शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी सुरू; २ हजार कोटी झाले होते खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:49 IST

खासगी रोपवाटिकेतून खरेदी केलेल्या तीन वर्षांतील रोपांची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावपळ

समीर देशपांडेकोल्हापूर : याआधीच्या भाजप शिवसेना युतीच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी सुरू झाली असून, खासगी रोपवाटिकेतून खरेदी केलेल्या तीन वर्षांतील रोपांची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. याबाबत बहुतांशी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या असून, ही सर्व माहिती नियुक्त करण्यात आलेल्या विधानमंडळाच्या तदर्थ समितीस उपलब्ध करून देण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम जाहीर केली होती. विविध शासकीय कार्यालयांना याबाबत उद्दिष्ट देऊन कामाला लावले होते. सलग तीन वर्षे हे वृक्षारोपण झाले. यासाठी अमिताभ बच्चन यांनाही सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने उद्दिष्ट देण्यात आल्याने अनेक शासकीय कार्यालयांनी केवळ वरून शासन आदेश आहे म्हणून दिसेल त्या जागेवर झाडे लावली होती. परंतु, त्यातील अनेक झाडे नंतर जगली की मेली हे पाहण्याचीही तसदी घेतली नाही.

परिणामी अनेक ठिकाणी केवळ कागदावर वृक्षारोपण झाले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर याच विषयावरून विधानसभा अधिवेशनामध्ये गेल्यावर्षी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार विधिमंडळाची १६ सदस्यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. याबाबत वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत घोषणा केली होती. आता या समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली असून, यातील पहिला टप्पा म्हणून शासकीय रोपवाटिकांमधून आणि खासगी रोपवाटिकांमधून किती रोपे खरेदी केली याची माहिती मागवली आहे.

२ हजार ४२९ कोटी रुपये खर्च झाले होते

या योजनेतून राज्यभरात २ हजार ४२९ कोटीे रुपये खर्च झाले होते. मार्च २१ मध्ये ही चौकशी समिती जाहीर करण्यात आली होती आणि ही समिती सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करणार होती. परंतु, वर्ष उलटून गेले तरी माहिती गोळा करण्याचेच काम सुरू आहे. यातील वन विभाग आणि सामाजिक वनीकरण यांनी केलेल्या वृक्षलागवडीची चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला आहे. आता शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या लागवडीची चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारforest departmentवनविभाग