक्रांत

नसिम सनदी ।कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ओढवली आहे. चायनीज कृत्रिम फुलांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याने खºया फुलांचा रंग फिका पडू लागला आहे.

लग्नसराईसह मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी जरबेरा, कार्नेशन, गुलाब या अस्सल फुलांची आरास केली जात असे. पण आता चिनी बनावटीच्या हुबेहूब दिसणारी आणि पुन्हा वापरता येणारी ही फुले सजावटीसाठी अधिक वापरली जात आहेत. खºया फुलांच्या तुलनेत त्यांचा दरही कमी असल्याने स्टेज डेकोरेटर्स यालाच अधिक प्राधान्य देत आहेत. या सर्वांचा परिणाम होऊन पॉलिहाउसमध्ये शेतकºयांनी मोठ्या कष्टाने घेतलेल्या फुलांना आता पुरेशी बाजारपेठेच उरलेली नाही. फुलांची मागणी झपाट्याने कमी होत आहे. शिवाय जे पॉलिहाऊसमधील फुले खरेदी करतात त्यांच्याकडून शेतकºयांना परवडणारा दरही मिळत नाही.

कवडीमोल दराने ही फुले विकावी लागत आहेत. पॉलिहाउसमध्ये फुलांची लागवड करण्यासाठी लागणारी खते, औषधे, पाणी, तोडणी मजुरी, पॅकिंग, माल पाठविण्यासाठीचे वाहतूक भाडे यांचा खर्च दिवसागणिक वाढत चालला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत चालल्याने पॉलिहाउस बंद करण्याचा पर्याय शेतकरी जवळ करीत आहेत.१५ रुपयांचे फूल ५० पैशांतऐन हंगामात १५ रुपयांना एक असे विकले जाणारे जरबेरा फूल आताकेवळ किमान ५० पैसे, तर जास्तीत जास्त दोन रुपयांपर्यंत विकले जात आहे. या फुलाच्या काढणीसाठीच दोन रुपयांचा खर्च येतो. घातलेला खर्चही विक्रीतून निघत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.फूलशेती संपण्याच्या मार्गावर : गुलाब, आॅक्रीड, जरबेरा, कार्नेशियन, डच रोझ, ग्लॅडीलिओस, शेवंती, झेंडू या फुलांसह स्पृंगेरी हे गवतही प्लास्टिकमध्ये तयार केले गेले आहे. चायनीज कंपनीने तयार केलेल्या फुलांनी खºया फूलशेतीवर आक्रमण करून त्यांचे अस्तित्वच संपविण्यास सुरुवात केली आहे. 

पॉलिहाउसमध्ये फूलशेती केल्याने चांगला फायदा मिळतो, असा प्रचार झाल्याने फूलशेतीकडे वळलो; पण त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर ती पूर्णपणे बंद केली आहे. निर्यातीची सोय असेल तरच फूलशेती परवडते. कृत्रिम फुलांच्या बाजारपेठेच्या विस्ताराला वाव दिल्याने शेतकºयांची वाताहत होत असून, शेतकरी विरोधी धोरणाचा पुनर्विचार व्हावा.- मोहन खोत, पॉलिहाउस शेतकरी, रेंदाळ, ता. हातकणंगले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी