शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

केंद्राकडून निधी न आल्याने आंतरजातीय विवाहाचे हजारो प्रस्ताव पडून; अनुदान दीड वर्षे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:00 IST

एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या योजनेतून जुलै २0१८ पासूनचे २५७ अनुदान मागणीचे प्रस्ताव शिल्लक आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे एक कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात २५७ प्रस्ताव पडून

समीर देशपांडेकोल्हापूर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारे अनुदान गेले दीड वर्ष दिलेच गेलेले नाही. केंद्रीय निधी न आल्यामुळे राज्यातील हजारो प्रस्ताव पडून असून, यातील अनेक जोडपी जिल्हा परिषदेकडे फे-या मारत आहेत.

सामाजिक अभिसरण व्हावे, जातिभेद निर्मूलनाचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची भूमिका सुरुवातीपासूनच महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. सन २0१0 नंतर शासनाच्या वतीने अशा जोडप्याला ५0 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते; मात्र जुलै २0१८ पासून राज्यभरातील अशा पाच हजारांहून अधिक आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे प्रस्ताव प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे पडून आहेत.

या योजनेतून केंद्र शासन ५0 टक्के आणि राज्य सरकार ५0 टक्के निधीच्या माध्यमातून हे ५0 हजार रुपये संबंधित जोडप्यांना दिले जातात. जोडप्यांपैकी एकजण खुल्या वर्गातील आणि एकजण राखीव वर्गातील असल्याचे प्रमाणपत्रे, विवाह केल्याचा पुरावा ही कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे दाखल केल्यानंतर त्याची छाननी झाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला जातो.

गेल्यावर्षी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून याचा निधीच न आल्याने जुलै २0१८ पासूनचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, जरी महाराष्ट्र शासनाकडे यासाठी निधी उपलब्ध असला, तरी केंद्र शासनाचा निधी आल्याशिवाय ते देता येत नसल्याने गेले दीड वर्षे असा विवाह केलेली जोडपी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 

महाराष्ट्र शासनाची ही चांगली योजना आहे. आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांसाठी ही ५0 हजार रुपयांची मदत अतिशय मोलाची ठरते. मात्र गेले वर्ष झाले निधी न आल्याने अनेकांकडून विचारणा होत आहे. शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करून तातडीने अनुदान उपलब्ध करून द्यावे.विशांत महापुरे

टॅग्स :fundsनिधीmarriageलग्न