शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या नजरा कागलकडे--बिद्री कारखाना निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:31 IST

कागल : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने कागल तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनीही पर्यायी पॅनेलसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे

ठळक मुद्देराष्ट्रवादी-भाजप एकत्र, पर्यायी पॅनेलसाठी सेनेची मोर्चेबांधणीआता चर्चेत आणि पॅनेल रचनेत सहभागी व्हावे लागणार आहे.

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्क -कागल : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने कागल तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनीही पर्यायी पॅनेलसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे संभाव्य दोन्ही पॅनेलमधील इच्छुकांच्या नजरा कागलकडे लागल्या आहेत.

कागल तालुक्यातील निम्मी गावे म्हणजे ४३ गावांचे कार्यक्षेत्र या साखर कारखान्यासाठी आहे. एकूण सभासदांच्या २५ टक्के म्हणजे ५८ हजारांपैकी जवळपास १५,००० सभासद या गावातील आहेत, तर न्यायालयीन प्रक्रियेत जे ४००० सभासद पात्र ठरले त्यामध्ये १६०० सभासद कागल तालुक्यातील आहेत. कारण येथील पॅनेलचे नेतृत्व कागल तालुक्यातील नेतेमंडळींच पुढाकार घेऊन करतात.

या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार हे तत्त्वत: जाहीर केले आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार मुश्रीफ यांच्यात चर्चेच्या फेºया झाल्या आहेत. आता तालुक्यातून रणजितसिंह पाटील हे प्रशासकीय मंडळावर आहेत, तर समरजितसिंह घाटगे भाजपचे नेतृत्व करीत आहेत. यामुळे यांना देखील आता चर्चेत आणि पॅनेल रचनेत सहभागी व्हावे लागणार आहे.

तर प्रा. संजय मंडलिकांनी भाजप-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान देण्यासाठी शिवसेनेची पॅनेल बांधणी सुरू केली आहे. संजयबाबा घाटगे यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. कारण तालुक्यात त्यांनी प्रा. मंडलिकांच्याबरोबरीने काही निवडणुका लढविल्या असल्या तरी अंबरीश घाटगेंना शिक्षण सभापतिपद देण्यात मंत्री चंद्रकांतदादांनीच पुढाकार घेतला होता.त्यामुळे या निवडणुकीसाठी आमदार हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे विरुद्ध प्रा. संजय मंडलिक- संजय घाटगे अशीच लढत होणार की यामध्ये काही बदल होणार? याकडे लक्ष वेधले आहे.