शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेले विद्युत पंप व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST

आजरा : चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीची पाणी पातळी अचानक वाढली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे विद्युतपंप पाण्याखाली ...

आजरा : चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीची पाणी पातळी अचानक वाढली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे विद्युतपंप पाण्याखाली गेले आहेत. शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. तलाठी व कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी तातडीने पंचनामे करावेत व शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे.

कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन तातडीने विद्युत पंपांची शंभर टक्के नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. याबरोबर वादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, घरांचे पत्रे, खापऱ्या उडून गेल्या आहेत. त्यांचेही पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.

याबाबत तहसीलदार आजरा यांना लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन देणार आहोत तरी तहसीलदार आजरा यांनी सर्कल, तलाठी, महावितरण व कृषी विभागाचे प्रतिनिधी यांना योग्य ते निर्देश देऊन पंचनामे करावेत, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाने केले आहे.

पत्रकावर, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरूस्कर, मुकुंद नार्वेकर, कृष्णा सावंत, मारुती पाटील, सयाजी कोडक, नंदकुमार देसाई, निवृत्ती फगरे, मयुरेश देसाई, पांडुरंग देसाई, अतुल देसाई, यशवंत कोडक, दिलीप देसाई या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.