शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नावीन्य जपणारा, कष्टाळू चर्मकार समाज

By admin | Updated: December 21, 2015 00:28 IST

'कोल्हापुरी' चप्पलची निर्मिती : स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटलीसह भारतभर कोल्हापूरचा नावलौकिक

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर -चमार किंवा चर्मकार हे शब्द ‘चर्मकार’ या संस्कृत शब्दापासून झाले आहेत. यांचा मूळ प्रांत बिहार व संयुक्त प्रांत आहे. भारतामधील सर्व भागांत हा समाज दिसून येतो. या समाजाचा प्रामुख्याने कातड्याचे चप्पल व इतर वस्तू तयार करणे हा व्यवसाय आहे. याकडे कष्टाळू व प्रामाणिक समाज म्हणून पाहिले जाते. कोल्हापुरी चप्पल तयार करून या समाजाने कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे नेले आहे. या समाजातील अनेकजण श्री संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचे अनुयायी आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये या समाजाचे लोक आढळतात. कोल्हापूर शहरातील सुभाषनगर, जवाहरनगर, शिवाजी मार्केट परिसरात हा समाज मोठ्या प्रमाणात राहतो. चामड्यापासून चप्पल तयार करणे हा पारंपरिक व्यवसाय समाजाने आजही जपला आहे. काळाची गरज ओळखून पारंपरिक व्यवसायात न अडकता त्यामध्ये नवनवीन आधुनिक बदल करून या समाजाने स्वत:सह आपल्या उत्पादनांमध्ये नवीन बदल करून समाजाचा विकास साधला आहे. प्रचंड जाहिरातबाजी करून अनेक कंपन्या आपल्या मालाला बाजारपेठ मिळविण्याकरिता धडपडतात. मात्र कोणत्याही प्रकाराची प्रसिद्धी, जाहिरातबाजी न करता गुणवत्तेवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चा दर्जा व वैशिष्ट्ये टिकवून राहिलेले पादत्राण म्हणजे आपली ‘कोल्हापुरी चप्पल’ होय. याच समाजाने कोल्हापुरी चप्पलचे निमित्त करून कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविले आहे. महाराष्ट्रात राजस्थानी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. जयपुरी चढाव जरी जवळजवळ नाहीसे झाले असले तरी कोल्हापुरी चपला मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरून दिलेली. कोल्हापुरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळ्यातसुद्धा तिच्यात थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही; कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. कोल्हापूर जिल्ह्णात या चपला तयार करून उपजीविका करणारी साधारणत: सात हजारांवर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते. सध्या मात्र या व्यवसायात चामड्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलांच्या निर्मिर्तीच्या प्रमाणात घट होत आहे. चामड्याच्या वाढत्या किमती हेही यामागील कारण आहे. याही परिस्थितीत कोल्हापुरी पुडा - कापशी, कोल्हापुरी खास कापशी, कुरुंदवाडी, बारा वेणी, कर्रकर्र वाजणारी, मेहरबान कोल्हापूर या चपलांना मागणी आहे. स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटली या विदेशांसह भारतात सर्वत्र कोल्हापुरी चपलांची प्रदर्शने भरविली जातात. त्यासाठी इथल्या उद्योजकांना निमंत्रणे येतात. इथे येणारे पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत, हे जरी खरे असले तरी सद्य:स्थितीत कातड्याची टंचाई जाणवत असल्याने या व्यवसायातील कामगार वर्गावर कठीण परिस्थिती आल्याचे दिसून येत आहे. तरी या समाजाने नावीन्य जपत आपला व्यवसाय टिकविला आहे. समाजाने आता व्यवसायासोबत शिक्षणाची कास पकडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वैदिक वाङ्मयात उल्लेखमाणसाने जे काही शोध लावले, त्यांतील पादत्राणांचा शोधही महत्त्वाचा. पायांना बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा, उन्हाच्या चटक्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायांना पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पद्धत होती. नंतरच्या काळात मृत प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायांना बांधले जाई. भारतातील पादत्राणांसंबंधी वैदिक वाङ्मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्यांचं साम्य आढळतं. ही पादत्राणे तयार करण्याचे मुख्य काम हा चर्मकार समाज करीत आहे. संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचे आचरण समाजातील अनेकजण करतात. समाजातील ६० टक्के लोकांनी आपला पारंपरिक व्यवसाय जपला आहे. मात्र, शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या समाजाला सध्या घरघर लागली आहे. शासनाने आर्थिक मदत करून या व्यवसायास उभारी देणे गरजेचे आहे. - भूपाल शेटे, महापालिका नगरसेवक समाजातील अस्ताला चाललेली किंवा लोप पावत चाललेली ही कला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी समाजातील सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन तिला पाठबळ देण्याची नितांत गरज आहे. समाजाने शासकीय पातळीवरील विविध योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे.- अरुण सातपुते, उद्योजक चर्मकार समाजाने आजही आपला पारंपरिक व्यवसाय जपला आहे. कोल्हापुरी चप्पल तयार करून या समाजाने कोल्हापूरची एक वेगळी ओळख जगभर केली आहे. या व्यवसायात नवीन पिढी येण्यासाठी शासनाने विशेष तरतुदी केल्या पाहिजेत.- अशोक गायकवाड, उद्योजक