शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

चायनीज फुलांचे फुलशेतीवर आक्रमण-: सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:34 IST

नसिम सनदी । कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ...

ठळक मुद्देपॉलिहाउसवर संक्रांत

नसिम सनदी ।कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ओढवली आहे. चायनीज कृत्रिम फुलांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याने खºया फुलांचा रंग फिका पडू लागला आहे.

लग्नसराईसह मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी जरबेरा, कार्नेशन, गुलाब या अस्सल फुलांची आरास केली जात असे. पण आता चिनी बनावटीच्या हुबेहूब दिसणारी आणि पुन्हा वापरता येणारी ही फुले सजावटीसाठी अधिक वापरली जात आहेत. खºया फुलांच्या तुलनेत त्यांचा दरही कमी असल्याने स्टेज डेकोरेटर्स यालाच अधिक प्राधान्य देत आहेत. या सर्वांचा परिणाम होऊन पॉलिहाउसमध्ये शेतकºयांनी मोठ्या कष्टाने घेतलेल्या फुलांना आता पुरेशी बाजारपेठेच उरलेली नाही. फुलांची मागणी झपाट्याने कमी होत आहे. शिवाय जे पॉलिहाऊसमधील फुले खरेदी करतात त्यांच्याकडून शेतकºयांना परवडणारा दरही मिळत नाही.

कवडीमोल दराने ही फुले विकावी लागत आहेत. पॉलिहाउसमध्ये फुलांची लागवड करण्यासाठी लागणारी खते, औषधे, पाणी, तोडणी मजुरी, पॅकिंग, माल पाठविण्यासाठीचे वाहतूक भाडे यांचा खर्च दिवसागणिक वाढत चालला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत चालल्याने पॉलिहाउस बंद करण्याचा पर्याय शेतकरी जवळ करीत आहेत.१५ रुपयांचे फूल ५० पैशांतऐन हंगामात १५ रुपयांना एक असे विकले जाणारे जरबेरा फूल आताकेवळ किमान ५० पैसे, तर जास्तीत जास्त दोन रुपयांपर्यंत विकले जात आहे. या फुलाच्या काढणीसाठीच दोन रुपयांचा खर्च येतो. घातलेला खर्चही विक्रीतून निघत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.फूलशेती संपण्याच्या मार्गावर : गुलाब, आॅक्रीड, जरबेरा, कार्नेशियन, डच रोझ, ग्लॅडीलिओस, शेवंती, झेंडू या फुलांसह स्पृंगेरी हे गवतही प्लास्टिकमध्ये तयार केले गेले आहे. चायनीज कंपनीने तयार केलेल्या फुलांनी खºया फूलशेतीवर आक्रमण करून त्यांचे अस्तित्वच संपविण्यास सुरुवात केली आहे. 

पॉलिहाउसमध्ये फूलशेती केल्याने चांगला फायदा मिळतो, असा प्रचार झाल्याने फूलशेतीकडे वळलो; पण त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर ती पूर्णपणे बंद केली आहे. निर्यातीची सोय असेल तरच फूलशेती परवडते. कृत्रिम फुलांच्या बाजारपेठेच्या विस्ताराला वाव दिल्याने शेतकºयांची वाताहत होत असून, शेतकरी विरोधी धोरणाचा पुनर्विचार व्हावा.- मोहन खोत, पॉलिहाउस शेतकरी, रेंदाळ, ता. हातकणंगले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी